शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

हळदवडेत अनेक कुटुंबे अंधारात : तीन वर्षांपासून वीज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:07 IST

हळदवडे (ता. कागल) येथील वाढीव वस्तीमधील सुमारे पंधरा कुटुंबांना गेल्या तीन वर्षांपासून महावितरण कार्यालयाकडून वीज जोडणी दिली नसल्याने ही कुटुंबे अंधारातच आहेत.

ठळक मुद्देमहावितरण कार्यालयाच्या गलथानपणाचा फटका

मुरगूड : हळदवडे (ता. कागल) येथील वाढीव वस्तीमधील सुमारे पंधरा कुटुंबांना गेल्या तीन वर्षांपासून महावितरण कार्यालयाकडून वीज जोडणी दिली नसल्याने ही कुटुंबे अंधारातच आहेत. वेळोवेळी मुरगूड येथील महावितरण कार्यालयात या नागरिकांनी मागणी करूनही महावितरण याकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे या नागरिकांत तीव्र असंतोष पसरला असून आपल्या सर्व कुटुंबीयांसह हे नागरिक महावितरण कार्यालयाच्या दारातच उपोषण करण्याच्या पवित्र्यात आहेत.केंद्र सरकार व राज्य सरकार सर्व लोकांना वीज दिली म्हणून जाहिरात बाजी करत असताना गेल्या तीन वर्षांपासून कागल तालुक्यातील हळदवडे गावातील सुमारे पंधरा कुटुंब आपल्याला वीज मिळावी म्हणून महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांची मनधरणी करत आहे; पण अद्यापपर्यंत या अधिकाºयांनी या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या आहेत. येथील हळदवडे मधील वाढीव वस्तीमध्ये सुमारे चार वर्षांपासून मोहन गोपाळ इंदलकर, सुशीला लक्ष्मण भोसले, नामदेव दशरथ बैलकर, संदीप दत्तात्रय बैलकर, नामदेव भिवा भराडे, अस्मिता रंगराव भराडे, विलास शिवाजी भराडे, भैरू पांडुरंग बैलकर, बबन शिवाजी भराडे, जोतिराम गोपाळ पोवार, श्रीकांत जोतिराम भराडे, आदी आपल्या कुटुंबासह राहत आहेत.या नवीन वस्तीच्या ठिकाणी विजेची सोय नाही, त्यामुळे तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने रीतसर महावितरण कार्यालयाकडे याबाबत मागणी केली होती; पण खर्चाचे कारण सांगून महावितरण या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत याबाबत ठराव करून तो महावितरण कार्यालयाला दिला आहे.याशिवाय खासदार, आमदार यांनीही याठिकाणी तत्काळ वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे, पण तरीही महावितरण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.मेणबत्त्या पेटवून प्रशासनाचा निषेध करणारदरम्यान ग्रामपंचायतीने व नागरिकाने आता लोकशाहीने हा प्रश्न सुटत नसला तर आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये सर्व ग्रामस्थ वीज कार्यालयासमोर मेणबत्त्या पेटवून प्रशासनाचा निषेध करणार आहेत.यानंतरही जर हळदवडेकरांच्या मागणीचा विचार झाला नाही तर सर्व नागरिक कुटुंबातील सर्व सदस्यांसह वीज कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. 

गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने हे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत महावितरण कार्यालयाकडे वीज जोडणीबाबत मागणी करत आहे; पण याकडे नको ती कारणे सांगून दुर्लक्ष झाले आहे. आत्ता आम्हाला न्याय मिळवण्यासाठी नाइलाजास्तव आंदोलन करावे लागणार आहे. यानंतर तरी महावितरण कार्यालयाला जाग येते का पाहू.- जयश्री भराडे, सरपंच हळदवडे, ता. कागल

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर