शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीची जागा माजी पालकमंत्र्यांनी हडपली, राजेश क्षीरसागरांचा आरोप

By भारत चव्हाण | Updated: November 16, 2023 19:41 IST

२ जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा ख्रिश्चन समाजाने दिला इशारा

कोल्हापूर : ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीची जागा माजी पालकमंत्र्यांनी हाडपली असल्याचा आरोप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी येथे केला. ख्रिश्चन समाजाच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी क्षीरसागर यांना भेटून दफनभूमीच्या जागेबाबत चर्चा केली. त्यानंतर क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा केली. अन् त्यांनी हा आरोप केला.ख्रिश्चन समाजाला दफनभूमी साठी जागा उपलब्ध करताना प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत होती. सन २०१४ पासून कदमवाडी येथील जागा दफनभूमीला देण्याची प्रक्रिया सुरु होती. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ही जागा दफनभूमीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. असे असताना सद्यस्थितीत ही जागा डी. वाय. पाटील महाविद्यालय या संस्थेला देण्यात आली असल्याचे दिसत आहे. पालकमंत्री म्हणून काम करताना जनतेचे पालकत्व स्वीकारून जनतेच्या जिव्हाळ्याची कामे बाजूला ठेवून जनतेच्या जागा हडपण्याचे पाप माजी पालकमंत्र्यांनी केले असून याचे उत्तर जनताच त्यांना देईल, अशी टीका क्षीरसागर यांनी केली.

एकीकडे ख्रिश्चन समाजाला दफनविधी करण्याकरीता जागा उपलब्ध होत नसताना नियोजित केलेली जागा परस्पर खाजगी संस्थेला देण्यात आली? या मागील गौडबंगाल काय आहे? जागेच्या मोबदल्यात आवश्यक शासकीय शुल्क संबधित संस्थेने भरले आहे का? कोणत्या आधारावर सदर जागा दिली गेली? अशी विचारणा क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना केली. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून कामात हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पर्यायी जागा देण्याचा विचार करुयाबाबत प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी दफनभूमीसाठी पर्यायी जागा देता येईल का? याचा विचार केला जाईल, असे सांगितले.

२ जानेवारीपासून आमरण उपोषणख्रिश्चन समाजाच्या शिष्टमंडळाने आपल्या वेदना राजेश क्षीरसागर तसेच प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या समोर मांडली. जर यातून मार्ग निघाला नाही तर महापालिकेच्या दारात २ जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा ख्रिश्चन समाजाच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील