शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

मुश्रीफांनी बहुजनांची घराणी संपवली, पदाधिकाऱ्यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 11:50 IST

'विधानसभेची काळजी करू नका'

कोल्हापूर : हसन मुश्रीफ यांच्यासारख्या सैतानी नेतृत्वाने जिल्ह्यातील उदयसिंगराव गायकवाड, दिग्विजय खानविलकर, निवेदिता माने, बाबासाहेब कुपेकर यांच्यासह अनेक बहुजनांची राजकीय घराणी संपवली, असा खळबळजनक आरोप बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला संपवल्यानेच पक्षाची वाताहात झाल्याचेही अनेकांनी भूमिका मांडली.पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला, या वेळी कार्यकर्त्यांनी पोटतिडकीने भावना व्यक्त केल्या. अनिल घाटगे, मुकुंदराव देसाई, शिवानंद माळी, वैभव कांबळे, प्रकाश पाटील, शिवाजीराव सावंत, श्रीकांत पाटील, पद्मजा तिवले, नितीन पाटील, उदयसिंग पाटील, अश्विनी माने, शायली महाडिक, नागेश कोळी, शिवाजीराव खोत, अमर चव्हाण, आप्पासाहेब क्वाने, बी. के. डोंगळे, एकनाथ देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.यावर, पक्षाध्यक्ष शरद पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीची काळजी करू नका, महाराष्ट्रातील जनतेने भाजप व पळून गेेलेल्यांना घरी बसवण्याचे ठरवले आहे. ज्या जागा मिळतील त्यासह मित्रपक्षांसाठीही ताकदीने कामाला लागा. दरम्यान, काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.बैठकीला जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, समरजीत घाटगे, राजीव आवळे, मदन कारंडे, नंदिनी बाभूळकर, रामराजे कुपेकर आदी उपस्थित होते.

‘राधानगरी’ची केस हाताबाहेरचीपक्ष फुटल्यानंतर राधानगरीत एकही बडा नेता आपल्यासोबत नव्हता, आता उमेदवारीसाठी येत आहेत. येथे धनशक्तीविरोधात जनशक्ती अशी लढाई व्हावी, अशी मागणी संतोष मेंगाणे यांनी केली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मुकुंदराव देसाई यांनी आजरा तालुक्यातील राजकारण सांगताना ‘राधानगरी’मधून के. पी. पाटील व ए. वाय. पाटील इच्छुक आहेत. आता मेरिटवर कोणाला उमेदवारी द्यायची हे तुम्हीच ठरवा, ही केस हाताबाहेरची असल्याचे सांगितले.साटेलोट्याचे राजकारण घातकशिवानंद माळी यांनी जिल्हा बँक व ‘गोकूळ’ दूध संघाचे राजकारण काही मंडळी एकत्र करत आहेत. यातून मी तुमच्या मतदारसंघात लक्ष देत नाही, तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका, असे साटेलोटे सुरू आहे. हे घातक असल्याचे सांगितले.

आवळेंची ‘मिरज’मधून तयारीहातकणंगलेचे माजी आमदार राजीव आवळे यांना संधी देण्याची मागणी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केली. आघाडीत हातकणंगले काँग्रेसला जाणार असल्याने आवळे यांनी मिरजमधून तयारी केल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी उघड केले.

‘व्ही. बी., आर. के.’ ‘पद्माची नोंद घ्यापंधरा वर्षे सत्तेचा लाभ घेतलेले लाभार्थी पळून गेले, पण आम्ही ठाम राहिलो. लोकसभेची आमची जागा काँग्रेसला दिली, त्यामुळे ‘कोल्हापूर उत्तर’ची जागा आम्हाला मिळाली पाहिजे. येथून व्ही. बी. पाटील व आर. के. पोवार यांच्यापैकी कोणालाही संधी द्या. ते दोघे नाही म्हटले तर मी लढायला तयार असल्याचे पद्मजा तिवले यांनी सांगितले. यावर, ‘व्ही. बी., आर. के.’ पद्माची नोंद घ्या आणि सावध राहा, असे शरद पवार यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसHasan Mushrifहसन मुश्रीफ