शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

‘सावली’तील हेमंत!

By admin | Updated: April 13, 2017 20:14 IST

-समाजभान

स्त्यावर भटकणारा, सतत काहीतरी हळू आवाजात पुटपुटणारा हेमंत आता ‘सावली’त बहरला आहे. ज्याच्याकडे लोक बघायचेही नाहीत, बघितलं तरी असेल कुणीतरी वेडा असं समजून पुढं जायचे तोच हा हेमंत. ज्याला ‘लोकमत’च्या वृत्ताने सावली मिळाली अन् सावलीच्या आधाराने तो आज स्वावलंबी बनला आहे. तुम्ही म्हणाल कोण हा हेमंत? तोच तो हेमंत साळोखे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी दसरा चौक ते कसबा बावडा रस्त्यावरील जयंती नाल्याजवळच्या फूटपाथवर नेहमी दिसायचा. जवळजवळ आठ महिने फूटपाथ हेच त्याचे घर होतं. पावसाळा सुरू झाला तरी त्याचं वास्तव्याचं ठिकाण काही बदललं नाही. दिवस असो की रात्र, ऊन असो की पाऊस. तो फूटपाथवरच असायचा. दाढी वाढलेली, अंगावर मळकट फाटके कपडे. भर पावसातही तो फूटपाथ सोडायचा नाही. पाऊस गेल्यानंतर ओल्या कपड्यानिशीच तेथेच तो झोपी जायचा. ‘लोकमत’मधील मुरलीधर कुलकर्णी या संवेदनशील पत्रकाराने त्याची ही अवस्था पाहिली आणि ‘त्या अश्राप जिवाला हवाय निवारा$’ या शीर्षकाखाली त्याची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली. ती वाचून लगेच संभाजीनगरातील ‘सावली केअर सेंटर’चे किशोर देशपांडे यांनी रुग्णवाहिका पाठवून हेमंतला ‘सावली’मध्ये नेले. हेमंत सांगत होता त्याप्रमाणे त्याच्या नातेवाइकांचा शोध घेतला; पण जवळचे कोणी मिळाले नाहीत. जे मिळाले त्यांनी जबाबदारी झटकली अन् सावली हेच हेमंतचे घर बनले. तेथील सेवा सुश्रुषा व उपचारांमुळे हेमंत बरा झाला. त्याचा मानसिक रोग पळून गेलाय. सर्वसामान्य माणसाप्रमाणे तो व्यवहार करूलागला. हे पाहून देशपांडे यांनीही त्याला स्वावलंबी बनण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. एका अर्थाने नोकरीच दिली. कारण महिन्यातील किमान २० दिवस तरी तो तेथील रुग्णांची मनापासून सेवा करीत, प्रसंगी वॉचमनचे कामही करतो. रुग्णांना वर्तमानपत्रे वाचून दाखवितो. ‘लोकमत’ची एक बातमी अन् तिला ‘सावली’ने दिलेल्या प्रतिसादामुळे एक मनोरुण अन् अनाथ बनलेला हेमंत माणसात आला आहे. सावली केअर सेंटर हे निराधार अन् घरात अडसर(?) ठरू लागलेल्या लोकांसाठीचे आश्रयस्थान आहे. सध्या येथे २७ जण आहेत. यातील अनेकजण वृद्ध अन् आजारी आहेत. त्यांचे संगोपन अन् उपचार करून त्यांना मायेची सावली देण्याचा प्रयत्न येथे केला जातो. ‘सावली’त दाखल झालेले; पण आजारी असलेली काही मंडळी बरे झाल्यानंतर सावलीच्या कार्यातही हातभार लावू लागतात, असे देशपांडे सांगतात. आतापर्यंत सावलीने सुमारे ५०० जणांना असा आधार दिला आहे. हे झाले हेमंत अन् सावलीचे. माणूस मनोरुग्ण का बनतो. नैराश्यातून, सततच्या अपयशातून, होणाऱ्या हेटाळणीमुळे किंवा काही वैद्यकीय कारणेदेखील यामागे असू शकतील. आपल्या आसपासही असे मनोरुग्ण अधूनमधून दिसत असतात, अशा लोकांना आधार दिला तर ते बरे होऊ शकतात. यासाठी घरातील मंडळींबरोबरच शेजारी-पाजारी आणि मित्रमंडळींची भूमिका महत्त्वाची ठरते. किमान स्वत:ला काही करता आले नाही तरी असे कार्य करणाऱ्या एखाद्या संस्थेत संबंधित व्यक्तीला दाखल करणे किंवा कळविणे एवढे तरी आपण नक्कीच करू शकतो. ‘सावली’सारख्या अनेक संस्था असे कार्य करीत असतात. वृद्ध आई-वडील किंवा सासू-सासरे, शारीरिकदृष्ट्या असाहाय्य, मतिमंद, मनोरुग्ण अशांना अशा संस्था हाच आधार असतो. तेथेच त्यांच्या आयुष्यातील उत्तरार्ध घालवावयाचा असतो. तो चांगला जावा. यासाठी त्या संस्था त्यांच्यापरीने प्रयत्न करीत असतात. सेवाभावी वृत्तीने असे कार्य करणाऱ्या संस्थांनाही समाजातील दानशूर मंडळी आणि संस्थांनी मदत केली पाहिजे. हातभार लावला पाहिजे. - चंद्रकांत कित्तुरे ‘ङ्म’’ङ्म‘ें३स्र१ं३्र२ं@िॅें्र’.ूङ्मे