कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर संततधार सुरू आहे. धरण क्षेत्रातही धुवांधार पाऊस कोसळत असून, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. धरणातील विसर्ग वाढल्याने सर्वच नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून, पंचगंगा नदी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली आहे.पंचगंगेची पातळी ३२ फुटांपर्यंत पोहचली असून, दिवसभरात साडेतीन फुटाने पाणी वाढले. विविध नद्यांवरील ४५ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ‘घटप्रभा’पाठोपाठ गगनबावडा तालुक्यातील ‘कोदे’ धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.सोमवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर एकसारखा पाऊस कोसळत आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला होता. त्यामुळे दिवसभर संततधार सुरू राहिली. धरणक्षेत्रात तर धुवांधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली, तरी चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी धरणक्षेत्रात १३९, तर दूधगंगा धरणक्षेत्रात १५१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ३१००, तर वारणातून १७०० व दूधगंगेतून १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ‘कोदे’ धरण ०.२१ टीएमसी क्षमतेचे असून, त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेच्या पातळीत दिवसभरात साडेतीन फुटांनी वाढ झाली.
झडीचा पाऊस अन् गारठावाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत असल्याने वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे. साधारणत: जुलै-ऑगस्ट महिन्यात अशा प्रकारचा झडीचा पाऊस पडतो. त्याचा अनुभव जून महिन्यातच येत आहे.
‘आर्द्रा’चा जोर..‘मृग’ नक्षत्रातही जोरदार पाऊस काेसळला. रविवारी सूर्याने ‘आर्द्रा’ नक्षत्रात प्रवेश केला आहे. वाहन ‘उंदीर’ असून, या नक्षत्राने सलामीच जोरदार दिली आहे.
एसटीचे तीन मार्ग अंशत: बंदबंधाऱ्यावर पाणी असल्याने अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू असली, तरी एसटीचे तीन मार्ग अंशत: बंद झाले आहेत.