शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
3
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
4
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
5
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
6
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
7
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
8
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
9
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
10
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
11
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
12
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
13
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
14
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
15
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
16
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
17
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
19
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
20
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”

बेदखल कोठड्या बनताहेत पोलिसांची डोकेदुखी

By admin | Updated: January 30, 2017 00:55 IST

पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष : कोठडी अद्ययावत हव्या; जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालणे गरजेचे

एकनाथ पाटील ल्ल कोल्हापूरजिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतील कोठडींची दुरवस्था झाली आहे. अस्वच्छ परिसर, उंदीर-घुशींचा वावर, डासांचा प्रादुर्भाव अशा बिकट परिस्थितीत आरोपींना ठेवावे लागत आहे. आरोपींच्या जीवितास धोका पोहोचला, तर पोलिसांच्या नोकरीवर पाणी फिरलेच म्हणून समजा. शिवाय वेळप्रसंगी शिक्षाही भोगावी लागते. या बेदखल कोठड्या पोलिसांची डोकेदुखी बनल्या आहेत. पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी पोलिस ठाण्यातील कोठड्यांची पाहणी करून त्या अद्ययावत व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यांत गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या आरोपींना ठेवण्यासाठी स्वतंत्र १०+१२ किंवा १२+२० रुंदी-लांबीची कोठडी आहे. या कोठडीमध्ये रात्री-अपरात्री आरोपींना लघुशंकेसाठी छोटेसे स्वच्छतागृह आहे. त्याशिवाय ती खोली पूर्णत: मोकळी असते. कोणतीही वस्तू, फॅन यांची सुविधा नसते. कोठडीसमोर चोवीस तास सुरक्षारक्षक तैनात केलेला असतो. त्याला कोठडीतील आरोपींच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. शहरात करवीर, जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी पोलिस ठाण्यांमध्ये आरोपींना ठेवण्यासाठी स्वतंत्र कोठडी आहे. राजवाडा पोलिस ठाण्यामध्ये १०+१० ची छोटीशी कोठडी आहे. तर लक्ष्मीपुरीमध्ये १०+१२ ची कोठडी आहे. करवीर आणि राजारामपुरीच्या कोठड्या मोठ्या आहेत. या सर्व कोठडींची दुरवस्था झालेली दिसून येते. आरोपींनी केलेल्या लघुशंकेची दुर्गंधी, झाडलोट नसल्याने उंदीर-घुशींचा वावर आहे. या कोठड्यांमध्ये आरोपींचा जीव कोंडला जात आहे. पोलिस ठाण्यांच्या कोठडीमध्ये आरोपींच्या जिवाला धोका पोहोचेल, अशी कोणतीही वस्तू न ठेवण्याचे आदेश आहेत. जिल्ह्णांतील बहुतांश पोलिस ठाण्यांच्या कोठडीमध्ये घोंगडे, चादर, बेडशीट पडलेली दिसून येते. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीमध्येच अरुण पांडव या आरोपीचा मृत्यू झाला. वादग्रस्त वडगाव पोलिस ठाण्यामध्ये चार वर्षांपूर्वी तिघा आरोपींनी गळफास घेऊन आत्महत्या केली. जगदीश उर्फ सनी प्रकाश पोवार या तरुणाचा कोठडीतील मृत्यू. या घटनांच्या धगीमध्ये अधिकाऱ्यांसह पोलिस होरपळून गेले. याची पुनरावृत्ती पुन्हा घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने योग्य ती दक्षता घेणे गरजेचे आहे.आरोपींना घरगुती जेवण पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींना पोलिसांकडून दोन चपाती व भाजी दिली जात होती. गृहविभागाने जेवणासाठी दिले जाणारे अनुदान बंद केल्याने सध्या आरोपींना घरचे जेवण दिले जात आहे. हे जेवण पोलिसांना नेहमी तपासून द्यावे लागते. कौटुंबिक वादातील आरोपींना त्यांच्या जिवाला धोका पोहोचू नये, म्हणून पोलिस स्वत:चे पैसे खर्च करून जेवण देतात. पोलिस प्रशासनाने सरकारी जेवण पुन्हा सुरू करण्यासाठी कोणत्याही स्तरावर प्रयत्न केलेले दिसत नाहीत. त्याचा त्रास मात्र पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे.