शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

कोल्हापुरातील भुये-भुयेवाडी येथील महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार, ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

By संदीप आडनाईक | Updated: April 27, 2024 18:53 IST

दोन वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी

कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी महामार्ग-१६६ वरील बाधित भुये-भुयेवाडी येथील शेतक-यांनी गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित ५८ शेतकरी कुटुंबांचा प्रश्न मार्गी नाही लावला तर, ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाहीत, असा निर्णय या शेतकऱ्यांनी शुक्रवारी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत घेतला आहे.बाधित शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकारी क्रमांक ६ चे उपजिल्हाधिकारी आणि महामार्ग प्रकल्प संचालक व्ही. डी. पंदरकर यांची शुक्रवारी भारतीय किसान संघाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यावेळी त्यांनी जमिनीला मिळणारा कमी मोबदला, झाडे, घरे, शेड, गोठे, विहिरी, बोअरवेल यांचे होणारे मूल्यांकन योग्य व्हावे, तसेच ग्रामीण भागाला होणारे प्राधिकरणाचे तोटे, तसेच रेखांकनात झालेल्या गंभीर त्रुटी आणि त्याचे दीर्घकाळ होणारे दुष्परिणाम निर्दशनास आणून दिले. या सर्व गोष्टींचा निर्णय राज्य सरकारकडे गत दोन वर्षांपासून प्रलंबित आहे.पिकाऊ जमिनी कमी बाधित होतील आणि कमीत कमी अल्प भूधारक शेतकरी भूमिहीन होतील, याबाबत शाश्वत विकासाचा विचार करून राज्य सरकारकडून संबंधित शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा अन्यथा निवडणुकीत मतदान करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.लोकप्रतिनिधीच्या बैठकीमध्ये मंजूर केलेले एसएच-१९४ वरील राज्यमार्गाच्या दुतर्फाच्या रेखांकनामध्ये बदल करून नवीन रेखांकन बागायती जमिनीमधून केले आहे. यामुळे ५८ कुटुंबे बाधित होत आहेत. रेखांकन बदलाचा संबंध नाही, त्यांनी पैसे उचलले आहेत. पण, रेखांकन बदलाच्या संबंधित लोकांनी पैसे स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे सरकारकडून योग्य न्याय मिळेपर्यंत मतदान प्रक्रियेवर बहिष्कार असेल, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. महामार्ग अधिकाऱ्यांकडून सहकार्य आणि वेळ मिळेल, अशी अपेक्षा राजेंद्र पाटील या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४highwayमहामार्गFarmerशेतकरी