शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा तीनवेळा आरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 16:04 IST

राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आता आरक्षण नको, निवडणूक कधी होणार ते सांगा, असा प्रश्न उपस्थित केला.

कोल्हापूर : निवडणूक न घेता महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच तिसऱ्यावेळी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात शुक्रवारी आरक्षण सोडत काढण्याची वेळ निवडणूक प्रशासनावर आली. यामुळेच शुक्रवारच्या आरक्षण सोडतीवेळी उपस्थित असलेल्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आता आरक्षण नको, निवडणूक कधी होणार ते सांगा, असा प्रश्न उपस्थित केला. मात्र याचे उत्तर महापालिका निवडणूक यंत्रणेकडे नसल्याने ते निरुत्तर झाले.महापालिकेच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० रोजी संपली. त्यावेळी कोरोनाचा प्रसार व्यापक प्रमाणात होता. यामुळे निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली नाही. महापालिकेेवर डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने २१ डिसेंबर २०२० मध्ये आरक्षणाची सोडत काढण्यात आली. मतदार यादीही तयार करण्यात आली. पण पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने निवडणूक प्रक्रियेला ब्रेक लागला. प्रशासक डॉ. बलकवडे यांना मुदतवाढ मिळाली. अजूनही प्रशासकराजच आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना एकऐवजी तीन सदस्यीय प्रभागरचना जाहीर केली. यानुसार नव्याने शहरात ८१ ऐवजी ३१ प्रभागात ९१ नगरसेवक झाले. दरम्यानच्या काळात न्यायालयाने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केले. यामुळे ओबीसीशिवायचे आरक्षण ३१ मे २०२२ रोजी काढण्यात आले. अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करून मतदार यादीचे कामही केले जात आहे. प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाल्याने इच्छुक तयारीलाही लागले होते. नुकतेच पुन्हा ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले. यामुळे ३१ मे रोजीचे आरक्षण रद्द करून पुन्हा ओबीसीसह शुक्रवारी आरक्षण काढण्यात आले.निवडणूक न होता आतापर्यंत तीनवेळा आरक्षण निघाल्याने इच्छुकांमधील आरक्षण प्रक्रियेतील उत्सुकताच नाहीशी झाली आहे. आता नव्याने पडलेले तरी आरक्षण अंतिम आहे का, असाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे. यामुळे जोपर्यंत निवडणुकीची प्रत्यक्षातील प्रक्रिया सुरू होत नाही, तोपर्यंत आरक्षणाचेही काही खरं नाही, अशी भावना काही इच्छुकांमध्ये आहे.

दोनवेळा इच्छुकांच्या तयारीवर पाणी

यापूर्वी दोनवेळा काढण्यात आलेल्या आरक्षणानंतर प्रभागनिहाय इच्छुकांनी जोरदार तयारी केली. मतदारांत संपर्क वाढवला. पण निवडणूक झाली नाही. तिसऱ्यांदा पुन्हा आरक्षण काढण्यात आले. यामुळे दोनवेळा आरक्षण पडल्यानंतर इच्छुकांच्या तयारीवर पाणी फिरले. यावेळीही तरी तसे आता होऊ नये, अशी अपेक्षा आरक्षण सोडतीवेळी उपस्थित असलेल्या इच्छुकांतील काहीजणांनी माध्यमांसमोर व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकreservationआरक्षण