शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Kolhapur: विषबाधा प्रकरणात घेतली जातेय ‘फॉरेन्सिक’ची मदत, विषाच्या प्रकारावरून घेणार संशयितांचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:45 IST

सर्व शक्यतांची पडताळणी सुरू

कोल्हापूर : मांडरे (ता. करवीर) येथील विषबाधा प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. दोन सख्ख्या भावांचा मंगळवारी (दि. ३) उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर करवीर पोलिसांनी याचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे. मृतांच्या शरीरात कोणत्या प्रकारचे विष होते, याचा उलगडा करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची मदत घेतली जात आहे. त्यांचा अहवाल येताच विषाच्या प्रकारावरून यातील खरी वस्तुस्थिती आणि संशयितांचा शोध घेता येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.मांडरे येथे मुंगूस चावून दगावलेल्या कोंबडीचे मांस खाल्ल्याचे निमित्त झाले आणि वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू झाला. तिसरा मुलगा अत्यवस्थ आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पाटील पिता-पुत्रांना अन्नातून विषबाधा झाली की त्यांच्यावर कोणी विषप्रयोग केला? याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. मंगळवारी दगावलेल्या दोघांचा व्हिसेरा राखीव ठेवला आहे. त्यांच्या पोटातील काही अवयवांचे अंश तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. या तपासणीतून मृतांच्या पोटातील विषाची माहिती मिळणार आहे. विष कोणत्या प्रकारचे होते? ते किती प्रमाणात घेतले होते? कोणत्या अवयवांवर त्याचा परिणाम झाला? याची माहिती पोलिसांना मिळेल.फॉरेन्सिकच्या अहवालानंतर पोलिसांच्या तपासाला गती येणार आहे. विषाचा प्रकार समजताच ते कोणत्या ठिकाणाहून खरेदी केले असेल? कोणी खरेदी केले असेल? याचा शोध घेण्यात पोलिसांना मदत होणार आहे. विषप्रयोग झाला नसेल तर अन्नातील कोणत्या दोषामुळे त्याचे विषात रूपांतर झाले याचाही शोध घेता येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.नातेवाइकांची चौकशीपाटील कुटुंबातील कृष्णात यांची पत्नी गंगा हिच्यावर काही ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी गंगा यांच्यासह त्यांच्या आईची चौकशी केली. मात्र, त्यांच्या चौकशीतून अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. गंगा या त्यांच्या मुलीसह माहेरी आहेत. गरज पडल्यास पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचे निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.

पोलिसांसमोर आव्हानविषबाधेप्रकरणी करवीर पोलिसांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक शिंदे यांनी पोलिस ठाण्यातील सर्व अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेऊन त्यांना तपासाबद्दल सूचना दिल्या. समाजमनावर परिणाम करणारी ही घटना असल्याने दोषींना शोधून काढण्यासाठी सर्व कौशल्य पणाला लावण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfood poisoningअन्नातून विषबाधाPoliceपोलिस