शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Kolhapur News: निसर्गाचा असहकार.. किरणोत्सवाला नकार; गेल्या पाच वर्षात प्रथमच खंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 16:24 IST

पुढील किरणोत्सवासाठी नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार

कोल्हापूर : वातावरणाने पुकारलेल्या असहकारामुळे यंदा गेल्या पाच सात वर्षात प्रथमच करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा किरणोत्सव झाला नाही. यामुळे निसर्ग देवता आणि शक्तिदेवतेच्या भेटीचा सोहळा भाविकांना अनुभवता आला नाही. आता पुढील किरणोत्सवासाठी नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.वर्षातून दोनदा होणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा किरणोत्सव ३० जानेवारीपासून सुरू झाला. त्याआधी दोन दिवस केलेल्या पाहणीदरम्यान किरणे देवीच्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत आली होती. पण नेमक्या किरणोत्सवाच्या मुख्य तारखांनाच यंदा किरणोत्सव झाला नाही. कितीही ढगाळ वातावरण असले तरी किमान किरणे चरणस्पर्श करतात किंवा कमरेपर्यंत येऊन लुप्त होतात. यंदा मात्र ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या महत्वाच्या चार दिवसांत सूर्यकिरणे मंदिरापर्यंतदेखील पोहोचू शकली नाहीत. फार तर गरुड मंडप किंवा गणपती चौक एवढाच पल्ला किरणांनी गाठला. पितळी उंबऱ्यातून आतदेखील आली नाहीत. त्यामुळे किरणोत्सव न होण्यास ज्या प्रमाणात अडथळे कारणीभूत आहेत त्याचप्रमाणात निसर्गाचा मूडही जबाबदार असल्याचे दिसून आले.अंबाबाईचा किरणोत्सव आणि सूर्यकिरणे हा पूर्णत: निसर्ग सोहळा आहे त्यामध्ये अडथळा येऊ नये याची काळजी फक्त घेता येते पण निसर्गापुढे काही चालत नाही. सूर्यासमोर ढग आले, ढगाळ वातावरणामुळे किरणांची तीव्रता कमी झाली, वातावरणातील प्रदूषण, थंडीमुळे धुके अशा कारणांमुळे नव्या वर्षातील पहिला किरणोत्सव झाला नाही. आता पुढच्या किरणोत्सवासाठी नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर