शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

हळदवडेत अनेक कुटुंबे अंधारात : तीन वर्षांपासून वीज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:07 IST

हळदवडे (ता. कागल) येथील वाढीव वस्तीमधील सुमारे पंधरा कुटुंबांना गेल्या तीन वर्षांपासून महावितरण कार्यालयाकडून वीज जोडणी दिली नसल्याने ही कुटुंबे अंधारातच आहेत.

ठळक मुद्देमहावितरण कार्यालयाच्या गलथानपणाचा फटका

मुरगूड : हळदवडे (ता. कागल) येथील वाढीव वस्तीमधील सुमारे पंधरा कुटुंबांना गेल्या तीन वर्षांपासून महावितरण कार्यालयाकडून वीज जोडणी दिली नसल्याने ही कुटुंबे अंधारातच आहेत. वेळोवेळी मुरगूड येथील महावितरण कार्यालयात या नागरिकांनी मागणी करूनही महावितरण याकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे या नागरिकांत तीव्र असंतोष पसरला असून आपल्या सर्व कुटुंबीयांसह हे नागरिक महावितरण कार्यालयाच्या दारातच उपोषण करण्याच्या पवित्र्यात आहेत.केंद्र सरकार व राज्य सरकार सर्व लोकांना वीज दिली म्हणून जाहिरात बाजी करत असताना गेल्या तीन वर्षांपासून कागल तालुक्यातील हळदवडे गावातील सुमारे पंधरा कुटुंब आपल्याला वीज मिळावी म्हणून महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांची मनधरणी करत आहे; पण अद्यापपर्यंत या अधिकाºयांनी या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या आहेत. येथील हळदवडे मधील वाढीव वस्तीमध्ये सुमारे चार वर्षांपासून मोहन गोपाळ इंदलकर, सुशीला लक्ष्मण भोसले, नामदेव दशरथ बैलकर, संदीप दत्तात्रय बैलकर, नामदेव भिवा भराडे, अस्मिता रंगराव भराडे, विलास शिवाजी भराडे, भैरू पांडुरंग बैलकर, बबन शिवाजी भराडे, जोतिराम गोपाळ पोवार, श्रीकांत जोतिराम भराडे, आदी आपल्या कुटुंबासह राहत आहेत.या नवीन वस्तीच्या ठिकाणी विजेची सोय नाही, त्यामुळे तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने रीतसर महावितरण कार्यालयाकडे याबाबत मागणी केली होती; पण खर्चाचे कारण सांगून महावितरण या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत याबाबत ठराव करून तो महावितरण कार्यालयाला दिला आहे.याशिवाय खासदार, आमदार यांनीही याठिकाणी तत्काळ वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे, पण तरीही महावितरण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.मेणबत्त्या पेटवून प्रशासनाचा निषेध करणारदरम्यान ग्रामपंचायतीने व नागरिकाने आता लोकशाहीने हा प्रश्न सुटत नसला तर आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये सर्व ग्रामस्थ वीज कार्यालयासमोर मेणबत्त्या पेटवून प्रशासनाचा निषेध करणार आहेत.यानंतरही जर हळदवडेकरांच्या मागणीचा विचार झाला नाही तर सर्व नागरिक कुटुंबातील सर्व सदस्यांसह वीज कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. 

गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने हे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत महावितरण कार्यालयाकडे वीज जोडणीबाबत मागणी करत आहे; पण याकडे नको ती कारणे सांगून दुर्लक्ष झाले आहे. आत्ता आम्हाला न्याय मिळवण्यासाठी नाइलाजास्तव आंदोलन करावे लागणार आहे. यानंतर तरी महावितरण कार्यालयाला जाग येते का पाहू.- जयश्री भराडे, सरपंच हळदवडे, ता. कागल

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर