शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

गांधी जयंतीला राज्यातील १२५ कैद्यांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 00:42 IST

कारागृह प्रशासनाने या कैद्यांच्या सुटकेचा गांधीजींच्या जन्माच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त निरोपाचा आगळावेगळा कार्यक्रमही आयोजित केला आहे. यंदाचा दसरा आणि दिवाळी सण या कैद्यांना कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचे भाग्य मिळाले आहे. या गोड बातमीने कुटुंबीयांचा आनंदही ओसंडून वाहत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । चांगल्या वर्तनामुळे ५२ कारागृहांतील ५० टक्के शिक्षा माफ झालेले कैदी

एकनाथ पाटील ।कोल्हापूर : कारागृहात आल्यापासून चांगली वर्तणूक, शांत स्वभाव, नीटनेटकेपणा, कष्ट करण्याची तयारी, इतरांशी आपुलकीने बोलणे अशा सर्वसंपन्न गुण प्राप्त केलेल्या कैद्यांना दोन ते अडीच वर्षांच्या शिक्षेत सूट मिळाली आहे. २ आॅक्टोबरला गांधीजींच्या जन्माला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने केंद्र शासनाकडून ‘गांधी वर्ष’ साजरे केले जात आहे. देशातील तीन हजार कारागृहांत कार्यक्रम होत असून, गांधी जयंतीला राज्यातील ५२ कारागृहांतून १२५ कैद्यांची सुटका होत आहे. त्यामध्ये कळंबा कारागृहातील १० कैद्यांचा समावेश आहे.

कारागृह प्रशासनाने या कैद्यांच्या सुटकेचा गांधीजींच्या जन्माच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त निरोपाचा आगळावेगळा कार्यक्रमही आयोजित केला आहे. यंदाचा दसरा आणि दिवाळी सण या कैद्यांना कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचे भाग्य मिळाले आहे. या गोड बातमीने कुटुंबीयांचा आनंदही ओसंडून वाहत आहे.

महाराष्टÑात ५२ कारागृहे आहेत. समाजातील काही व्यक्तींकडून कळत-नकळतपणे, अनवधानाने किंवा रागाच्या भरात घडलेल्या एका चुकीमुळे अनेक तरुण बंदी विविध कारागृहांत न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगत आहेत. जीवनातील उमेदीचा काळ कारागृहातच जातो. गुन्हा करून शिक्षा भोगण्यास आलेल्या कैद्यांना कारागृहाच्या नियमावलीच्या चाकोरीत राहावे लागते. सात ते चौदा वर्षे आणि आजन्म कारावास अशी शिक्षेची तरतूद आहे. कारागृहात पडेल ते काम करण्याची तयारी, चांगली वर्तणूक, शांत स्वभाव, समोरच्याशी आपुलकीने बोलणे, आदी कैद्यांच्या रोजच्या दिनमानाची नोंद कारागृहात ठेवली जाते. चार वर्षे शिक्षा अतिशय चांगल्या प्रकारे भोगली आहे व कैद्यांच्या मानसिकतेत चांगला बदल झाला आहे, याची खात्री कारागृह अधीक्षकांना झाल्यानंतर ते शासनाच्या नियमावलीच्या कक्षेत राहून कैद्यांना शिक्षेत सूट देतात. त्यानिमित्त २ आॅक्टोबरला नियमात बसलेल्या ६० वर्षांवरील पुरुष व ५५ वर्षांच्या पुढील महिला कैद्यांची शिक्षा माफ करून त्यांना घरी सोडण्याचा निरोपाचा कार्यक्रम एकाच वेळी देशातील तीन हजार कारागृहांत आयोजित करण्यात आला आहे.कमिटी घेते सुटकेचा निर्णयखुनाच्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्या कारागृहातील दोन महिलांसह १५ कैद्यांना आतापर्यंत १४ वर्षांच्या शिक्षेनंतर घरी सोडून दिले आहे. या शिक्षेत कैद्याला शेवटच्या श्वासापर्यंत कारागृहात राहावे लागते; परंतु त्याची वर्तणूक चांगली असेल, त्याचे वय ६५ च्या पुढे असेल तर शासनाने नियुक्तकेलेले कारागृह अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक यांची समिती या कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेते.‘कळंबा’तील दहा कैद्यांचा समावेशकळंबा कारागृहाने गेल्या वर्षभरात स्वत:च्या स्वभावात आणि मानसिकतेत चांगला बदल करणाऱ्या ११ कैद्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षेत सूट देऊन घरी सोडले आहे. २ आॅक्टोबरला आणखी दहा कैद्यांची सुटका केली जाणार आहे.- शरद शेळके, कारागृह अधीक्षक, कळंबा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंग