शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सरकारने मोफत शिक्षण द्यावे, कोल्हापुरात अखिल भारतीय प्रारंभिक शिक्षक महासंघ संमेलनात विविध ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 18:29 IST

'संविधानामुळेच तळागाळातील वर्ग शिक्षण घेत आहे'

कोल्हापूर : सरकारी खर्चातून सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण सर्व स्तरावरील केजी ते पीजीपर्यंत मिळावे, यासह अन्य ठराव अखिल भारतीय प्रारंभिक शिक्षक महासंघ संमेलनात झाले. शिवाजी पार्कातील जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात दोन दिवस संमेलन झाले. यामध्ये देशभरातून तज्ज्ञ सहभागी झाले. सभागृहाला कॉम्रेड सुधांशू पॉल विचारमंच असे नामकरण करण्यात आले.देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी अधिवेशनात विविध ठराव केले. सर्वांना जुनी पेन्शन योजना करा. केंद्र सरकारने जीडीपीच्या दहा टक्के खर्च शिक्षणावर करावा. सर्व राज्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पात ३० टक्के खर्च शिक्षणावर करावा. देशभरातील शिक्षकांसाठी अभ्यासक्रम, वेतन यासाठी समान धोरण असावे. खासगीकरण थांबवावे, असे विविध ठराव झाले.आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते खुल्या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. ते म्हणाले, शिक्षकांना फक्त अध्यापनाचे काम द्यावे. अशैक्षणिक कामांनी शिक्षक वैतागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. प्राचार्य आनंद मेणसे म्हणाले, बहुजन समाज शिकत असलेला पाहून काहींना पोटशूळ उठला आहे. तसेच शिक्षणाचे बाजारीकरण करण्याचे धोरण सुरू आहे. संविधानामुळेच तळागाळातील वर्ग शिक्षण घेत आहे. तो संपविण्याचा घाट विशिष्ट यंत्रणा रचत आहे.यावेळी शिक्षण व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, भरत रसाळे, अनिल लवेकर, दिलीप पवार यांची भाषणे झाली. संमेलनात देशभरातील दोनशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. प्रमोद तौंदकर यांनी प्रास्ताविक केले. रावसाहेब कीर्तीकर, उमर जमादार यांनी सूत्रसंचालन केले. शहराध्यक्ष संजय पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकGovernmentसरकार