शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

Kolhapur: विषबाधा प्रकरणात घेतली जातेय ‘फॉरेन्सिक’ची मदत, विषाच्या प्रकारावरून घेणार संशयितांचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:45 IST

सर्व शक्यतांची पडताळणी सुरू

कोल्हापूर : मांडरे (ता. करवीर) येथील विषबाधा प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. दोन सख्ख्या भावांचा मंगळवारी (दि. ३) उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर करवीर पोलिसांनी याचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे. मृतांच्या शरीरात कोणत्या प्रकारचे विष होते, याचा उलगडा करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची मदत घेतली जात आहे. त्यांचा अहवाल येताच विषाच्या प्रकारावरून यातील खरी वस्तुस्थिती आणि संशयितांचा शोध घेता येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.मांडरे येथे मुंगूस चावून दगावलेल्या कोंबडीचे मांस खाल्ल्याचे निमित्त झाले आणि वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू झाला. तिसरा मुलगा अत्यवस्थ आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पाटील पिता-पुत्रांना अन्नातून विषबाधा झाली की त्यांच्यावर कोणी विषप्रयोग केला? याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. मंगळवारी दगावलेल्या दोघांचा व्हिसेरा राखीव ठेवला आहे. त्यांच्या पोटातील काही अवयवांचे अंश तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. या तपासणीतून मृतांच्या पोटातील विषाची माहिती मिळणार आहे. विष कोणत्या प्रकारचे होते? ते किती प्रमाणात घेतले होते? कोणत्या अवयवांवर त्याचा परिणाम झाला? याची माहिती पोलिसांना मिळेल.फॉरेन्सिकच्या अहवालानंतर पोलिसांच्या तपासाला गती येणार आहे. विषाचा प्रकार समजताच ते कोणत्या ठिकाणाहून खरेदी केले असेल? कोणी खरेदी केले असेल? याचा शोध घेण्यात पोलिसांना मदत होणार आहे. विषप्रयोग झाला नसेल तर अन्नातील कोणत्या दोषामुळे त्याचे विषात रूपांतर झाले याचाही शोध घेता येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.नातेवाइकांची चौकशीपाटील कुटुंबातील कृष्णात यांची पत्नी गंगा हिच्यावर काही ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी गंगा यांच्यासह त्यांच्या आईची चौकशी केली. मात्र, त्यांच्या चौकशीतून अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. गंगा या त्यांच्या मुलीसह माहेरी आहेत. गरज पडल्यास पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचे निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.

पोलिसांसमोर आव्हानविषबाधेप्रकरणी करवीर पोलिसांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक शिंदे यांनी पोलिस ठाण्यातील सर्व अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेऊन त्यांना तपासाबद्दल सूचना दिल्या. समाजमनावर परिणाम करणारी ही घटना असल्याने दोषींना शोधून काढण्यासाठी सर्व कौशल्य पणाला लावण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfood poisoningअन्नातून विषबाधाPoliceपोलिस