शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गगनबावड्यात अतिवृष्टी; पंचगंगेच्या पातळीत पाच फुटाने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 11:54 IST

वारणा धरणातून विसर्ग वाढवला

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून पावसाने जोरदार सुरुवात केली. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस होत असल्याने राधानगरी व दूधगंगा धरणातून विसर्ग कायम असला तरी वारणातून विसर्ग वाढला आहे. नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात तब्बल पाच फुटाने वाढली असून, विविध नद्यांवरील ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा तालुक्यात तब्बल ११३.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.सोमवारी रात्रीपासून वातावरणात कमालीचा बदल होऊन पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. मंगळवारी पहाटेपासून तर एकसारख्या पावसाने झोडपून काढले. सकाळी ११ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतर उघडीप दिली. पण, अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३२.४ मिलीमीटर व पन्हाळ्यात ४४.४ मिमी, शाहूवाडीत ५३.६, राधानगरीत ३२.९, तर गगनबावड्यात ११३.४ मिमी पाऊस झाला.धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असून, राधानगरी धरण क्षेत्रात चोवीस तासांत तब्बल १२१ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरण ८७ टक्के भरले असून, त्यातून प्रतिसेकंद ३१०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरण ८२ टक्के भरले आहे, त्यातून ८५३०, तर दूधगंगा धरण ७१ टक्के भरल्याने त्यातून १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता पंचगंगा २१ फुटावर होती. रात्री ८ वाजेपर्यंत २६ फुटांच्या वर गेली. दिवसभरात १७ नवीन बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.