शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
3
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
4
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
7
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
8
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
9
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
10
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
11
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
12
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
13
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
14
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
16
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
17
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
18
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
19
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
20
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय

Kolhapur: कोयते नाचवून दहशत माजवण्याची हिम्मत येते कुठून?; गुन्हेगारीत अल्पवयीनांची नवी जमात, पोलिसांना आव्हान

By उद्धव गोडसे | Updated: September 22, 2025 12:12 IST

सामाजिक स्वास्थ्य धोक्यात

उद्धव गोडसेकोल्हापूर : शहर आणि परिसरात खुलेआम कोयते, एडका, तलवारी नाचवून दहशत माजवणाऱ्या झुंडी गल्लोगल्ली तयार झाल्या आहेत. व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्याची स्पर्धा त्यांच्यात सुरू आहे. विरोध करणाऱ्या स्थानिकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यापुढे जाऊन पोलिसांवरही दगडफेक करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे दहशत माजवणाऱ्या अल्पवयीन टोळ्यांना एवढी हिम्मत येते कुठून, याचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याची वेळ पोलिसांसह समाजावरही आली आहे.गेल्या आठवड्यात फुलेवाडीत एका बेकरीत घुसून चौघांनी तोडफोड केली. कोयता, एडक्याची दहशत दाखवून बेकरी चालकाला जीवे मारण्याची धमकी दिली. उजळाईवाडी येथील एका बेकरीत अशाच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली. विशेष म्हणजे त्या टोळीत दोन अल्पवयीनांचा समावेश होता.बेकरीची तोडफोड केल्यानंतर या टोळीने परिसरातील कॉलनीत दहशत माजवली. स्थानिकांच्या वाहनांची तोडफोड करून घरांवर दगडफेक केली. कुठेही तक्रार करा. आमचे कोणी वाकडे करीत नाही, असे म्हणत त्यांनी पुन्हा तोडफोड करण्याची धमकी दिली. दोन दिवसांपूर्वी शाहूनगर चौकात पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. हल्लेखोरांमध्ये चौघे अल्पवयीन होते.या प्रातिनिधिक घटना जिल्ह्यातील गुन्हेगारीत अल्पवयीनांचा सहभाग आणि त्यांची वाढती दहशत स्पष्ट करणाऱ्या आहेत. यांचा वेळीच बंदोबस्त न केल्यास येणाऱ्या काळात त्यांच्या टोळ्या पोलिसांना डोईजड ठरण्याचा धोका आहे तसेच सामाजिक स्वास्थ्य हरवण्याची शक्यता आहे.

नशेखोरीने गुन्हेगारीत वाढगांजा, ड्रग्ज आणि दारूच्या आहारी गेलेली तरुणाई दिवसाढवळ्या शस्त्रे नाचवत आहे. अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट मुळापासून उद्ध्वस्त होत नसल्याने गुन्हेगारीचा धोका आणखी वाढत आहे. मुलांकडे दुर्लक्ष करणारे पालकही याला कारणीभूत ठरत आहेत..भुरटे आयडॉलसराईत गुन्हेगार, अवैध व्यावसायिक सोशल मीडियातून स्वत:चे प्रमोशन करतात. या आभासी जगाला भुलणारी १४ ते १८ वयोगटातील मुलं गुन्हेगारांना स्वत:चे आयडॉल ठरवत आहेत. यातून अल्पवयीन गुन्हेगारांच्या टोळ्या वाढत असून, त्यांना वेळीच यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न पोलिस आणि पालकांना करावे लागणार आहेत.

कुठे आहे पोलिसी खाक्या?उजळाईवाडी येथे बेकरीची तोडफोड करून पळालेल्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्लेखोरांनी दगडफेक केली. काही गुन्हेगार सोशल मीडियातून पोलिसांना खुले आव्हान देत आहेत, त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.राजकीय नेत्यांचे मौनगुन्हेगारी टोळ्यांकडून वाढलेल्या दहशतीनंतर लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांनी गुन्हेगारांच्या विरोधात भूमिका घेणे नागरिकांना अपेक्षित आहे. मात्र, एकाही नेत्याचा गुन्हेगारांच्या विरोधात आवाज निघत नाही. उलट त्यांच्या वाढदिवसाला गुन्हेगारांचे फोटो फलकांवर झळकतात. यातून गुन्हेगारांना बळ मिळत आहे.