शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

‘आयुष अ‍ॅप’ तयार झाल्यावरच होणार आरोग्य सर्व्हेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 11:12 IST

सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ५० वर्षांपुुढील ज्येष्ठ व व्याधिग्रस्त व्यक्तींचे आरोग्य प्रबोधन केले जाणार आहे. यामध्ये त्यांनी काय व्यायाम करायचा, कोणता आहार घ्यायचा यांसह धूम्रपान करू नये, अशी माहितीपर पत्रके वाटली जाणार आहेत.

ठळक मुद्देआयुष’ समितीकडून कृती आराखडा तयार : औषधांसाठी लागणार निधी

कोल्हापूर : जिल्ह्यातील ५० वर्षांपुुढील ज्येष्ठ व व्याधिग्रस्त व्यक्तींच्या सर्वेक्षणासाठी ‘अ‍ॅप’ तयार झाल्यावर, तसेच औषधांसाठी निधी व साधनांची उपलब्धता झाल्यानंतरच मुहूर्त लागणार आहे. सर्वेक्षणासंदर्भात ‘आयुष’ समितीकडून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय व आयुष समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे ११ लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात येईल, असे निर्देश दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. हे सर्वेक्षण आशा वर्कर्सच्या माध्यमातून मोबाईलवर आधारित ‘आयुष’ या अ‍ॅपद्वारे करण्यात येणार होते; परंतु अद्याप हे अ‍ॅप विकसित करण्याचे काम सुरू आहे. तसेच या सर्वेक्षणासाठी येणारा खर्च, तसेच ज्येष्ठांसाठी लागणा-या औषधांसाठी येणारा खर्च या संदर्भात वर्कआऊट सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर ‘आशा वर्कर्स’ना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

या संदर्भात आयुष समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश साळे यांनी आढावा घेऊन कृती आराखडा तयार केला आहे. लवकरच हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ५० वर्षांपुुढील ज्येष्ठ व व्याधिग्रस्त व्यक्तींचे आरोग्य प्रबोधन केले जाणार आहे. यामध्ये त्यांनी काय व्यायाम करायचा, कोणता आहार घ्यायचा यांसह धूम्रपान करू नये, अशी माहितीपर पत्रके वाटली जाणार आहेत.

 

जिल्ह्यातील ५० वर्षांपुुढील ज्येष्ठ व व्याधिग्रस्त व्यक्तींच्या सर्वेक्षणासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत आढावा बैठक घेण्यात आली आहे. यामध्ये कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ‘अ‍ॅप’ विकसित झाल्यानंतर या सर्वेक्षणाला सुरुवात केली जाईल.- डॉ. योगेश साळे, अध्यक्ष, आयुष समिती

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस