शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

आपदा मित्रांना मानधन देण्यासाठी शासनाला प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 11:07 AM

कोल्हापूर जिल्ह्याला महापुराने वेढताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या ५०० आपदा मित्रांनी अहोरात्र पुरात अडकलेल्या लोकांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढले. स्वत:च्या जिवाची बाजी लावणाऱ्या हे आपदा मित्र नि:शुल्क सेवा बजावत आहेत. त्यांच्या मेहनतीची दखल घेत त्यांना मानधन मिळावे; यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.

ठळक मुद्देआपदा मित्रांना मानधन देण्यासाठी शासनाला प्रस्तावनिवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची माहिती

कोल्हापूर : जिल्ह्याला महापुराने वेढताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या ५०० आपदा मित्रांनी अहोरात्र पुरात अडकलेल्या लोकांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढले. स्वत:च्या जिवाची बाजी लावणाऱ्या हे आपदा मित्र नि:शुल्क सेवा बजावत आहेत. त्यांच्या मेहनतीची दखल घेत त्यांना मानधन मिळावे; यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.जिल्ह्यात आपत्ती उद्भवल्यानंतर तिचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तगड्या तरुण-तरुणींची भरती केली. सुमारे ५०० आपदा मित्र नियुक्त केले. त्यांना पुरामध्ये, आगीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रशिक्षणही दिले. अतिवृष्टीमुळे कोल्हापूरला महापुराने वेढा दिला. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आपदा मित्र सज्ज झाले.

शिवाजी पूल, शिरोळ, हातकणंगले, सांगली फाटा, तावडे हॉटेलसह शहरात आदी ठिकाणी आपदा मित्रांनी पूरग्रस्तांना बाहेर काढण्याचे काम केले. सुमारे ९६ तरुणी धाडसाने पाण्यात उतरून पूरग्रस्तांना बाहेर काढताना दिसत होत्या. गेल्या २९ दिवसांत त्यांनी हजारो लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढत त्यांचा जीव वाचविला. भविष्यात आपले चांगले होईल, या आशेपोटी हे आपदा मित्र नि:शुल्क अहोरात्र काम करीत आहेत.

आम्ही घरदार सोडून दुसऱ्यांचा जीव वाचविण्याचे काम करीत आहोत; परंतु शासनाकडून आम्हाला मानधन मिळत नसल्याची खंत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली होती. त्याची गांभीर्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेत शासनाला प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर