शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Har Ghar Tiranga: ये जुनून है... कृष्णा नदीत ९ किलोमीटर पुरातून पोहत फडकविला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 16:07 IST

Har Ghar Tiranga: कृष्णामाई जलतरण मंडळाचा पुढाका, हरिपूर ते उदगावचा प्रवास

कोल्हापूर/ उदगाव : आझादीचा अमृत महोत्सव कृष्णामाई जलतरण मंडळाच्या सदस्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. अमृत महोत्सव निमित्तानेआज १४ ऑगस्ट रोजी आझादीच्या अमृतमहोत्सवी निमित्त हातात तिरंगा ध्वज घेऊन मंडळातील सदस्यांनी  हरिपूर (ता.मिरज )येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमापासून ते उदगाव ता.शिरोळ येथील कृष्णाघाट पर्यत तब्बल ९ किलोमीटरचे अंतर १ तास १० मिनिटांमध्ये महापुरातून साहसी जलप्रवास पूर्ण करण्यात आले. यामध्ये मंडळाच्या २२ जणांचा समावेश होता.

‌उदगाव (ता.शिरोळ) येथील कृष्णमाई जलतरण मंडळातर्फे अनेक विधायक कामे हाती घेतलेली आहेत. कृष्णाघाट वरील स्वच्छता, ब्रिटीश कालीन पुलावरील दगडी बांधकामातील अनावश्यक झाडे तोडणे, पर्यावरण स्वच्छ ठेवणे तसेच असंख्य मुलामुलींना मोफत पोहण्यास शिकवणे तसेच हरिपूर ते उदगाव कृष्णाघाट व कृष्णाघाट उदगाव ते मिरज असा जवळपास २० किलोमीटर अंतराचा साहसी जलप्रवासाच्या स्पर्धा आयोजित करणे इत्यादी उपक्रम राबवून साहसी शालेय मुला मुलींना प्रोत्साहनपर बक्षिसे देवून गौरविणे अशी अनेक कामे केली जात आहेत. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा घालून ७०० ते ८०० लोकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करणे तसेच मे महिन्यामध्ये बालवाडी पासून ते कॉलेजच्या विध्यार्थी साठी पोहण्याच्या स्पर्धा आयोजित केली जातात.

तर सद्या ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन देश साजरा करीत आहे. या पार्श्वभूमीवर उदगाव येथील कृष्णमाई जलतरण मंडळानेही ९ किलोमीटर अंतरावर हातात तिरंगा घेऊन पोहत येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी पहाटे या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये राजू कलगुटगी, प्रा.सुनिल बनहट्टी, जयपाल मगदूम, गणेश पाचंगे, नितीन पाटील,तानाजी जाधव,महेश महाडिक, ऋषभ पाटील,विक्रम घाटगे, संतोष चुडाप्पा, कोळेकर अण्णा,बाळासो चौगुले तसेच मंडळाचे अनेक सदस्यांनी पुढाकार घेऊन पोहत तिरंगा फडकवत हरिपूर पासून उदगाव पर्यत आणण्यात आला. हा उपक्रम पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदी