शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

Kolhapur: दरेवाडीत गव्यांच्या कळपाचा वावर, तीन एकरातील शेती पिकांचा केला सुपडासाफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:34 IST

शेती पिकवायची की सोडून द्यायची असा सवाल शेतकऱ्यांनी वनविभागाला केला

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी येथील खोरी नावाच्या शिवारातील तीन एकरातील शेती पिकांचा गव्यांच्या कळपाने सोमवारी पहाटे सुपडासाफ केला. आसुर्ले-पोर्ले परिसरातील डोंगराकडच्या शेती पिकांची पंधरा दिवसांपासून गव्यांच्या कळपाकडून नासधूस सुरू आहे. वन्यप्राण्यांचा त्रास आणि नुकसान भरपाईच्या कागदपत्रांसाठी कराव्या लागणाऱ्या त्रासाचा अनुभव पाहता शेतकरी डोंगराकडची शेती पिकवायची की सोडून द्यायची या विचारात आहेत.पावनगडाच्या जंगलात ३० ते ३५ गव्यांचा कळप तळ ठोकून आहे. दिवसभर जंगलात विसावा घ्यायचा आणि सायंकाळनंतर अन्न पाण्याच्या शोधात लोकवस्तीत उतरण्याचा गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांचा नित्यक्रम आहे. रोज वेगवेगळ्या शिवारातील शेती पिके खाताना गवे शेतीची पुरती वाट लावत आहेत. कष्ट करून आणि पैसा घालून वाढीस लावलेल्या पिकांचा गवे एका रात्रीत फडशा पाडत आहेत.

खोरी नावाच्या शिवारातील सुरेश जाधव, काशिनाथ जाधव, अविनाश जाधव, बाजीराव लव्हटे, महेश जाधव, भगवान जाधव या सहा शेतकऱ्यांच्या तीन एकरातील ऊस, मका आणि शाळू पीक खाऊन शेतात नासधूस केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून गव्यांचा त्रास शेतकरी सोसत असून अजून किती वर्षे त्रास सोसायचा असा सवाल शेतकऱ्यांनी वनविभागाला केला आहे. जीवावर उदार होऊन रात्री-अपरात्री गव्यांपासून पिकांची राखण करणे हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिला आहे. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त केला नाही तर शेतकऱ्यांना शेती पिकवणे सोडून द्यावी लागेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीforest departmentवनविभाग