शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुलगी जन्माला येता घरात सुख वाटाया लागलं...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 14:47 IST

‘जागा झालाय समाज आज, मुलगी जन्माला येता घरात सुख वाटाया लागलं’, ‘ माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’, अशा गीतांचे सादरीकरण करीत शाहिरांनी शिवाजी विद्यापीठात गुरुवारी ‘थाप डफावर मार शाहिरा’ कार्यक्रमात रंगत आणली.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात ‘थाप डफावर मार शाहिरा’ रंगलेप्रशिक्षण शिबिराचा समारोप

कोल्हापूर : ‘जागा झालाय समाज आज, मुलगी जन्माला येता घरात सुख वाटाया लागलं’, ‘ माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’, अशा गीतांचे सादरीकरण करीत शाहिरांनी शिवाजी विद्यापीठात गुरुवारी ‘थाप डफावर मार शाहिरा’ कार्यक्रमात रंगत आणली.राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि विद्यापीठातील अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने वि. स. खांडेकर भाषा भवनमध्ये आयोजित शाहिरी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी हा प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव विलास नांदवडेकर, शाहीर राजू राऊत प्रमुख उपस्थित होते.

सहभागी प्रशिक्षणार्थींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह लोकनायकांना नमन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. गायक राजू नदाफ याने ‘मल्हारवारी मोतीयाने द्यावी भरून’ हे गीत सादर केले. प्रशिक्षणार्थी महेश सोनुले आणि सहकाऱ्यांनी ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’ हे गीत सादर करून शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शाहिरीस मुजरा केला.

शाहीर भारती कोळेकर आणि सहकाऱ्यांनी ‘जागा झालाय समाज आज, मुलगी जन्माला येता घरात सुख वाटाया लागलं’ हे, तर शाहीर माधवी काटकर यांनी ‘वीर मर्द झाशी की राणी’ हा पोवाडा सादर केला. यावेळी भेदिक शाहिरी, शिवरायांचा गोंधळ, महाराष्ट्राचे शाहीर आम्ही व जग बदल घालुनी घाव, आदी पोवाड्यांचे सादरीकरण झाले. याप्रसंगी कलावंत, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. अध्यासनाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.

शाहिरी कलेचे मोठे योगदानमहाराष्ट्राला शाहिरीची प्राचीन परंपरा आहे. शाहिरी कला ही मानवी जीवनात रसनिर्मितीचे सामर्थ्य निर्माण करते. प्रबोधनात्मक परंपरेचा वारसा जिवंत ठेवण्यात शाहिरी कलेने मोठे योगदान दिले असून, ही कला जोपासणे ही काळाची गरज असल्याची भावना डॉ. शिर्के यांनी केली.

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर