शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

पश्चिम महाराष्ट्राचे ज्ञानतीर्थ राजाराम कॉलेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:06 AM

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे ज्ञानतीर्थ असलेल्या कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयाने स्वातंत्र्यपूर्व आणि त्यानंतरच्या काळात ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे ज्ञानतीर्थ असलेल्या कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयाने स्वातंत्र्यपूर्व आणि त्यानंतरच्या काळात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. येथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या ‘राजारामीयन्स’ यांनी देश आणि राज्यांतील विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. जुन्या मुंबई प्रांतातील एक अगग्रण्य उच्च शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महाविद्यालयाने १३९ व्या वर्षात पदार्पण केले आहे.थोरले राजाराम महाराज, राजर्षी शाहू छत्रपती आणि राजाराम महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये शिक्षणाचा लाभ संपूर्ण प्रजेला मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याअंतर्गत कोल्हापूर संस्थानमध्ये सन १८४८ पासून कोल्हापूर, पन्हाळा, आळते, शिरोळ येथे दरबारच्या खर्चाने व्हर्नाक्युलर शाळा सुरू झाल्या. पहिली इंग्रजी माध्यमाची सरकारी माध्यमिक शाळा १८६७ मध्ये स्थापन झाली.या शाळेचे पहिल्यांदा राजाराम हायस्कूलमध्ये रूपांतर झाले. त्याला १८८० मध्ये राजाराम महाविद्यालयाची जोड देण्यात आली. नवव्या क्रमांकाने मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले राजाराम महाविद्यालय १९४९ मध्ये संस्थान विलीन झाल्यावर मुंबई राज्याच्या अखत्यारीत आणि १९६० मध्ये महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित झाले. राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील शासकीय महाविद्यालय म्हणून यशस्वीपणे हे महाविद्यालय वाटचाल करीत आहे. सन १८८० पासून मुंबई विद्यापीठाशी, तर पुणे विद्यापीठाच्या स्थापनेपासून नोव्हेंबर १९६२ पर्यंत पुणे विद्यापीठाशी आणि नंतर शिवाजी विद्यापीठाशी महाविद्यालय संलग्न झाले. इतिहासतज्ज्ञ प्राचार्य डॉ. बाळकृष्ण, शिक्षणतज्ज्ञ बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर, शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार, आदींच्या कुशल मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची जडणघडण झाली.या महाविद्यालयाचा परिसर ६६ एकरांचा आहे. विविध २२ इमारतींच्या माध्यमातून महाविद्यालयाचे कामकाज चालते. प्रत्येक विषयासाठी सुसज्ज, स्वतंत्र प्रयोगशाळा आहे. सव्वा लाखाहून अधिक ग्रंथसंपदा आणि नियतकालिके, स्वतंत्र अभ्यासिका आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी एक हजार क्षमतेचे अत्याधुनिक सभागृह असून व्यायामशाळा, टेनिस आणि बॅडमिंटन कोर्ट, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहे आहेत. या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी घडले आहेत. त्यांपैकी काहींनी विविध क्षेत्रांत देशाचे आणि विविध राज्यांचे नेतृत्व केले आहे.बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. आणि एम.ए., एम.कॉम. अभ्यासक्रमांचे दरवर्षी २९२८ विद्यार्थी-विद्यार्थिनी या ठिकाणी शिक्षण घेतात. राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) सन २०१५-१६ मध्ये कॉलेजचे पुनर्मूल्यांकन झाले. त्यावेळी ‘अ’ मानांकन कॉलेजला प्राप्त झाले आहे. महाविद्यालयात प्राध्यापकांची नियुक्ती ही राज्य लोकसेवा आयोगाकडून केली जाते. विद्यार्थ्यांना उपग्रहाद्वारे दूरशिक्षण देण्याचा पहिला मान या महाविद्यालयाला मिळाला आहे. क्रमिक शिक्षणासह नागरी, प्रशासकीय सेवा, स्पर्धा परीक्षांसह व्यक्तिमत्त्व विकासासाठी येथे मार्गदर्शन केले जाते.आजपर्यंतचे प्राचार्य : सी. एच. कँडी, जे. एफ. अडेअर, आर. एस. ल्युसी, ए. डार्बी, आर. एन. आपटे, नैपाळसिंग, डॉ. बाळकृष्ण, बॅ. बाळासाहेब खर्डेकर, डॉ. अप्पासाहेब पवार, व्ही. के. गोकाक, डी. पी. पत्रावळी, आरमॅन्डो मेनेझिस, सी. डी. देशपांडे, डॉ. बी. आर. ढेकणे, जी. व्ही. असोळकर, एस. डी. बाळ, डॉ. वि. वा. करंबेळकर, डॉ. देवरस, मा. ग. मराठे, भगवंतराव देशमुख, रामकृष्ण ढमढेरे, एस. पी. बोरगांवकर, डॉ. पी. एल. मिश्रा, एस. आर. ओझरकर, व्ही. एस. पाटील, एल. आर. पत्की, डॉ. व्ही. के. क्षीरसागर, एस. पी. ननीर, एस. बी. महाराज, व्ही. बी. हेळवी, डॉ. अण्णासाहेब खेमनर.विविध क्षेत्रांतील नामवंत ‘राजारामीयन’महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘राजारामीयन’ असा उल्लेख केला जातो. महादेव रानडे, बळवंत जोशी, रघुनाथ सबनीस, वामन आपटे, रघुनाथ आपटे, गोपाळ टेंबे, विष्णू विजापूरकर, गोपाळ कृष्ण गोखले, श्रीपाद बेलवलकर, न. चिं. केळकर, माधव ज्यूलियन, ना. सी. फडके, इंदिरा संत, विजया राज्याध्यक्ष, पी. सावळाराम, व्ही. के. गोकाक, पांडुरंग पाटील, गोविंद टेंबे, अण्णासाहेब लठ्ठे, वासुदेव मिराशी, खाशाबा जाधव, शामराव तेंडोलकर, पार्श्वनाथ आळतेकर, भालचंद्र वालावलकर, दिनकरराव सुर्वे, बी. जी. खेर, अप्पासाहेब पवार, विश्वनाथ पाटील, जे. पी. नाईक, विष्णुपंत घाटगे, बी. डी. जत्ती, छत्रपती शहाजी महाराज, यशवंतराव चव्हाण, बॅ. बाबासाहेब भोसले, विंदा करंदीकर, रॅँग्लर व्ही. व्ही. नारळीकर, वसंतराव गोवारीकर, शिवराम भोजे, आर. व्ही. भोसले, अरुण निगवेकर, जयसिंगराव पवार, माणिकराव साळुंखे, विश्वास नांगरे-पाटील, तेजस्विनी सावंत, आदी नामवंत राजारामीयन आहेत.