शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

गांधी जयंतीला राज्यातील १२५ कैद्यांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 00:42 IST

कारागृह प्रशासनाने या कैद्यांच्या सुटकेचा गांधीजींच्या जन्माच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त निरोपाचा आगळावेगळा कार्यक्रमही आयोजित केला आहे. यंदाचा दसरा आणि दिवाळी सण या कैद्यांना कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचे भाग्य मिळाले आहे. या गोड बातमीने कुटुंबीयांचा आनंदही ओसंडून वाहत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । चांगल्या वर्तनामुळे ५२ कारागृहांतील ५० टक्के शिक्षा माफ झालेले कैदी

एकनाथ पाटील ।कोल्हापूर : कारागृहात आल्यापासून चांगली वर्तणूक, शांत स्वभाव, नीटनेटकेपणा, कष्ट करण्याची तयारी, इतरांशी आपुलकीने बोलणे अशा सर्वसंपन्न गुण प्राप्त केलेल्या कैद्यांना दोन ते अडीच वर्षांच्या शिक्षेत सूट मिळाली आहे. २ आॅक्टोबरला गांधीजींच्या जन्माला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने केंद्र शासनाकडून ‘गांधी वर्ष’ साजरे केले जात आहे. देशातील तीन हजार कारागृहांत कार्यक्रम होत असून, गांधी जयंतीला राज्यातील ५२ कारागृहांतून १२५ कैद्यांची सुटका होत आहे. त्यामध्ये कळंबा कारागृहातील १० कैद्यांचा समावेश आहे.

कारागृह प्रशासनाने या कैद्यांच्या सुटकेचा गांधीजींच्या जन्माच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त निरोपाचा आगळावेगळा कार्यक्रमही आयोजित केला आहे. यंदाचा दसरा आणि दिवाळी सण या कैद्यांना कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचे भाग्य मिळाले आहे. या गोड बातमीने कुटुंबीयांचा आनंदही ओसंडून वाहत आहे.

महाराष्टÑात ५२ कारागृहे आहेत. समाजातील काही व्यक्तींकडून कळत-नकळतपणे, अनवधानाने किंवा रागाच्या भरात घडलेल्या एका चुकीमुळे अनेक तरुण बंदी विविध कारागृहांत न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगत आहेत. जीवनातील उमेदीचा काळ कारागृहातच जातो. गुन्हा करून शिक्षा भोगण्यास आलेल्या कैद्यांना कारागृहाच्या नियमावलीच्या चाकोरीत राहावे लागते. सात ते चौदा वर्षे आणि आजन्म कारावास अशी शिक्षेची तरतूद आहे. कारागृहात पडेल ते काम करण्याची तयारी, चांगली वर्तणूक, शांत स्वभाव, समोरच्याशी आपुलकीने बोलणे, आदी कैद्यांच्या रोजच्या दिनमानाची नोंद कारागृहात ठेवली जाते. चार वर्षे शिक्षा अतिशय चांगल्या प्रकारे भोगली आहे व कैद्यांच्या मानसिकतेत चांगला बदल झाला आहे, याची खात्री कारागृह अधीक्षकांना झाल्यानंतर ते शासनाच्या नियमावलीच्या कक्षेत राहून कैद्यांना शिक्षेत सूट देतात. त्यानिमित्त २ आॅक्टोबरला नियमात बसलेल्या ६० वर्षांवरील पुरुष व ५५ वर्षांच्या पुढील महिला कैद्यांची शिक्षा माफ करून त्यांना घरी सोडण्याचा निरोपाचा कार्यक्रम एकाच वेळी देशातील तीन हजार कारागृहांत आयोजित करण्यात आला आहे.कमिटी घेते सुटकेचा निर्णयखुनाच्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्या कारागृहातील दोन महिलांसह १५ कैद्यांना आतापर्यंत १४ वर्षांच्या शिक्षेनंतर घरी सोडून दिले आहे. या शिक्षेत कैद्याला शेवटच्या श्वासापर्यंत कारागृहात राहावे लागते; परंतु त्याची वर्तणूक चांगली असेल, त्याचे वय ६५ च्या पुढे असेल तर शासनाने नियुक्तकेलेले कारागृह अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक यांची समिती या कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेते.‘कळंबा’तील दहा कैद्यांचा समावेशकळंबा कारागृहाने गेल्या वर्षभरात स्वत:च्या स्वभावात आणि मानसिकतेत चांगला बदल करणाऱ्या ११ कैद्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षेत सूट देऊन घरी सोडले आहे. २ आॅक्टोबरला आणखी दहा कैद्यांची सुटका केली जाणार आहे.- शरद शेळके, कारागृह अधीक्षक, कळंबा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंग