शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा

By admin | Updated: November 22, 2015 00:34 IST

भाई जगताप : ‘दिशाहीन महाराष्ट्र’साठी आंदोलन

कोल्हापूर : राज्य सरकारने कामगार कायद्यात बदल करण्यासंदर्भात काढलेल्या अध्यादेशामुळे सुमारे एक कोटीहून अधिक कामगारांवर वेठबिगारीचे संकट येण्याची भीती आहे. याशिवाय शेतकरी, कामगार, उद्योग, शेतीमाल याबाबतही फडणवीस सरकारचे शाश्वत धोरण नसल्याचा निषेध नोंदवत, ‘दिशाहीन महाराष्ट्र’साठी ८ डिसेंबरला नागपूर विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा काँग्रेसच्या माध्यमातून काढणार असल्याची माहिती भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत दिली. भाई जगताप म्हणाले, राज्यातील कामगार कायदे बदलण्याचा घाट मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सरकार करीत आहे. त्यासाठी १५ सप्टेंबरला शासकीय अध्यादेश काढला आहे. हे सरकार मागील दाराने येऊन कायदे पास करीत असल्याचाही त्यांनी आरोप केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या या धोरणामुळे खासगीकरणाने जोर धरला असून, ही परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. या नव्या कायद्यामुळे कामगारांना मिळणाऱ्या लाभांपासून वंचित राहावे लागणार आहे, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार आहे. कंत्राटी कामगारांना कधीही नोकरीवरून काढून टाकण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असेही ते म्हणाले. ते म्हणाले, राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, थेट शेतीमालाला भाव नाही, कर्जमुक्ती प्रकरणाकडे दुर्लक्ष, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. कर्जमुक्ती करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याची त्यांनी खंत व्यक्त करून आत्महत्या पन्नास टक्के कमी करता येतात, हे सांगून गेल्या दहा वर्षांतील कर्जमुक्ती प्रकरणाचा आढावा त्यांनी घेतला. जलशिवार योजनेच्या नावाखाली २४ टीएमसी पाणी वाचविल्याचे मुख्यमंत्री फडणवीस सांगत असले, तरी ते पाणी कोठे साठविले आहे, याचाही त्यांनी खुलासा करावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. त्यांच्या या वर्षातील कामगिरीवर प्रकाश टाकला असता ‘दिशाहीन महाराष्ट्र’ हेच समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कामगारविरोधी धोरण, उद्योगांची दुरवस्था यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. डाळीचे दर गगनाला भिडले असून, महाराष्ट्रातील एका विभागातून ६४ हजार टन डाळ जप्त केली; पण या साठेबाज व्यापाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही व डाळही कमी दराने सामान्यांपर्यंत पोहोचली नाही. (प्रतिनिधी) भाई म्हणाले, केंद्र सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारला सव्वा लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले; मग महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कर्जमुक्तीसाठी फक्त वीस हजार कोटी रुपये आवश्यक आहेत; पण त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत, असे सांगितले जाते. परदेशातील उद्योग भारतात यावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशी दौरे करीत आहेत, ते स्वागतार्ह आहे; पण राज्य शासनाच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात जात असल्याने ते थांबविण्याचेही प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस करीत नाहीत. त्यामुळे दिशाहीन महाराष्ट्राबाबत सरकारने उत्तर द्यावे.