शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

गांधी जयंतीला वीस कैद्यांची सुटका होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:53 IST

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कारागृहात आल्यापासून चांगली वर्तणूक, शांत स्वभाव, निटनेटकेपणा, कष्ट करण्याची तयारी, इतरांशी आपुलकीने बोलणे अशा सर्वसंपन्न गुण प्राप्त केलेल्या कैद्यांना दोन ते अडीच वर्षांच्या शिक्षेत सूट मिळाली आहे. त्यापैकी वीस कैद्यांना २ आॅक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त कारागृहातून घरी सोडले जाणार आहे. कारागृह प्रशासनाने या कैद्यांच्या सुटकेचा ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कारागृहात आल्यापासून चांगली वर्तणूक, शांत स्वभाव, निटनेटकेपणा, कष्ट करण्याची तयारी, इतरांशी आपुलकीने बोलणे अशा सर्वसंपन्न गुण प्राप्त केलेल्या कैद्यांना दोन ते अडीच वर्षांच्या शिक्षेत सूट मिळाली आहे. त्यापैकी वीस कैद्यांना २ आॅक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त कारागृहातून घरी सोडले जाणार आहे. कारागृह प्रशासनाने या कैद्यांच्या सुटकेचा आगळा-वेगळा निरोपाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. यंदाची दिवाळी या कैद्यांना कुटुंबासोबत साजरी करण्याचे भाग्य मिळाले आहे. या गोड बातमीने कुटुंबीयांचा आनंदही ओसंडून वाहत आहे. गेल्या दोन वर्षांत शिक्षा माफ झालेल्या सुमारे ४५० कैद्यांना कारागृहातून घरी सोडले आहे.२ आॅक्टोबर या गांधी जयंतीला यंदा दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने गांधी वर्ष साजरे करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार नियमात बसलेल्या ६० वर्षांवरील पुरुष व ५५ वर्षांच्या पुढील महिला कैद्यांची शिक्षा माफ करून त्यांना घरी सोडण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे. त्यांच्या निरोपाचा कार्यक्रम एकाचवेळी देशातील तीन हजार कारागृहांत आयोजित केला आहे. महाराष्टÑात ५२ कारागृह आहेत. समाजातील काही व्यक्तींकडून कळत-नकळतपणे, अनवधानाने किंवा रागाच्या भरात घडलेल्या एका चुकीमुळे अनेक तरुण विविध बंदी कारागृहांत न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगत आहेत. जीवनातील उमेदीचा काळ कारागृहातच जातो.सात ते चौदा वर्षे आणि आजन्म कारावास अशी शिक्षेची तरतूद आहे. कारागृहात पडेल ते काम करण्याची तयारी, चांगली वर्तणूक, शांत स्वभाव, आपुलकीने बोलणे, आदी कैद्यांच्या रोजच्या दिनमानाची नोंद कारागृहात ठेवली जाते. चार वर्षे शिक्षा चांगल्या प्रकारे भोगली आहे व कैद्यांच्या मानसिकतेत चांगला बदल झाला आहे, याची खात्री कारागृह अधीक्षकांना झाल्यानंतर ते शासनाच्या कक्षेत राहून कैद्यांना शिक्षेत सूट देतात.१९८५ कैद्यांचामुक्काम कारागृहातकळंबा कारागृहात मुंबई, ठाणे, कल्याण, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आदी ठिकाणांचे १९१४ पुरुष व ७१ महिला असे १९८५ कैदी या ठिकाणी शिक्षा भोगत आहेत. कैद्यांना ठेवण्यासाठी सर्वसोयींनी-युक्त११ बरॅक्स या ठिकाणी आहेत.कमिटीच्या निर्णयानंतर सुटकाखुनाच्या गुन्ह्यांत आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्या कारागृहातील दोन महिलांसह पंधरा कैद्यांना आतापर्यंत चौदा वर्षांच्या शिक्षेनंतर घरी सोडून दिले आहे. या शिक्षेत कैद्याला शेवटच्या श्वासापर्यंत कारागृहात राहावे लागते; परंतु त्याची वर्तणूक चांगली असेल, त्याचे वय ६५ च्या पुढे असेल तर शासनाने नियुक्तकेलेले कारागृह अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांची कमिटी या कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेते.