शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान, कारखान्यांना बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 12:13 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत गेल्या आठ-दहा दिवसांपासून अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. त्यामध्ये साखर उद्योगाला ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत गेल्या आठ-दहा दिवसांपासून अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. त्यामध्ये साखर उद्योगाला अधिक फटका बसला असून सहा दिवसांत केवळ 7 लाख ५६ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. कारखान्यांची दिवसाची गाळप क्षमता पाहता किमान ६ लाख ९६ हजार टनाने गाळप घटल्याचे निदर्शनास आले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तमिळनाडू, आंध्रप्रदेशसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठा तडाका बसला. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात सलग आठ दिवस पाऊस राहिल्याने दैनंदिन कामकाजात अडचणी निर्माण झाल्या होत्या. सगळ्यात अधिक फटका साखर कारखाने, गुऱ्हाळघरे, वीटभट्टीमालकांना बसला आहे. त्याचबरोबर भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात १५ ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असला तरी परतीच्या पावसाने १ नोव्हेंबरपासूनच हंगामाला गती आली होती. हंगाम गती पकडत असतानाच अवकाळी पावसाने पुन्हा काहीसा ‘ब्रेक’ लावला. गेली आठ-दहा दिवस रोज पावसाची हजेरी असल्याने कारखान्यांचा गळीत हंगाम थंडावला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात २३ कारखान्यांची प्रतिदिनी १ लाख २६ हजार टन तर सांगली जिल्ह्यातील १८ कारखान्यांची ८२ हजार ७५० टन गाळप क्षमता आहे. १५ नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्ह्यात १९ लाख १९ हजार टन तर सांगलीमध्ये ९ लाख ४ हजार टन असे २८ लाख २४ हजार टन गाळप झाले होते. त्यानंतर पाऊस सुरू झाल्याने हंगामाची गती मंदावली, शिवारात पाणी उभा राहिल्याने ऊसतोड करता येत नाही. परिणामी गेल्या सहा दिवसांत कोल्हापुरातील कारखान्यांचे २ लाख ४७ हजार टन तर सांगलीतील कारखान्याचे ३ लाख ९ हजार टन गाळप झाले आहे. कारखान्यांची गाळप क्षमता पाहता दोन्ही जिल्ह्यांत जवळपास ६ लाख ९६ हजार टनाने गाळप कमी झाले आहे.

कारखान्यांबरोबर शेतकऱ्यांनाही फटका

सुरुवातीच्या टप्यात आडसाल लागणीची तोडणी सुरू आहे. त्यामुळे ओलीवर तोडणी झाली तर खोडव्याची उगवण होत नाही. त्याचबरोबर सततच्या पाण्याने उसाचे वजन कायम राहिले, मात्र, साखर उताऱ्याला झटका बसला आहे. कोल्हापूर व सांगलीचा सरासरी उतारा ९.७ टक्यापर्यंत खाली आला आहे.

तुलनात्मक उसाचे गाळप टनात -

कोल्हापूर - १९ लाख १९ हजार, २१ लाख ६६ हजार

सांगली - ९ लाख ४ हजार, १२ लाख १३ हजार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेRainपाऊस