शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

महाराष्ट्र यांना कंटाळलाय, काँग्रेसचे बारा वाजवा; माजी मंत्री पंकजा मुंडेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 11:06 IST

या सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजबिलाचा प्रश्न, महिलांचे प्रश्न सोडवले नाहीत. ज्या मराठा समाजाच्या जीवावर इतकी वर्षें राज्य केले त्या समाजाला दिलेले आरक्षण घालवले. त्यामुळे कधी एकदा हे सरकार बदलतंय म्हणून महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक देव पाण्यात घालून बसले आहेत.

कोल्हापूर : केवळ आपल्या पक्षांच्या मंत्र्यांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. संपूर्ण महाराष्ट्र यांना कंटाळलाय. कोल्हापूरकरांना चांगली संधी आली आहे. तेव्हा १२ तारखेला काँग्रेसचे १२ वाजवा, असे आवाहन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

कोल्हापूर उत्तरचे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ बुधवारी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार सिध्दार्थ शिराळे, विक्रांत पाटील, शौमिका महाडिक, नीता केळकर, उमाताई खापरे उपस्थित होत्या.

मुंडे म्हणाल्या, या सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजबिलाचा प्रश्न, महिलांचे प्रश्न सोडवले नाहीत. ज्या मराठा समाजाच्या जीवावर इतकी वर्षें राज्य केले त्या समाजाला दिलेले आरक्षण घालवले, इतर मागास समाजाचे राजकीय आरक्षण असुरक्षित करण्याचे पाप यांनी केले. त्यामुळे कधी एकदा हे सरकार बदलतंय म्हणून महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक देव पाण्यात घालून बसले आहेत.

कोल्हापूरच्या जनतेवर टोल बसू नये म्हणून चंद्रकांत पाटील यांनी आग्रह करून देवेेंद्र फडणवीस यांच्याकडून टोल माफ करून घेतला याची मी साक्षीदार आहे. महिलांना गॅस, जनधन खाती, कोरोना काळात खात्यात पैसे, बेटी बचाव, बेटी पढाओ गरीब आणि महिलांसाठीच्या या सर्व योजना नरेंद्र मोदी यांनी सुरू केल्या.

समरजित घाटगे म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच खरी जातीयवादी आहे. म्हणूनच त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले नाही. संभाजीराजेंनी केलेल्या मागण्या मान्य केल्या नाहीत. आण्णासाहेब पाटील महामंडळासाठी निधी दिला नाही.

सत्यजित कदम म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालय पुराच्या पाण्याखाली गेल्यानंतर तरी मंत्री जागे होतील. ई वॉर्डात पाणी येणार नाही यासाठी मीटिंग घेतील असे वाटले होते. परंतु यातील काही झाले नाही. कोल्हापुरात ना महिलांसाठी स्वच्छतागृहे झाली. ना थेट पाइपलाइन झाली.

सुनील देवधर म्हणाले, साधूंची हत्या करणाऱ्यांना पाठीशी घालणारे, हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसणारे, नवाब मलिक यांची पाठराखण करणारे हे ठाकरे, पवार यांचे हे सरकार हिंदूविरोधी आहे. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, विजय जाधव, महेश जाधव यांची भाषणे झाली. गणेश देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

शिवसैनिकांनी कुणाकडे पाहायचं

मुंडे म्हणाल्या, मला अशी माहिती मिळाली की, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. परंतु या निवडणुकीत त्यांचा उमेदवारच नाही. गेली ३०/३५ वर्षे शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांनी कोणाकडे पाहायचं. त्यांच्यामध्ये मोठी नाराजी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकPankaja Mundeपंकजा मुंडेcongressकाँग्रेस