शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

डेथ ऑडिटमधून प्रशासकीय, वैद्यकीय कारणांवर प्रकाशझोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:23 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि नंतरच्या काळात मृत्यूही सुरू ...

कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि नंतरच्या काळात मृत्यूही सुरू झाले. सप्टेंबर २०२० मध्ये रुग्णही वाढत गेले आणि मृत्यूही वाढत गेले. गेल्यावर्षी सर्वाधिक मृत्यू हे सप्टेंबरच्या अखेरीस ३४ नोंदले गेले; परंतु एप्रिल २०२१ मध्ये याही पुढे जाऊन सर्वाधिक ४१ मृत्यू नोंदवले गेले. या दहा दिवसांत रोज २१ पासून ३५ पर्यंत मृत्यू सुरू आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गेल्या दोन महिन्यांमधील झालेल्या मृत्यूंचे डेथ ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत झालेल्या २१७८ मृत्यूंपैकी १६९० मृत्यूंची कारणे नोंदवण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे श्वसनविषयक त्रास असणाऱ्यांची म्हणजेच इली या आजार असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याखालोखाल सारीच्या आजारामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. अनुक्रमे ४५० आणि ३२१ जणांचा मृत्यू हा इली आणि सारीमुळे झाला आहे. ताप, खोकला, सर्दी, श्वसनविषयक त्रास अशा या आजारांचे स्वरूप असून त्याने गंभीर स्वरूप धारण केले की त्यात रुग्णाचा मृत्यू होतो. दमा आणि धाप लागण्याचा विकार असणाऱ्या २४० जणांचा मृत्यू झाला असून रक्तदाब असणाऱ्या ११७ तर मधुमेह असणाऱ्या १०१ जणांचा मृतांमध्ये समावेश आहे.

विविध आजारांचे एकत्रीकरण झालेल्या रुग्णांना कोरोनाच्या काळामध्ये अधिक त्रास होता आणि त्यातच त्या रुग्णावर उपचार करताना मर्यादा येतात. त्यामुळे या काळात वयाच्या ६० वर्षांनंतर मृत्यू पावलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

चौकट

डेथ ऑडिटमध्ये केवळ आजाराची माहिती नाही

जिल्ह्यात जे डेथ ऑडिट करण्यात येणार आहे ते नेमक्या कोणत्या आजारामुळे रुग्ण दगावला एवढ्यापुरते मर्यादित नाही. तर मृत्यूबाबत प्रशासकीय व वैद्यकीय कारणे याची चौकशी करणे, मृत्यूबाबत प्रशासकीय हलगर्जीपणा झाला असल्यास त्याची माहिती घेणे, मृत्यूच्या कारणांची पडताळणी करून भविष्यात मृत्यू होऊ नयेत म्हणून प्रशासकीय किंवा वैद्यकीय उपाययोजना सुचवणे व त्याच्या अंमलबजावणी नियंत्रण ठेवणे या व्यापक मुद्द्यांचा समावेश या डेथ ऑडिटमध्ये करण्यात आला आहे.

चौकट

१) मार्च महिन्यात जिल्ह्यात एकूण मृत्यू - २१७५

कोरोनामुळे मृत्यू - २७

२) एप्रिल महिन्यात जिल्ह्यात एकूण मृत्यू २१६८

कोरोनामुळे मृत्यू ४१४

यामध्ये इतर जिल्ह्यांतील मृतांचाही समावेश आहे.

कोट

ज्येष्ठ नागरिक ज्यांना काही ना काही व्याधी आहेत अशांचा मृत्यू झाल्याचे कोरोना काळातील मृत्यूंच्या कारणांकडे पाहिल्यावर जाणवते. श्वसनविषयक त्रास, ताप, खोकला अंगावर न काढता असा त्रास जाणवल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल होणे हिताचे ठरते. ज्येष्ठ नागरिकांबाबत तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

-डॉ. योगेश साळे

जिल्हा आरोग्य अधिकारी