शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार- पालकमंत्र्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 14:13 IST

rain, farmar, satejpatil, minister, kolhapurnews अतिवृष्टी, वादळीवारा व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्यातील शेतीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनाम्यात कोणताही शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्यावी, पंचनाम्यातून एखादा शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार असतील. त्याचे प्रांताधिकाऱ्यांनी आदेश काढावेत, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी केली. शेतकऱ्यांनीही गटविकास अधिकारी, तहसिलदार यांच्याशी पंचनाम्याबाबत संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार : पालकमंत्री पाटील यांचा इशाराचंदगड तालुक्यात पीक नुकसानीची पाहणी, पंचनाम्याचे दिले आदेश

कोवाड : अतिवृष्टी, वादळीवारा व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्यातील शेतीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनाम्यात कोणताही शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्यावी, पंचनाम्यातून एखादा शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार असतील. त्याचे प्रांताधिकाऱ्यांनी आदेश काढावेत, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी केली. शेतकऱ्यांनीही गटविकास अधिकारी, तहसिलदार यांच्याशी पंचनाम्याबाबत संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.पालकमंत्र्यांनी चंदगड तालुक्यातील दुंडगे, कुदनूर, कालकुंद्री, हुंदळेवाडी, किणी, कोवाड आणि निट्टूर या गावातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार राजेश पाटील उपस्थित होते. दरम्यान, त्यांनी कोवाड येथे बैठक घेतली. बैठकीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी जिल्ह्यातील पिकांचे नुकसान आणि पंचनामे याबाबत सविस्तर माहिती दिली.पालकमंत्री म्हणाले, ३० आॅक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करा. त्याबाबत शेतकऱ्यांना आदल्यादिवशी निरोप द्या, गावांमध्ये दवंडी द्या. भरपाई देण्यासाठी शासन पावले उचलत असून लवकरात लवकर मदत दिली जाईल. शेतकऱ्यांनी पंचनाम्याबाबत तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन सहकार्य करावे.यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुरबे, संभाजी देसाई, अशोकराव देसाई, दुंडगे सरपंच राजेंद्र पाटील, कल्लाप्पा भोगण, अरुण सुतार, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार विनोद रणावरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोदरे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार कदम आदी उपस्थित होते.पडलेला ऊस आधी गाळाशेतात पडलेला ऊस गाळपाला आधी गेला पाहिजे त्याबाबतची यादी कृषी विभागाने तयार करुन तसे पत्रही संबंधित कारखान्याना पाठवावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.

शेतकरी महिलेशी संवादभाताचे नुकसान झालेल्या कर्यात भागातील रुक्मिणी गोविंद गिरी या शेतकरी महिलेशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या दुसऱ्याचे शेत कसायला घेतले होते. पावसामुळे संबंध पीक वाया गेले. काळजी करु नका, सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाईल, असा दिलासा पालकमंत्र्यांनी त्यांना दिला.

पुलाबाबत लवकरच बैठकदुंडगे आणि कुदनूरला जोडणाऱ्या धोकादायक पुलाची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली. संरक्षित कठडा नसल्याने झालेल्या दुर्घटनांची माहिती आमदार पाटील यांनी दिली. पुलासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलministerमंत्रीkolhapurकोल्हापूर