शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

कोल्हापूरला खंडपीठासाठी पाठपुरावा, मुख्यमंत्र्यांची मुंबईतील बैठकीत ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 14:39 IST

सहा जिल्ह्यांतील वकील व पक्षकार हे गेल्या ३५ वर्षांपासून खंडपीठासाठी प्रयत्न करत आहेत. सहा जिल्ह्यांतून साडेतीन लाख खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. कोल्हापुरात खंडपीठ झाल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा याची बचत होणार आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांतील पक्षकार, वकील आणि लोकभावना लक्षात घेऊन कोल्हापुरात खंडपीठ अगर सर्किट बेंच व्हावे ही राज्य सरकारचीच भूमिका आहे. यासाठी आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना आजच पत्र देऊ तसेच शासनाच्या वतीने पाठपुरावा करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मंगळवारी दुपारी विधानभवन येथे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीत त्यांनी ही ग्वाही दिली.

विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन खंडपीठ विषयावर प्रदीर्घ चर्चा करत त्यांच्यासमोर लोकभावना मांडल्या. लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळात पालकमंत्री सतेज पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार सर्वश्री ऋतुराज पाटील, अनिकेत तटकरे, अरुण लाड, प्रकाश आबिटकर, शेखर निकम, रणजितसिंह मोहिते-पाटील, जयंत आसगावकर, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, आदींचा सहभाग होता.

बैठकीत सभापती रामराजे निंबाळकर म्हणाले, सहा जिल्ह्यांतील वकील व पक्षकार हे गेल्या ३५ वर्षांपासून खंडपीठासाठी प्रयत्न करत आहेत. सहा जिल्ह्यांतून साडेतीन लाख खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. कोल्हापुरात खंडपीठ झाल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा याची बचत होणार आहे. हा पक्षकारांसह वकिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सहा जिल्ह्यांतील लोकभावना लक्षात घेता कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे ही राज्य सरकारचीच भूमिका आहे, राज्य सरकार त्यासाठी सकारात्मक आहे. राज्य शासनाच्या वतीने आपण स्वत: मुख्य न्यायमूर्तींना आजच पत्र देऊ. हे खंडपीठ लवकरच होण्यासाठी शासनाच्या वतीने पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

फक्त वकिलांचा नव्हे, सर्वसामान्यांचा प्रश्न : सतेज पाटील

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोल्हापुरात खंडपीठ स्थापनेबाबत लोकांच्या भावना तीव्र आहेत. हा लढा फक्त वकिलांचा नसून, सर्वसामान्य जनतेचा बनल्याने आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. गेली ३५ वर्षे खंडपीठासाठी लढा सुरू असल्याने आता खंडपीठाशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पटवून दिले.

कृती समितीची उद्या मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा

कोल्हापूर खंडपीठ कृती समिती आणि महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य हे उद्या, गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. बैठकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य विवेक घाटगे, वसंतराव भोसले, संग्राम देसाई यांच्यासह कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन व खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष गिरीष खडके, सचिव विजयराव ताटे-देशमुख, आदी सदस्य आज, बुधवारी दुपारी मुंबईला रवाना होत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरे