शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दरेवाडीत गव्यांच्या कळपाचा वावर, तीन एकरातील शेती पिकांचा केला सुपडासाफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:34 IST

शेती पिकवायची की सोडून द्यायची असा सवाल शेतकऱ्यांनी वनविभागाला केला

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी येथील खोरी नावाच्या शिवारातील तीन एकरातील शेती पिकांचा गव्यांच्या कळपाने सोमवारी पहाटे सुपडासाफ केला. आसुर्ले-पोर्ले परिसरातील डोंगराकडच्या शेती पिकांची पंधरा दिवसांपासून गव्यांच्या कळपाकडून नासधूस सुरू आहे. वन्यप्राण्यांचा त्रास आणि नुकसान भरपाईच्या कागदपत्रांसाठी कराव्या लागणाऱ्या त्रासाचा अनुभव पाहता शेतकरी डोंगराकडची शेती पिकवायची की सोडून द्यायची या विचारात आहेत.पावनगडाच्या जंगलात ३० ते ३५ गव्यांचा कळप तळ ठोकून आहे. दिवसभर जंगलात विसावा घ्यायचा आणि सायंकाळनंतर अन्न पाण्याच्या शोधात लोकवस्तीत उतरण्याचा गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांचा नित्यक्रम आहे. रोज वेगवेगळ्या शिवारातील शेती पिके खाताना गवे शेतीची पुरती वाट लावत आहेत. कष्ट करून आणि पैसा घालून वाढीस लावलेल्या पिकांचा गवे एका रात्रीत फडशा पाडत आहेत.

खोरी नावाच्या शिवारातील सुरेश जाधव, काशिनाथ जाधव, अविनाश जाधव, बाजीराव लव्हटे, महेश जाधव, भगवान जाधव या सहा शेतकऱ्यांच्या तीन एकरातील ऊस, मका आणि शाळू पीक खाऊन शेतात नासधूस केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून गव्यांचा त्रास शेतकरी सोसत असून अजून किती वर्षे त्रास सोसायचा असा सवाल शेतकऱ्यांनी वनविभागाला केला आहे. जीवावर उदार होऊन रात्री-अपरात्री गव्यांपासून पिकांची राखण करणे हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिला आहे. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त केला नाही तर शेतकऱ्यांना शेती पिकवणे सोडून द्यावी लागेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीforest departmentवनविभाग