शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

Kolhapur Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या धांदल, गोकुळ दूध संघाची निवडणूक लांबणीवर शक्य

By राजाराम लोंढे | Updated: July 28, 2025 17:20 IST

अंदाज घेऊनच संचालकांचे ठरावाचे गणित

राजाराम लोंढेकोल्हापूर : पावसाळ्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायती व ‘कोल्हापूर’, ‘इचलकरंजी’ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. महापालिकांच्या निवडणुका साधारणत: एप्रिल, मेपर्यंत होऊ शकतात. त्यामुळे याचदरम्यान मुदत संपणाऱ्या ‘गोकुळ’ दूध संघाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. निवडणूक पुढे गेली, तर नवीन सभासद झालेल्या किती संस्था मतदार यादीत वाढू शकतात, याचे गणित मांडले जात आहे.‘गोकुळ’च्या संचालक मंडळाची मुदत एप्रिल २०२६ मध्ये संपत आहे, तरीही आतापासूनच नगारे वाजू लागले आहेत. जिल्ह्यातील सत्ताकेंद्रापैकी प्रमुख असलेल्या ‘गोकुळ’साठी सर्वपक्षीय नेते सरसावले आहेत. मतदार यादीसाठी संस्था प्रतिनिधीच्या नावाने ठराव करण्याच्या प्रक्रियेस अजून तीन महिन्यांचा कालावधी आहे. सध्या ‘टोकण’च्या माध्यमातून जास्तीत जास्त ठराव आपल्याकडे करण्यासाठी चढाओढ दिसत असली, तरी निवडणूक पुढे जाण्याची धाकधूकही इच्छुकांच्या पोटात आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्राधान्याने होणार आहेत. साधारणत: मतदारसंघ पुनर्रचनेची गडबड पाहता जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्यांदा होणार हे निश्चित आहे. ऑगस्टमध्ये मतदारसंघ पुनर्रचना अंतिम होऊन सप्टेंबरच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात आरक्षण सोडत होईल.मात्र, ऑक्टोबरमध्ये दसरा, दिवाळी असल्याने या कलावधीत निवडणुका हाेणार नाहीत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रक्रिया सुरू होऊन डिसेंबरमध्ये मतदान होईल. त्यानंतर नगरपालिका, नगरपंचायती, महापालिका निवडणुकांची प्रक्रिया राबवली जाणार आहे. एप्रिल, मे महिन्यात महापालिका निवडणूक होऊ शकतात. त्यामुळे ‘गोकुळ’ची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांचा अडसरजिल्ह्यातील चारशेहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर-जानेवारी महिन्यात संपत आहे. यादरम्यान त्यांचीही प्रक्रिया सुरू करावी लागणार असल्याने नोव्हेंबरनंतर आठ महिने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच जाण्याची शक्यता आहे.

मागील संचालकांना वर्षाची मुदतवाढमागील संचालक मंडळाची मुदत २०२० मध्ये संपत होती, पण कोरोनामुळे तत्कालीन संचालकांना वर्षाची मुदतवाढ मिळाल्याने त्यांची टर्म सहा वर्षांची झाली होती.

न्यायालयीन लढाईही होणार?‘गोकुळ’च्या मतदार यादीवरून न्यायलयीन लढाई नवीन नाही. यावेळेला तर सत्तारूढ गटाने तब्बल दीड हजार संस्था वाढवल्याचा आरोप विरोधकांचा आहे. त्या संस्थांच्या दूध संकलनाला आव्हान देण्याची तयारी विरोधकांची आहे. या प्रक्रियेला किती महिने लागणार, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.