शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

उपकाराची भावना असती तर सरकार बनले असते, चंद्रकांत पाटील यांचा उद्धव ठाकरे यांना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 12:57 IST

येत्या विधानसभेला महायुतीच्या १७० हून अधिक जागा येतील

कोल्हापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण यासारख्या अनेक योजना महायुतीच्या शासनाने राबविल्या. त्याचा जनतेला फायदा होत आहे. या उपकाराची भावना मनात न ठेेवणारी महाराष्ट्राची जनता नाही. त्यामुळे येत्या विधानसभेला महायुतीच्या १७० हून अधिक जागा येतील. हीच उपकाराची भावना काहींनी २०१९ साली ठेवली असती तर त्याचवेळी महाराष्ट्रात युतीची सत्ता आली असती आणि आता त्यांचं झालेले नुकसान झालं नसतं, अशा शब्दात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे.पाटील हे त्यांच्या मूळ गावी खानापूर ता. भुदरगड येथील देखण्या शाळा इमारतीच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र भुयार आणि अमित शाह यांच्या वक्तव्यांबाबत विचारणा केल्यावर ते म्हणाले, भुयार नेमके काय म्हणाले ते मला आता माहिती नाही. परंतु, महिलांचा अपमान होणारे ते काही बोलले असतील तर त्यांना मी माफी मागायला लावेन. अमित शाह हे दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यामुळेच ते २०२९ बद्दल बोलले असतील. परमेश्वर, महापुरूष आणि वरिष्ठ नेते यांच्यावर बोलण्याचे धाडस आणि त्यांचा उपमर्द हे संजय राऊतच करू शकतात, असेही ते म्हणाले,

इथले आमदार आबिटकरच असतीलअडचणीच्या काळात जे मदत करतात त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कधीच एकटे सोडत नाहीत. कितीही काहीही झाले तरी विद्यमान आमदारांना उमेदवारी हे सूत्र निश्चित झाले आहे. त्यामुळे इथले आमदार प्रकाश आबिटकरच असतील, असा निर्वाळा यावेळी पाटील यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahayutiमहायुती