शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

रत्नागिरीतील सैन्यभरतीवेळी ‘व्हाईट आर्मी’चे अन्नछत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 1:15 PM

जीवन मुक्ती सेवा संस्था (व्हाईट आर्मी)च्या वतीने १७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान रत्नागिरीत आयोजित सैन्य भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना मोफत अन्नछत्राची व्यवस्था केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देरत्नागिरीतील सैन्यभरतीवेळी ‘व्हाईट आर्मी’चे अन्नछत्रसलग १४ वर्षे उपक्रम : ३० हजार तरुणांची सोय होणार

कोल्हापूर : जीवन मुक्ती सेवा संस्था (व्हाईट आर्मी)च्या वतीने १७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान रत्नागिरीत आयोजित सैन्य भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना मोफत अन्नछत्राची व्यवस्था केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.सैन्य भरतीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात तरुण येतात. सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांचे भरतीच्या काळात जेवणाखाण्याचे हाल होतात. मुले बिस्कीटे खाऊन, पाणी पिऊन, थंडी वाऱ्यात उपाशी झोपून दिवस काढतात. या मुलांना मोफत जेवण देण्याचा उपक्रम १४ वर्षांपूर्वी व्हाईट आर्मीने सुरू केला.

केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर सांगली, कवठेमहांकाळ, सोलापूर, फलटण, रत्नागिरी, गोवा येथे सैन्यभरतीवेळी मोफत अन्नछत्र उभा केले होते. आतापर्यंत भारतीय स्थलसेना, वायूसेना, १०९ टी. ए. मराठा, माजी सैनिक हरीत सेना, एफआरडीएफ पोलीस भरतीमध्ये सहभागी झालेल्या साडेपाच लाख तरुणांना अन्नछत्राचा लाभ झाला आहे.

अन्नछत्र चालविण्याची जबाबदारी व्हाईट आर्मीचे जवान करतात. जे जेवण बनविले जाते, ते शिस्तबद्ध पद्धतीने वाटप केले जाते. या अन्नछत्राची सैन्य दलातील मेजर जनरल, जनरल, ब्रिगेडीअर्स, कर्नल, आदी अधिकाऱ्यांनी प्रशंसा केल्याचे रोकडे यांनी सांगितले.

सैन्यभरती मोफत अन्नछत्रास धान्य, आर्थिक स्वरूपात मदत वा सेवा करायची असेल त्यांनी व्हाईट आर्मी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहनही अशोक रोकडे यांनी यावेळी केले. 

 

टॅग्स :foodअन्नkolhapurकोल्हापूर