शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

Kolhapur: बाजार भोगाव परिसरात गव्यांच्या कळपाचा 'धुडगूस', शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 18:08 IST

भिकाजी पाटील बाजार भोगाव : जंगलातील वणव्यामुळे जंगल बेचिराख झाली असून जंगली प्राण्यांची पावले आता शेतकऱ्यांच्या हिरव्यागार पिकाकडे वळली ...

भिकाजी पाटील

बाजार भोगाव : जंगलातील वणव्यामुळे जंगल बेचिराख झाली असून जंगली प्राण्यांची पावले आता शेतकऱ्यांच्या हिरव्यागार पिकाकडे वळली आहेत. हिरवा चारा व पाण्याच्या टंचाईमुळे गव्यांचे कळप शेतात घुसून उभी पिके फस्त करू लागली आहेत. आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास बाजार भोगाव परिसरात काळजवडे येथील शेतात गव्यांच्या कळपाने धुडगूस घातला. भरदिवसा शेतात गव्यांचे कळप आल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.  कष्ट करून उभे केलेले पीक गव्यांचे कळप फस्त करु लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतात मचान उभारून शेतकरी पिकाच्या राखण्यासाठी प्रयत्नशील असतात पण शेतात आलेल्या गव्याना हुसकवण्याचा प्रयत्न केल्यास ते अंगावर येत आहेत. वनखात्याकडून कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाय योजना होत नाहीत. 

हातातोंडाशी आलेला घास गव्यांनी खाला तर पुरेशी मदत मिळत नाही तर वाढलेले खताचे दर, मिळणारे रात्रपाळीने पाणी, रात्रभर जागून राखण करायची दिवसभर शेतात राबराबायचे आणि मदत मिळण्यासाठी  सरकारी ऑफिसमध्ये हेलपाटे मारावे लागतात - कृष्णात कदम, शेतकरी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभागFarmerशेतकरी