शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 10:32 IST

आठवड्याला दूधाच्या माध्यमातून पैसा मिळू लागल्याने प्रत्येक कुटुंबात दुधाची क्रांती आणण्याचे काम काम रवींद्र आपटे यांनी केले आहे. 

- सदाशिव मोरे

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष  व महानंदा दूध डेअरीचे उपाध्यक्ष रवींद्र पांडुरंग आपटे यांचे रात्री निधन झाले. त्यांनी गोकुळ दूध संघावर सलग ३५ वर्षे संचालक, दोन वेळा अध्यक्ष म्हणून काम पाहिले. वासरू संगोपनसारख्या योजना गोकुळच्या माध्यमातून राबवून शेतकरी कुटुंबात क्रांती घडविण्याचा प्रयत्न रवींद्र आपटे यांनी केला. कोल्हापूर येथे दुपारी १२ नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

१९८७ पूर्वी त्यांनी बीएससी अॅग्रीचे शिक्षण घेऊन उत्तूर ( ता. आजरा ) येथे गाईचा गोठा सुरू केला होता. देशात परदेशातही चांगल्या नोकरीची संधी असताना त्यांनी दुग्ध व्यवसायाकडे दिले. आपल्या गाईच्या गोठ्यातील दूध पाठविण्यासाठी उत्तुर येथे जनता दूध डेअरीची स्थापना केली. त्यांनी गायीच्या गोठ्याच्या माध्यमातून विविध प्रयोगातून दूधाची वाढ केल्यामुळे गोकुळ दूध संघावर काम करण्याची संधी मिळाली. १९८७ ते २०२२ पर्यंत सलग ३५ वर्षे गोकुळवर त्यांनी संचालक म्हणून काम केले आहे.

तालुक्यात १५ ते २० असणाऱ्या दूध संस्था त्यांच्या काळात ३०० ते ३५० च्या दरम्यान पोहोचल्या. दूधामध्येही विक्रमी वाढ झाली. दूध संस्था गावोगावी तयार झाल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहू लागले. आठवड्याला दूधाच्या माध्यमातून पैसा मिळू लागल्याने प्रत्येक कुटुंबात दुधाची क्रांती आणण्याचे काम काम रवींद्र आपटे यांनी केले आहे. 

गोकुळच्या माध्यमातून तालुक्यातील जवळपास  शंभर ते दीडशे मुलांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. आजरा ट्रान्स्पोर्ट हा व्यवसायही त्यांनी चांगल्या पद्धतीने चालविला.उत्तूर व आजरा येथील शेतीमध्ये त्यांनी विविध प्रयोग केले आहेत. त्यांच्या पश्चात महालक्ष्मी बँक कोल्हापूरच्या संचालिका पद्मजा आपटे, दोन मुलगे, सून व भाऊ सुधीर आपटे असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ