शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

Kolhapur News: निसर्गाचा असहकार.. किरणोत्सवाला नकार; गेल्या पाच वर्षात प्रथमच खंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 16:24 IST

पुढील किरणोत्सवासाठी नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार

कोल्हापूर : वातावरणाने पुकारलेल्या असहकारामुळे यंदा गेल्या पाच सात वर्षात प्रथमच करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा किरणोत्सव झाला नाही. यामुळे निसर्ग देवता आणि शक्तिदेवतेच्या भेटीचा सोहळा भाविकांना अनुभवता आला नाही. आता पुढील किरणोत्सवासाठी नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.वर्षातून दोनदा होणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा किरणोत्सव ३० जानेवारीपासून सुरू झाला. त्याआधी दोन दिवस केलेल्या पाहणीदरम्यान किरणे देवीच्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत आली होती. पण नेमक्या किरणोत्सवाच्या मुख्य तारखांनाच यंदा किरणोत्सव झाला नाही. कितीही ढगाळ वातावरण असले तरी किमान किरणे चरणस्पर्श करतात किंवा कमरेपर्यंत येऊन लुप्त होतात. यंदा मात्र ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या महत्वाच्या चार दिवसांत सूर्यकिरणे मंदिरापर्यंतदेखील पोहोचू शकली नाहीत. फार तर गरुड मंडप किंवा गणपती चौक एवढाच पल्ला किरणांनी गाठला. पितळी उंबऱ्यातून आतदेखील आली नाहीत. त्यामुळे किरणोत्सव न होण्यास ज्या प्रमाणात अडथळे कारणीभूत आहेत त्याचप्रमाणात निसर्गाचा मूडही जबाबदार असल्याचे दिसून आले.अंबाबाईचा किरणोत्सव आणि सूर्यकिरणे हा पूर्णत: निसर्ग सोहळा आहे त्यामध्ये अडथळा येऊ नये याची काळजी फक्त घेता येते पण निसर्गापुढे काही चालत नाही. सूर्यासमोर ढग आले, ढगाळ वातावरणामुळे किरणांची तीव्रता कमी झाली, वातावरणातील प्रदूषण, थंडीमुळे धुके अशा कारणांमुळे नव्या वर्षातील पहिला किरणोत्सव झाला नाही. आता पुढच्या किरणोत्सवासाठी नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर