शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

समन्वय समितीच्या फॉर्म्युल्यानुसार निधी; कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 12:16 IST

'सुळकूड योजनेशिवाय इचलकरंजीला स्वच्छ व मुबलक पाणी देऊ'

कोल्हापूर : महायुतीच्या राज्यस्तरीय समन्वय समितीने निश्चित केलेल्या फाॅर्म्युल्यानुसार निधीचे वाटप केले जाईल. मित्र पक्ष ज्यांचे आहेत, त्यांनी त्यांच्या वाट्यातून निधी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जिल्हा नियोजनच्या ४८० कोटी निधी पैकी ७४ कोटीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, उर्वरित निधी व समाजकल्याण विभागाचा निधी लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी २०२४ अखेर खर्च करण्याचे नियोजनही बैठकीत करण्यात आले.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी शासकीय विश्रामगृहात महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, विनय कोरे, सुरेश हाळवणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने, राजेखान जमादार, ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, आदिल फरास, आदी उपस्थित होते.यामध्ये, जिल्हा नियोजन समितीकडील शिल्लक निधी, समाजकल्याणकडील ११७ कोटींचा निधी यासह शासकीय कमिट्यांवर चर्चा झाली. राज्यस्तरीय समन्वय समितीकडून ‘३०:३०:३०:१०’ असा निधी वाटपासह सर्वच नियुक्त्यांबाबत फाॅर्म्युला ठरला आहे. त्यानुसारच जिल्हास्तरावर वाटप करण्यात येईल, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. महिने कमी आहेत आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचे आहे. यासाठी महायुतीच्या सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.साधारणत: मार्च २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकेल, तत्पूर्वी म्हणजेच फेब्रु्वारीअखेर सर्व निधी खर्च करण्याचे नियोजन करावे लागेल. विशेष कार्यकारी अधिकारी, संजय गांधी पेन्शन योजनासह तालुका व जिल्हास्तरीय समित्या तातडीने केल्या जाणार, प्रत्येकांनी आपले नावे देण्याची सूचनाही त्यांनी केली.

नुसते ‘सदस्य’ नको निधी द्याजिल्हा नियोजन समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली जाते; मात्र त्यांना निधी दिला जात नाही. नुसते सदस्य नको त्यांना काहीतरी निधी द्या, अशी सूचना खासदारांनी केली.

इचलकरंजीला स्वच्छ पाणी देऊइचलकरंजी पाणी योजनेचा विषय खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी काढला. यावर सुळकूड योजनेशिवाय इचलकरंजीला स्वच्छ व मुबलक पाणी देऊ, अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

विनय कोरेंना हवा पदांचा ६० टक्के हिस्सा?पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यांत शासकीय कमिट्यांसह इतर बाबींमध्ये जनसुराज्य पक्षाला ६० टक्के हिस्सा हवा, असा आग्रह आमदार विनय कोरे यांनी केल्याचे समजते.

संजय गांधी पेन्शन दोन दिवसांतसंजय गांधी यासह इतर पेन्शन योजनेचे पैसे लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत. येत्या दोन दिवसांत संबंधितांच्या खात्यावर जमा होतील, असे मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तालुकास्तरीय समित्यांची पुनर्रचना होणारभाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यानंतर काही तालुक्यांत तालुकास्तरीय समित्या झाल्या आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्याने तेथील समित्यांची पुनर्रचना होणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना