शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूरला खंडपीठासाठी पाठपुरावा, मुख्यमंत्र्यांची मुंबईतील बैठकीत ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 14:39 IST

सहा जिल्ह्यांतील वकील व पक्षकार हे गेल्या ३५ वर्षांपासून खंडपीठासाठी प्रयत्न करत आहेत. सहा जिल्ह्यांतून साडेतीन लाख खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. कोल्हापुरात खंडपीठ झाल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा याची बचत होणार आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांतील पक्षकार, वकील आणि लोकभावना लक्षात घेऊन कोल्हापुरात खंडपीठ अगर सर्किट बेंच व्हावे ही राज्य सरकारचीच भूमिका आहे. यासाठी आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना आजच पत्र देऊ तसेच शासनाच्या वतीने पाठपुरावा करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मंगळवारी दुपारी विधानभवन येथे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीत त्यांनी ही ग्वाही दिली.

विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन खंडपीठ विषयावर प्रदीर्घ चर्चा करत त्यांच्यासमोर लोकभावना मांडल्या. लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळात पालकमंत्री सतेज पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार सर्वश्री ऋतुराज पाटील, अनिकेत तटकरे, अरुण लाड, प्रकाश आबिटकर, शेखर निकम, रणजितसिंह मोहिते-पाटील, जयंत आसगावकर, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, आदींचा सहभाग होता.

बैठकीत सभापती रामराजे निंबाळकर म्हणाले, सहा जिल्ह्यांतील वकील व पक्षकार हे गेल्या ३५ वर्षांपासून खंडपीठासाठी प्रयत्न करत आहेत. सहा जिल्ह्यांतून साडेतीन लाख खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. कोल्हापुरात खंडपीठ झाल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा याची बचत होणार आहे. हा पक्षकारांसह वकिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सहा जिल्ह्यांतील लोकभावना लक्षात घेता कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे ही राज्य सरकारचीच भूमिका आहे, राज्य सरकार त्यासाठी सकारात्मक आहे. राज्य शासनाच्या वतीने आपण स्वत: मुख्य न्यायमूर्तींना आजच पत्र देऊ. हे खंडपीठ लवकरच होण्यासाठी शासनाच्या वतीने पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

फक्त वकिलांचा नव्हे, सर्वसामान्यांचा प्रश्न : सतेज पाटील

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोल्हापुरात खंडपीठ स्थापनेबाबत लोकांच्या भावना तीव्र आहेत. हा लढा फक्त वकिलांचा नसून, सर्वसामान्य जनतेचा बनल्याने आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. गेली ३५ वर्षे खंडपीठासाठी लढा सुरू असल्याने आता खंडपीठाशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पटवून दिले.

कृती समितीची उद्या मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा

कोल्हापूर खंडपीठ कृती समिती आणि महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य हे उद्या, गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. बैठकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य विवेक घाटगे, वसंतराव भोसले, संग्राम देसाई यांच्यासह कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन व खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष गिरीष खडके, सचिव विजयराव ताटे-देशमुख, आदी सदस्य आज, बुधवारी दुपारी मुंबईला रवाना होत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरे