शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

जयसिंगपुरात आता बंदला पूर्णविराम सलोख्यासाठी सद्भावना रॅली : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 1:10 AM

जयसिंगपूर : कोणत्याही कारणास्तव शहर बंद न ठेवता शहरात या पुढेही सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार करीत शनिवारी ‘आम्ही सारे भारतीय’ या बॅनरखाली सामाजिक सद्भावना रॅली

जयसिंगपूर : कोणत्याही कारणास्तव शहर बंद न ठेवता शहरात या पुढेही सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार करीत शनिवारी ‘आम्ही सारे भारतीय’ या बॅनरखाली सामाजिक सद्भावना रॅली काढण्यात आली़ महामानवांच्या शिकवणी अंगिकारण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे़ सध्याच्या डिजिटल युगात कॅशलेस न राहता कास्टलेस राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन यावेळी नगराध्यक्षा डॉ़ नीता माने यांनी केले़.

सकाळी नगरपालिकेपासून रॅलीची मूक मोर्चाने सुरुवात झाली़. रॅलीसमोर ‘आम्ही सारे भारतीय’ बॅनर लावण्यात आला होता़ राधिका घोरपडे या युवतीच्या हातात तिरंगा ध्वज देण्यात आला होता़ जुनी भाजी मंडई, तेरावी गल्ली, शिरोळ-वाडी रोड, क्रांती चौक येथून नगरपरिषदेसमोर रॅलीची सांगता झाली़ राज्यात कोठेही काहीही अनुचित प्रकार घडला तरी शांतताप्रिय ओळख असणाºया जयसिंगपूर शहरात सामाजिक शांतता बिघडू नये म्हणून नागरिकांनी वेळोवेळी दक्षता घेतली आहे़ या रॅलीतून राष्ट्राभिमान जागृत होऊन शहराच्या एकीचा संदेश देशात जाणार आहे.

‘शरद’चे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, गेल्या चार वर्षांत शहर बंद न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता़; परंतु कोरेगाव भीमाच्या घटनेने तो संकल्प खंडित झाला़ भविष्यात देशात अथवा राज्यात काहीही घडल्यास सर्वांनी एकत्र येऊन निषेध नोंदवून सामाजिक सलोखा बाळगूया आणि बंद न करण्याची परंपरा या पुढेही जोपासूया़ यावेळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले, शहरातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी काढण्यात आलेली सद्भावना रॅली ही अभिनंदनीय बाब आहे़ भविष्यात शहर बंद न ठेवता़, सर्वांनी एकत्र येऊन निषेधाची परंपरा जोपासावी़ त्यास पोलीस यंत्रणेचे सहकार्य मिळेल़

या रॅलीत उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, नगरसेवक बजरंग खामकर, पराग पाटील, महेश कलकुटगी, राहुल बंडगर, शैलेश चौगुले, सर्जेराव पवार, नगरसेविका स्वरूपा पाटील-यड्रावकर, रेखा देशमुख, प्रेमला मुरगुंडे, संगीता पाटील-चिंचवाडकर, अनुराधा आडके, फारूक पठाण, आदींसह नागरिक सहभागी झाले होते़जयसिंगपुरात कोणत्याही कारणास्तव शहर बंद न ठेवता शहरात यापुढेही सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. त्यासाठी शनिवारी ‘आम्ही सारे भारतीय’ या बॅनरखाली सामाजिक सद्भावना रॅली काढण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndiaभारत