शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र यांना कंटाळलाय, काँग्रेसचे बारा वाजवा; माजी मंत्री पंकजा मुंडेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 11:06 IST

या सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजबिलाचा प्रश्न, महिलांचे प्रश्न सोडवले नाहीत. ज्या मराठा समाजाच्या जीवावर इतकी वर्षें राज्य केले त्या समाजाला दिलेले आरक्षण घालवले. त्यामुळे कधी एकदा हे सरकार बदलतंय म्हणून महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक देव पाण्यात घालून बसले आहेत.

कोल्हापूर : केवळ आपल्या पक्षांच्या मंत्र्यांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. संपूर्ण महाराष्ट्र यांना कंटाळलाय. कोल्हापूरकरांना चांगली संधी आली आहे. तेव्हा १२ तारखेला काँग्रेसचे १२ वाजवा, असे आवाहन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

कोल्हापूर उत्तरचे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ बुधवारी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार सिध्दार्थ शिराळे, विक्रांत पाटील, शौमिका महाडिक, नीता केळकर, उमाताई खापरे उपस्थित होत्या.

मुंडे म्हणाल्या, या सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजबिलाचा प्रश्न, महिलांचे प्रश्न सोडवले नाहीत. ज्या मराठा समाजाच्या जीवावर इतकी वर्षें राज्य केले त्या समाजाला दिलेले आरक्षण घालवले, इतर मागास समाजाचे राजकीय आरक्षण असुरक्षित करण्याचे पाप यांनी केले. त्यामुळे कधी एकदा हे सरकार बदलतंय म्हणून महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक देव पाण्यात घालून बसले आहेत.

कोल्हापूरच्या जनतेवर टोल बसू नये म्हणून चंद्रकांत पाटील यांनी आग्रह करून देवेेंद्र फडणवीस यांच्याकडून टोल माफ करून घेतला याची मी साक्षीदार आहे. महिलांना गॅस, जनधन खाती, कोरोना काळात खात्यात पैसे, बेटी बचाव, बेटी पढाओ गरीब आणि महिलांसाठीच्या या सर्व योजना नरेंद्र मोदी यांनी सुरू केल्या.

समरजित घाटगे म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच खरी जातीयवादी आहे. म्हणूनच त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले नाही. संभाजीराजेंनी केलेल्या मागण्या मान्य केल्या नाहीत. आण्णासाहेब पाटील महामंडळासाठी निधी दिला नाही.

सत्यजित कदम म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालय पुराच्या पाण्याखाली गेल्यानंतर तरी मंत्री जागे होतील. ई वॉर्डात पाणी येणार नाही यासाठी मीटिंग घेतील असे वाटले होते. परंतु यातील काही झाले नाही. कोल्हापुरात ना महिलांसाठी स्वच्छतागृहे झाली. ना थेट पाइपलाइन झाली.

सुनील देवधर म्हणाले, साधूंची हत्या करणाऱ्यांना पाठीशी घालणारे, हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसणारे, नवाब मलिक यांची पाठराखण करणारे हे ठाकरे, पवार यांचे हे सरकार हिंदूविरोधी आहे. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, विजय जाधव, महेश जाधव यांची भाषणे झाली. गणेश देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

शिवसैनिकांनी कुणाकडे पाहायचं

मुंडे म्हणाल्या, मला अशी माहिती मिळाली की, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. परंतु या निवडणुकीत त्यांचा उमेदवारच नाही. गेली ३०/३५ वर्षे शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांनी कोणाकडे पाहायचं. त्यांच्यामध्ये मोठी नाराजी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकPankaja Mundeपंकजा मुंडेcongressकाँग्रेस