शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
3
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
4
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
5
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
6
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
7
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
8
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
9
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
10
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
11
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
12
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
13
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
14
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
15
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
16
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
17
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
18
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
19
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
20
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

कोल्हापुरातील भुये-भुयेवाडी येथील महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार, ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

By संदीप आडनाईक | Published: April 27, 2024 6:51 PM

दोन वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी

कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी महामार्ग-१६६ वरील बाधित भुये-भुयेवाडी येथील शेतक-यांनी गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित ५८ शेतकरी कुटुंबांचा प्रश्न मार्गी नाही लावला तर, ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाहीत, असा निर्णय या शेतकऱ्यांनी शुक्रवारी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत घेतला आहे.बाधित शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकारी क्रमांक ६ चे उपजिल्हाधिकारी आणि महामार्ग प्रकल्प संचालक व्ही. डी. पंदरकर यांची शुक्रवारी भारतीय किसान संघाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यावेळी त्यांनी जमिनीला मिळणारा कमी मोबदला, झाडे, घरे, शेड, गोठे, विहिरी, बोअरवेल यांचे होणारे मूल्यांकन योग्य व्हावे, तसेच ग्रामीण भागाला होणारे प्राधिकरणाचे तोटे, तसेच रेखांकनात झालेल्या गंभीर त्रुटी आणि त्याचे दीर्घकाळ होणारे दुष्परिणाम निर्दशनास आणून दिले. या सर्व गोष्टींचा निर्णय राज्य सरकारकडे गत दोन वर्षांपासून प्रलंबित आहे.पिकाऊ जमिनी कमी बाधित होतील आणि कमीत कमी अल्प भूधारक शेतकरी भूमिहीन होतील, याबाबत शाश्वत विकासाचा विचार करून राज्य सरकारकडून संबंधित शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा अन्यथा निवडणुकीत मतदान करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.लोकप्रतिनिधीच्या बैठकीमध्ये मंजूर केलेले एसएच-१९४ वरील राज्यमार्गाच्या दुतर्फाच्या रेखांकनामध्ये बदल करून नवीन रेखांकन बागायती जमिनीमधून केले आहे. यामुळे ५८ कुटुंबे बाधित होत आहेत. रेखांकन बदलाचा संबंध नाही, त्यांनी पैसे उचलले आहेत. पण, रेखांकन बदलाच्या संबंधित लोकांनी पैसे स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे सरकारकडून योग्य न्याय मिळेपर्यंत मतदान प्रक्रियेवर बहिष्कार असेल, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. महामार्ग अधिकाऱ्यांकडून सहकार्य आणि वेळ मिळेल, अशी अपेक्षा राजेंद्र पाटील या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४highwayमहामार्गFarmerशेतकरी