शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

आपत्ती काळात काम करणाऱ्यांना बळ द्या - शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:05 IST

व्हाईट आर्मीतर्फे आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर : आपत्तीच्या काळात महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणा, अधिकारी व स्वंयसेवी संस्था उत्कृष्ट काम करतात याचा अनुभव वेळोवेळी आला आहे. त्यामुळे अशा काळात काम करणाऱ्या शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्थांना नागरिकांनी बळ दिले तर कोणत्याही संकटांचा आपण सहजपणे सामना करू शकू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केला.कोल्हापुरातील व्हाईट आर्मी व शिवाजी विद्यापीठाच्या शिव-सहाय्यता आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्यावतीने पवार यांना आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्काराने खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के, प्र कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सारंगी उपस्थित होते.शरद पवार म्हणाले, लातूर भूकंपावेळी शासकीय अधिकाऱ्यांनी, काही स्वयंसेवी संस्थांनी उत्कृष्ट काम केले. आपत्तीच्या काळात महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणा चांगले काम करते, असा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना बळ देण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे.शाहू छत्रपती म्हणाले, भूज येथील भूकंपावेळी पवार यांनी महाराष्ट्र पॅटर्न वापरून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांनी शालेय अभ्यासक्रमात आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा समावेश करावा. तसेच कोल्हापुरात आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील विद्यापीठ व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. अमोल कोडोलीकर यांनी आभार मानले. यावेळी समरजित घाटगे, सरोज पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.एन.शिंदे, डॉ. एम.बी.शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, शहराध्यक्ष आर.के.पोवार उपस्थित होते.अन् आपत्ती व्यवस्थापन कायदा झालाकच्छ, भूज भूकंपावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवून यातून मार्ग काढण्याची विनंती केली. यावेळी सर्वांनीच माझे नाव पुढे केल्याने या भूकंपावेळी मी आपत्ती व्यवस्थापनात पुढाकार घेतला. केंद्रात मंत्री असताना मी व तत्कालीन सचिव पी.के. मिश्रा कॅलिफोर्नियासह तीन-चार देशात गेलो, तेथील आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणा पाहिल्या अन् त्यातूनच आपल्या देशात पहिल्यांदा आपत्ती व्यवस्थापन कायदा तयार झाल्याची आठवण पवार यांनी जागवली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSharad Pawarशरद पवार