शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"देश चंद्रावर पोहोचल्याचा आनंद, पण यवतमाळमध्ये १८ दिवसांत २४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 12:29 IST

पंडित नेहरुंच्या कार्यकाळात देशात इस्रोची स्थापना झाली. पंडित नेहरुंपासून ते आत्ताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वच पंतप्रधानांनी या इस्रोच्या यशस्वीतेसाठी योगदान दिलं

मुंबई/कोल्हापूर - ज्याची भूमिका सत्याची असते त्याला चिंता करण्याचे कारण नाही, असे म्हणतराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातील सभेतून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला. अनिल देशमुख हा गृहमंत्री स्वाभिमानी माणूस होता. त्यांना सांगितले, तुम्ही आमच्या पक्षात या, गटात या आला नाहीत तर तुमची जागा आत आहे. देशमुखांनी स्पष्ट सांगितले. माझी जागा तुरुंगात असो वा कुठेही मी सत्याची साथ सोडणार नाही. कुठलीही तडजोड करणार नाही, असे शरद पवार म्हणाले. येथील भाषणात शरद पवारांनी चंद्रयान ३ मोहिमेच्या यशाचं कौतुक केलं. मात्र, देशात बेकारी आणि शेतकरी आत्महत्या गंभीर असल्याचंही ते म्हणाले. 

पंडित नेहरुंच्या कार्यकाळात देशात इस्रोची स्थापना झाली. पंडित नेहरुंपासून ते आत्ताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वच पंतप्रधानांनी या इस्रोच्या यशस्वीतेसाठी योगदान दिलं. त्यामुळेच, भारताने चंद्रावर आपलं यान यशस्वीपणे उतरवलं. चंद्रावर उतरलेलं हे यान तेथील परिस्थिती माहिती घेईल. तेथे पाणी किती आहे, तेथे शेती करता येईल की नाही, यावर अभ्यास करेल. चंद्रावर सोनं किती आहे, चांदी किती आहे, आणखी काय संपत्ती आहे का? याची माहिती आपल्याला समजेल. या माहितीच्या माध्यमातून मानवजातीच्या अधिक विकासाला गती मिळेल.  मानवाला नवीन ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही. या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करणं ही आपली जबाबदारी आहे, असे म्हणत चंद्रयान ३ मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल शरद पवार यांनी कौतुक करत शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. 

एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे एक चित्र आहे. लोक महागाईने, बेकारीने त्रासलेले आहेत. चंद्रयान मोहिमेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनीही कष्ट केले. महाराष्ट्रातील लोकांनी कष्ट घेतले. पण, दुसरीकडे नव्या पिढीत बेकारीचा संताप बघायला मिळत आहे. आमच्या हाताला काम द्या, कामाला दाम द्या हीच मागणी हा तरुण करुत आहे. तरुणांप्रमाणेच शेतकरीही हीच मागणी करत आहे. आपल्या महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात १८ दिवसांमध्ये २४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जीव देणं ही साधी गोष्ट नाही, कुटुंबाची सगळी जबाबदारी सोडून प्राण सोडायला शेतकरी तयार होतो, याचा अर्थ त्याच्या जीवनात संकट आहे. काय संकट आहे? तर शेतीच्या मालाला किंमत येत नाही. त्यामुळे, कर्ज झालंय. कर्ज फेडल्या जात नाही. म्हणून शेतकऱ्याच्या अब्रूचे धिंदवडे काढले जातात. त्यामुळे, तो टोकाचं पाऊल उचलतो, असे म्हणत शरद पवार यांनी चंद्रयान मोहिमेबद्दल देशाचं कौतुक केलं. पण, दुसरी बाजू मांडताना बेकारी अन् शेतकरी आत्महत्येवरुनही सरकारला लक्ष्य केलं.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबईkolhapurकोल्हापूरChandrayaan-3चंद्रयान-3farmer suicideशेतकरी आत्महत्या