शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

कोल्हापुरात यंदा गणेश मिरवणुका एकाच दिवशी, पोलिसांनी दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 16:07 IST

वाहतूक कोंडीने शहर होते त्रस्त, पोलिसांवर वाढतो ताण

कोल्हापूर : गणेश आगमन आणि विसर्जनासाठी मंडळे सोयीनुसार मिरवणुका काढतात. आगमनाला तर चार-पाच दिवस शहरात कुठेना कुठे मिरवणूक सुरूच असते. मात्र, यामुळे शहरात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. असे प्रकार टाळण्यासाठी गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीलाच मिरवणुका काढण्याची परवानगी मंडळांना दिली जाणार आहे. इतर दिवशी विनापरवानगी कोणी मिरवणूक काढल्यास मंडळांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिला आहे.गणेशोत्सव हा धार्मिक सण आहे. त्याचे पावित्र्य जपणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. तिथी, मुहूर्त, प्रमाण वेळा यानुसारच सण साजरे केले जातात. याचे भान ठेवून सार्वजनिक मंडळांनी गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीलाच मिरवणुका काढण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. गेल्यावर्षी शहरात अनेक मंडळांनी गणेश चतुर्थीपासून ते अगदी पाचव्या दिवसापर्यंत आगमन मिरवणुका सुरू ठेवल्या. ढोलताशे, ध्वनियंत्रणा, लेसर शो आणि विद्युत झगमगाट करून रस्ते अडवले.परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्रास झाला. रुग्णालये, रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांनाही रोजच्या मिरवणुकांचा त्रास झाला. एका मंडळाने तर महाद्वार रोडवरील मिरवणुकीत पुरेसा वेळ मिळत नसल्याचे कारण देत अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढून पोलिस यंत्रणा आणि नागरिकांना वेठीस धरले. असे प्रकार टाळण्यासाठी सर्व मंडळांनी आगमन आणि विसर्जन मिरवणूक एकाच दिवशी काढण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.सर्व पोलिस ठाण्यांकडून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन याबाबत सूचना दिल्या जात आहेत. मंडळांनी याचे काटेकोर पालन करावे, अन्यथा विनापरवानगी मिरवणुका काढणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

ध्वनियंत्रणांचे कारण नकोमिरवणुकांसाठी ढाल पथके, ध्वनियंत्रणा, लेसर शोची यंत्रणा एकाच दिवशी सर्वांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे सोयीच्या दिवशी मिरवणूक काढत असल्याचे कारण मंडळांकडून दिले जाते. मात्र, धार्मिक उत्सवात मुहूर्त आणि वेळेला महत्त्व असल्याने इतर वेळी मिरवणुका काढून चुकीचा पायंडा पाडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. एकाच परिसरातील दोन-तीन मंडळांनी एकत्र येऊन मिरवणूक काढण्याचा पर्याय पोलिसांनी सुचवला आहे. यातून वेळ आणि पैशांचाही बचत होऊ शकते.

गेल्यावर्षी तीन मंडळांवर गुन्हेगेल्यावर्षी विनापरवानगी मिरवणूक काढल्याबद्दल जुना राजवाडा पोलिसांनी तीन मंडळांवर गुन्हे दाखल केले. यात उमा टॉकीज परिसरातील दोन आणि जुना बुधवार पेठेतील एका मंडळाचा समावेश आहे. त्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना अजून न्यायालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. अशी कारवाई टाळण्यासाठी मंडळांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस