शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

पक्ष, राजकारण बघू नका; ढिलं पडू नका, गावासाठी कामाला लागा, ग्रामविकासमंत्र्यांचे भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 17:53 IST

पंतप्रधानांच्या घरी चहाला जायचे आहे

कोल्हापूर : जिल्हा परिषदेला पाच कोटी रुपयांची बक्षीस देणारी आणि हजारो गावांना कोट्यवधी रुपये देणारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही पहिली योजना आहे. त्यामुळे आता पक्ष, राजकारण काही बघू नका. ढिलं पडू नका, गावासाठी कामाला लागा, असे भावनिक आवाहन ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे यांनी केले.येथील ‘आनंद भवन’ येथे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित अभियान कार्यशाळेत ते बोलत होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यशाळेला खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, ‘यशदा’चे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अपर आयुक्त नितीन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी उपस्थित होते. अर्ध्या तासाच्या भाषणात गोरे यांनी चौफेर उदाहरणे देत सरपंच आणि ग्रामसेवकांना या अभियानामध्ये सक्रिय सहभागासाठी उद्युक्त केले.मंत्री गोरे म्हणाले, या शाहूनगरीने देशाला आणि राज्याला दिशा देणाऱ्या योजना दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू होत आहे. सध्या केंद्र आणि राज्य शासनाच्या जेवढ्या योजना सुरू आहेत, त्याची जरी प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली तरी गावे समृद्ध व्हायला काहीच वेळ लागणार नाही. सर्व योजनांची १०० टक्के अंमलबजावणी केली की या अभियानातील ६५ टक्के काम होणार आहे आणि केलेले काम नोंदवले की उरलेले काम पूर्ण होणार आहे.खासदार महाडिक म्हणाले, ही योजना म्हणजे ‘रिव्होल्युशन’ असली तरी त्यासाठी ‘सेल्फ इव्होल्युशन’ म्हणजे आपलेच मूल्यमापन करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गावे बदलत आहेत. केरळप्रमाणे आपलीही खेडी बदलली पाहिजेत.मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले, हे अभियान म्हणजे क्रांती असून, हा २७ पानांचा ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन आदेशाचा अभ्यास केला आणि त्यानुसार गावचा कारभार केला तर गावे बाइकच्या नव्हे तर रॉकेटप्रमाणे प्रगती करतील. यावेळी सर्व विभागप्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले यांनी आभार मानले.

पंतप्रधानांच्या घरी चहाला जायचे आहेया अभियानातील पहिले तीन सरपंच, तीन गटविकास अधिकारी, तीन सीईओ यांना आपल्या घरी दहा मिनिटे चहापानासाठी बोलवावे, अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार आहे. ते नकार देणार नाहीत. त्यामुळे त्यांना आपल्याला भेटायला जायचे आहे या जिद्दीने कामाला सुरूवात करा, असेही गोरे म्हणाले.