शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर; ‘राजाराम’सह चार बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 12:07 IST

पंचगंगेची पातळी १६.५ फुटांवर

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून पावसाने काहीसा जोर पकडला आहे. सोमवारी दिवसभर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असून, पंचगंगेची पातळी १६.५ फुटांवर गेली आहे. ‘राजाराम’ बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे.हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. रविवारी दिवसभर उघडझाप सुरू होती, मात्र रात्रीपासून पावसाने काहीसा जोर पकडला आहे. सोमवारी सकाळीही अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरण ५२ टक्के, वारणा ४५, तर दूधगंगा २१ टक्के भरले आहे.नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून, पंचगंगा नदीची पातळी सोमवारी दिवसभरात फुटाने वाढली आहे. पंचगंगा नदीवरील कसबा बावडा ते वडणगेला जोडणारा ‘राजाराम’ बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर रुई, शिंगणापूर, इचलकरंजी हे बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. आज, मंगळवारीही जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कोसळणाऱ्या सरीमुळे पाणी पाणीसोमवारी दिवसभर अधूनमधून पाऊस झाला असला तरी सरी जोरदार होत्या. पाच-दहा मिनिटांत सगळीकडे पाणी पाणी व्हायचे.

रोप लावणीसाठी पुन्हा धांदलमध्यंतरी दोन-तीन दिवस पावसाने उसंत घेतल्याने भाताची रोप लावणी खोळंबली होती. सोमवारी जोरदार पाऊस सुरू झाल्याने रोप लावणीसाठी जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यांत धांदल उडाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस