शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

अवघ्या तीन तासांत गोव्यात जाता येणार आहे-संकेश्वर ते बांदा मार्गाचा ‘डीपीआर’ करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 1:04 AM

कोकणला आणखी नजीक आणण्यासाठी संकेश्वर ते बांदा १०६ किलोमीटर अंतराच्या नव्या राष्टय महामार्गाचा ‘डीपीआर’(विकास आराखडा) करण्याचे आदेश राष्टÑीय रस्ते विकास महामंडळाने दिले आहेत.

ठळक मुद्देनव्या महामार्गाला मंजुरी; १०६ कि.मी.चे अंतर --‘राष्टय रस्ते विकास’चा आदेश

तानाजी पोवार ।कोल्हापूर : कोकणला आणखी नजीक आणण्यासाठी संकेश्वर ते बांदा १०६ किलोमीटर अंतराच्या नव्या राष्टय महामार्गाचा ‘डीपीआर’(विकास आराखडा) करण्याचे आदेश राष्टÑीय रस्ते विकास महामंडळाने दिले आहेत. त्याचा ‘डीपीआर’ भारतीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. कोकणकडील व्यापाराला चालना मिळावी, परराज्यातून, तसेच मुंबई-पुणे मार्गे येणाऱ्या पर्यटकांना या महामार्गातून गोव्याकडे जाता यावे; यासाठी या नव्या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यात येत आहे.

सध्याच्या स्थितीत तवंदी घाट, शिपूर, आजरामार्गे गोवा अशी वाहतूक सुरू आहे. या मार्गावर वाहनांची प्रचंड संख्या आहे; पण रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पर्यटकांसह वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नव्याने होणारा हा राष्टÑीय महामार्ग पर्यटकांच्या आणि वाहनचालकांच्या सोईचा होणार आहे. हा ‘डीपीआर’ करताना मार्र्गावरील वाहतुकीची संख्या, मार्गासाठीचा अपेक्षित खर्च, भूसंपादनाची प्रक्रिया, जमीनधारकांना द्यावा लागणारा योग्य मोबदला, याचाही विचार होणार आहे. हा ‘डीपीआर’ तयार करून तो मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे.चौपदरीकरण की सहापदरीकरण?परिसरातील जुन्या मार्गावरून ये-जा करणाºया वाहनांच्या संख्येवरून हा नवा महामार्ग चौपदरीकरण की सहापदरीकरण करायचा हे विकास आराखड्यामध्ये निश्चित करण्यात येणार आहे.कोकण व्यापाराला चालनासध्याच्या स्थितीत दळणवळणाच्या दृष्टीने कोकणशी अनेक राज्यांचा संपर्क वाढला आहे. कोकणकडील व्यापाराला या नव्या महामार्गामुळे चालना मिळणार आहे. त्याचा महाराष्टÑ, कर्नाटकसह इतर राज्यांना फायदा होणार आहे.गडहिंग्लज, आजरेकरांची उत्सुकताहा नवा महामार्ग गडहिंग्लज आणि आजरा शहरांतून जाणार की बायपास, याबाबत दोन्हीही शहरवासीयांना उत्सुकता आहे; पण तो शहरातून नेण्यास त्यांचा विरोध राहणार असल्याचे दिसून येते.नवा महामार्ग असा असेल..सुमारे १०६ कि.मी. लांबीचा हा नवा राष्टÑीय महामार्ग संकेश्वर, गडहिंग्लज, आजरा, आंबोली, बांदा असा असेल. या महामार्गावर कमीत कमी वळण, बाह्यवळण असतील. या मार्गावरून अवघ्या तीन तासांत गोव्यात जाता येणार आहे; त्यामुळे हा महामार्ग वाहनधारकांना सोईचा ठरणार आहे.‘सावंतवाडी’करांची इच्छामुंबई ते गोवा हा राष्टÑीय महामार्ग सावंतवाडी गावाबाहेरून बाय्ापास वळवून पुढे गेला. संकेश्वर ते बांदा हा नवा महामार्ग सावंतवाडी शहरापासून किमान ७ ते ८ कि.मी. अलीकडून वळण घेऊन पुढे जात आहे; पण हा मार्र्ग सावंतवाडी शहरातून जावा, अशी त्यांची इच्छा आहे; त्यामुळे या शहरातील व्यापारीकरणाला चालना मिळणार आहे.

टॅग्स :highwayमहामार्गpwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूरgoaगोवा