शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

हसन मुश्रीफ यांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान-: शेट्टी, चंद्रकांत पाटील यांच्यानंतर फडणवीस यांना घेतले अंगावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 1:06 AM

राज्य सरकारच्या पावणेचार वर्षांतील कामकाजाचा कारभार चव्हाट्यावर मांडत राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देकारभाराचा पंचनामा

कोल्हापूर : राज्य सरकारच्या पावणेचार वर्षांतील कामकाजाचा कारभार चव्हाट्यावर मांडत राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. निवडणुकीतील आश्वासनांचा फज्जा उडाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना उपाहासात्मक ‘आऊट स्टँडिंग चीफ मिनिस्टर’ पुरस्कार देऊन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर राज्याच्या पातळीवर अनुभवी विरोधक म्हणून दोन्ही काँग्रेसमधील नेते अधिक आक्रमक होतील, असे वाटत होते; पण तसे झाले नाही, ऊस दरासह इतर प्रश्नांबाबत राष्टÑवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचा अपवादवगळता विरोधक फारसे आक्रमक राहिले नाहीत.

उसाची एफआरपी, साखरेचे दर आणि शेतकरी संघटनांची भूमिका यावर राज्यात पहिल्यांदा आमदार मुश्रीफ यांनीच आवाज उठवला. थेट खासदार राजू शेट्टी यांच्यासह तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना अंगावर घेतले. विरोधातील एकही आमदार सरकारच्या कारभारावर बोलत नव्हता, त्यावेळी मुश्रीफ यांनी पश्चिम महाराष्टÑात राजू शेट्टी व मंत्री चंद्रकांत पाटील यांना जखडून ठेवण्याचे काम केले. त्या रागातून मंत्री पाटील यांनी मुश्रीफ यांना अनेकवेळा खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तरीही नोटाबंदी, कर्जमाफीसह प्रत्येक मुद्द्यावर आमदार मुश्रीफ यांनी मंत्री पाटील व पर्यायाने भाजप सरकारला सातत्याने कोंडीत पकडले.

आता त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकारच्या पावणेचार वर्षांच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी त्यांनी अभिनव आंदोलन हातात घेतले. भाजपने निवडणुकीत दिलेली आश्वासने व सध्याच्या स्थितीवर बोट ठेवत थेट सरकारला प्रश्न करत मुख्यमंत्र्यांना उपहासात्मक ‘आऊट स्टॅँडिंग चीफ मिनिस्टर’ पुरस्कार दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपहासात्मक पुरस्काराचे वितरण करून मुख्यमंत्र्यांनाच आता आव्हान दिले आहे.

नोटाबंदी, कर्जमाफी, पेट्रोल-डिझेलची दरवाढ, प्राथमिक शाळा बंद, मराठा-लिंगायत-मुस्लिम-धनगर समाज आरक्षण, राज्यातील कायदा सुव्यवस्था, विकासकामे आदींवरून सामान्य जनतेच्या मनातील प्रश्नांना हात घालून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मुश्रीफ यांनी केला. त्यामुळे हे आंदोलन अभिनव झालेच पण तितकेच प्रभावीही होऊ शकले.आंदोलनाची राज्यभर चर्चाआमदार मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या अभिनव आंदोलनाची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू आहे. अशाप्रकारचे उपहासात्मक आंदोलन महाराष्टÑात केवळ कोल्हापुरात करून मुश्रीफ यांनी सर्व विरोधी पक्षांनी लक्ष वेधून घेतले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस