शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

कोल्हापुरातील भुये-भुयेवाडी येथील महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार, ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

By संदीप आडनाईक | Updated: April 27, 2024 18:53 IST

दोन वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी

कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी महामार्ग-१६६ वरील बाधित भुये-भुयेवाडी येथील शेतक-यांनी गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित ५८ शेतकरी कुटुंबांचा प्रश्न मार्गी नाही लावला तर, ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाहीत, असा निर्णय या शेतकऱ्यांनी शुक्रवारी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत घेतला आहे.बाधित शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकारी क्रमांक ६ चे उपजिल्हाधिकारी आणि महामार्ग प्रकल्प संचालक व्ही. डी. पंदरकर यांची शुक्रवारी भारतीय किसान संघाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यावेळी त्यांनी जमिनीला मिळणारा कमी मोबदला, झाडे, घरे, शेड, गोठे, विहिरी, बोअरवेल यांचे होणारे मूल्यांकन योग्य व्हावे, तसेच ग्रामीण भागाला होणारे प्राधिकरणाचे तोटे, तसेच रेखांकनात झालेल्या गंभीर त्रुटी आणि त्याचे दीर्घकाळ होणारे दुष्परिणाम निर्दशनास आणून दिले. या सर्व गोष्टींचा निर्णय राज्य सरकारकडे गत दोन वर्षांपासून प्रलंबित आहे.पिकाऊ जमिनी कमी बाधित होतील आणि कमीत कमी अल्प भूधारक शेतकरी भूमिहीन होतील, याबाबत शाश्वत विकासाचा विचार करून राज्य सरकारकडून संबंधित शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा अन्यथा निवडणुकीत मतदान करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.लोकप्रतिनिधीच्या बैठकीमध्ये मंजूर केलेले एसएच-१९४ वरील राज्यमार्गाच्या दुतर्फाच्या रेखांकनामध्ये बदल करून नवीन रेखांकन बागायती जमिनीमधून केले आहे. यामुळे ५८ कुटुंबे बाधित होत आहेत. रेखांकन बदलाचा संबंध नाही, त्यांनी पैसे उचलले आहेत. पण, रेखांकन बदलाच्या संबंधित लोकांनी पैसे स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे सरकारकडून योग्य न्याय मिळेपर्यंत मतदान प्रक्रियेवर बहिष्कार असेल, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. महामार्ग अधिकाऱ्यांकडून सहकार्य आणि वेळ मिळेल, अशी अपेक्षा राजेंद्र पाटील या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४highwayमहामार्गFarmerशेतकरी