शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

Gokul Milk Election -सत्तारूढ आघाडीच्या पराभवाची सुरुवात एका अपमानातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 12:22 IST

Gokul Milk Election Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीतील सत्ताधारी आघाडीच्या पराभवाची सुरुवात दोन वर्षापूर्वी झालेल्या एका अपमानातून झाली होती. संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी संघाचे तत्कालीन अध्यक्ष विश्वास नारायण पाटील ऊर्फ आबाजी यांचा त्यांच्या जिव्हारी लागेल असा अपमान केला होता व त्या अपमानाचा बदला म्हणून त्यांनी महाडिक यांची आयुष्यात पुन्हा संगत नको, असा निर्णय घेतला होता. आबाजी सत्तारूढ आघाडीतून बाहेर पडण्यास त्या क्षणापासूनच सुरुवात झाली.

ठळक मुद्देसत्तारूढ आघाडीच्या पराभवाची सुरुवात एका अपमानातूनजिव्हारी लागेल असा अपमान, बदला म्हणून आबाजी सत्तारूढ आघाडीतून बाहेर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीतील सत्ताधारी आघाडीच्या पराभवाची सुरुवात दोन वर्षापूर्वी झालेल्या एका अपमानातून झाली होती. संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी संघाचे तत्कालीन अध्यक्ष विश्वास नारायण पाटील ऊर्फ आबाजी यांचा त्यांच्या जिव्हारी लागेल असा अपमान केला होता व त्या अपमानाचा बदला म्हणून त्यांनी महाडिक यांची आयुष्यात पुन्हा संगत नको, असा निर्णय घेतला होता. आबाजी सत्तारूढ आघाडीतून बाहेर पडण्यास त्या क्षणापासूनच सुरुवात झाली.तसे आबाजी हे महाडिक यांचे अत्यंत विश्वासू संचालक, किंबहुना त्यांची सावलीच. कधीच त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदार संघात दोन्ही निवडणुकीत ते महाडिक गटाच्या प्रचारात आघाडीवर होते. त्यातून पालकमंत्री सतेज पाटील यांचा त्यांच्यावर प्रचंड राग होता. गावातील एका प्रकरणात आबाजींना पोलिसांकडून बराच त्रास झाला. तरीही ते महाडिक यांच्याशी एकनिष्ठ राहिले. परंतु संघाच्या मुंबईतील जागेच्या व्यवहारात महाडिक व पी. एन. पाटील यांच्यात विसंवाद घडला. त्यातून महाडिक यांनी आबाजींना राजीनामा देण्याचे आदेश दिले. तेवढेच करून ते थांबले नाहीत.

संघाच्या राजकारणातील अध्यक्ष असलेल्या ज्येष्ठ संचालकास त्यांनी त्यांच्या स्वाभिमानास ठेच पोहोचेल अशी वागणूक दिली. त्यानंतर आबाजींनी लगेच राजीनामा दिला. परंतु ते महाडिक यांच्यापासून दूर गेले. ते संघात महाडिक यांनी बोलविलेल्या बैठकीस जात नसत. पुढे लोकसभा निवडणुकीतही ते धनंजय महाडिक यांच्या प्रचारापासून लांब राहिले. त्यातच गत विधानसभेला महाडिक यांनी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्याबद्दलही टिपणी केली. त्यातून तेही दुखावले.

या दोघांची गट्टी जमली. संघाच्या राजकारणात आनंदराव पाटील चुयेकर यांच्या निधनानंतर चुयेकर घराणे आबाजींच्या चांगले संपर्कात होते. त्यामुळे आबाजी असतील तिकडे चुयेकर घराणे राहणार, हे स्पष्टच होते. त्यामुळेच आबाजी-डोंगळे-चुयेकर ही त्रिमूर्ती एकत्र आली व तिथूनच सत्ताधारी आघाडीची पडझड सुरू झाली.डोंगळे-आबाजी यांनी नेत्यांकडून सगळे फायदे घेऊन बाहेर पडले असल्याने त्यांच्यामागे कोण जातंय, असा एक होरा होता. परंतु तो खोटा ठरला. या तिघांनी आपल्याकडील ठरावधारक एकही हलू दिला नाहीच, शिवाय सत्तारूढ आघाडीतील मतेही कशी मिळतील अशी फिल्डिंग लावल्याने विरोधी आघाडीचा विजय सोपा बनल्याचे चित्र निकालानंतर दिसत आहे.

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर