शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पानसरे हत्या प्रकरणात सरकार अपयशी : मेघा पानसरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 14:33 IST

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांचा खून होऊन दोन वर्षे ९ महिने झाले. तरी अद्याप त्यांच्या मारेक-यांना पकडण्यात यश आलेले नाही. हे सत्ताधारी सरकारचे अपयश असल्याचे प्रतिपादन स्नुषा मेघा पानसरे यांनी कोल्हापूरात शुक्रवारी (24 नोव्हेंबर )केले.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांचा खून होऊन दोन वर्षे ९ महिने झाले. तरी अद्याप त्यांच्या मारेक-यांना पकडण्यात यश आलेले नाही. हे सत्ताधारी सरकारचे अपयश असल्याचे प्रतिपादन स्नुषा मेघा पानसरे यांनी कोल्हापूरात शुक्रवारी (24 नोव्हेंबर )केले.

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या जन्म दिवसानिमित्त प्रसंगी सागरमाळ येथील निवासस्थानाजवळ  त्या बोलत होत्या. यावेळी गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेला पत्नी उमा पानसरे यांनी पुष्पहार अर्पण करुन पूजन केले. याप्रसंगी शहीद क्रॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जन्मदिवसानिमित्त यावेळी कृष्णात कोरे यांनी प्रतिज्ञा म्हटली. ‘शहीद क्रॉमेड गोविंद पानसरे अमर रहें, अमर रहें ’, ‘लाल सलाम,लाल सलाम’ अशी  घोषणाबाजी करुन उपस्थितांनी गोविंद पानसरे यांना अभिवादन केले. यावेळी गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेजवळ डॉ. नरेंद्र दाभोलकर व कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक एम.एम.कलबुर्गी यांच्या प्रतिमेचे पुस्तक ठेवण्यात आले होते.

मेघा पानसरे म्हणाल्या, गोविंद पानसरे यांच्यासह नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांचीसुद्धा अशा प्रकारची हत्या झाली. हे निषेधार्ह आहे. विवेकाचा आवाज बंद  करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विवेकाचा विचार जिवंत ठेवला पाहिजे. प्रा. उदय नारकर म्हणाले, सर्वांनी अशीच एकजूट ठेवावी. क्रॉमेड गोविंद पानसरे यांची प्रेरणा निश्चित आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. यावेळी दिलीप पवार, आशा कुकडे, नामदेव गावडे, प्रा.रणधीर शिंदे , मुन्ना सय्यद , रघु कांबळे, विक्रम कदम, एस.बी.पाटील, जीवन बोडके, व्यंकाप्पा भोसले, आनंदराव परुळेकर, संभाजी जगदाळे,सतीश पाटील,सतीश पाटील, एम.बी.पडवळे, वसंत पाटील, हसन देसाई, उमेश पानसरे, मुकुंद कदम, बाळासाहे प्रभावळे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा