शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

Kolhapur: कोयते नाचवून दहशत माजवण्याची हिम्मत येते कुठून?; गुन्हेगारीत अल्पवयीनांची नवी जमात, पोलिसांना आव्हान

By उद्धव गोडसे | Updated: September 22, 2025 12:12 IST

सामाजिक स्वास्थ्य धोक्यात

उद्धव गोडसेकोल्हापूर : शहर आणि परिसरात खुलेआम कोयते, एडका, तलवारी नाचवून दहशत माजवणाऱ्या झुंडी गल्लोगल्ली तयार झाल्या आहेत. व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्याची स्पर्धा त्यांच्यात सुरू आहे. विरोध करणाऱ्या स्थानिकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यापुढे जाऊन पोलिसांवरही दगडफेक करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे दहशत माजवणाऱ्या अल्पवयीन टोळ्यांना एवढी हिम्मत येते कुठून, याचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याची वेळ पोलिसांसह समाजावरही आली आहे.गेल्या आठवड्यात फुलेवाडीत एका बेकरीत घुसून चौघांनी तोडफोड केली. कोयता, एडक्याची दहशत दाखवून बेकरी चालकाला जीवे मारण्याची धमकी दिली. उजळाईवाडी येथील एका बेकरीत अशाच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली. विशेष म्हणजे त्या टोळीत दोन अल्पवयीनांचा समावेश होता.बेकरीची तोडफोड केल्यानंतर या टोळीने परिसरातील कॉलनीत दहशत माजवली. स्थानिकांच्या वाहनांची तोडफोड करून घरांवर दगडफेक केली. कुठेही तक्रार करा. आमचे कोणी वाकडे करीत नाही, असे म्हणत त्यांनी पुन्हा तोडफोड करण्याची धमकी दिली. दोन दिवसांपूर्वी शाहूनगर चौकात पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. हल्लेखोरांमध्ये चौघे अल्पवयीन होते.या प्रातिनिधिक घटना जिल्ह्यातील गुन्हेगारीत अल्पवयीनांचा सहभाग आणि त्यांची वाढती दहशत स्पष्ट करणाऱ्या आहेत. यांचा वेळीच बंदोबस्त न केल्यास येणाऱ्या काळात त्यांच्या टोळ्या पोलिसांना डोईजड ठरण्याचा धोका आहे तसेच सामाजिक स्वास्थ्य हरवण्याची शक्यता आहे.

नशेखोरीने गुन्हेगारीत वाढगांजा, ड्रग्ज आणि दारूच्या आहारी गेलेली तरुणाई दिवसाढवळ्या शस्त्रे नाचवत आहे. अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट मुळापासून उद्ध्वस्त होत नसल्याने गुन्हेगारीचा धोका आणखी वाढत आहे. मुलांकडे दुर्लक्ष करणारे पालकही याला कारणीभूत ठरत आहेत..भुरटे आयडॉलसराईत गुन्हेगार, अवैध व्यावसायिक सोशल मीडियातून स्वत:चे प्रमोशन करतात. या आभासी जगाला भुलणारी १४ ते १८ वयोगटातील मुलं गुन्हेगारांना स्वत:चे आयडॉल ठरवत आहेत. यातून अल्पवयीन गुन्हेगारांच्या टोळ्या वाढत असून, त्यांना वेळीच यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न पोलिस आणि पालकांना करावे लागणार आहेत.

कुठे आहे पोलिसी खाक्या?उजळाईवाडी येथे बेकरीची तोडफोड करून पळालेल्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्लेखोरांनी दगडफेक केली. काही गुन्हेगार सोशल मीडियातून पोलिसांना खुले आव्हान देत आहेत, त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.राजकीय नेत्यांचे मौनगुन्हेगारी टोळ्यांकडून वाढलेल्या दहशतीनंतर लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांनी गुन्हेगारांच्या विरोधात भूमिका घेणे नागरिकांना अपेक्षित आहे. मात्र, एकाही नेत्याचा गुन्हेगारांच्या विरोधात आवाज निघत नाही. उलट त्यांच्या वाढदिवसाला गुन्हेगारांचे फोटो फलकांवर झळकतात. यातून गुन्हेगारांना बळ मिळत आहे.