शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

सांडपाण्याचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष :आयुक्त कलशेट्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:09 IST

पाण्याचा वापर जपून केला तर शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण कमी होईल आणि पर्यायाने पर्यावरणालाही हानी पोहोचणार नाही. म्हणून हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्या ग्राहकांना पाण्याचा वापर कमीत कमी करण्यास सांगावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवारी रात्री शहरातील हॉटेलमालक व्यावसायिकांच्या बैठकीत केले.

ठळक मुद्देसांडपाण्याचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष :आयुक्त कलशेट्टी हॉटेल व्यावसायिकांची बैठक

कोल्हापूर : पाण्याचा वापर जपून केला तर शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण कमी होईल आणि पर्यायाने पर्यावरणालाही हानी पोहोचणार नाही. म्हणून हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्या ग्राहकांना पाण्याचा वापर कमीत कमी करण्यास सांगावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवारी रात्री शहरातील हॉटेलमालक व्यावसायिकांच्या बैठकीत केले.महानगरपालिका प्रशासनाने शहरात लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. एकीकडे जनजागृती आणि दुसरीकडे लोकांच्या सहभागातून नाले, उद्याने, शहर स्वच्छ करण्याची मोहीम राबविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी रात्री हॉटेल अ‍ॅट्रिया येथे आयुक्त कलशेट्टी यांनी कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन मार्गदर्शन केले.हॉटेलमध्ये निर्माण होणाऱ्या दैनंदिन ओल्या व सुक्या कचऱ्यांचे व्यवस्थापन तसेच प्लास्टिकबंदी याबाबत घ्यायची खबरदाररी याविषयी माहिती आयुक्त कलशेट्टी यांनी बैठकीत सांगितली. हॉटेलमध्ये पाण्याचा वापर कमीत कमी प्रमाणात करण्यात यावा; यामुळे सांडपाणी कमी प्रमाणात तयार होईल व महानगरपालिकेस कराव्या लागणाऱ्या सांडपाणी निर्गतीकरणाची समस्या कमी होईल. या वर्षी सांडपाणी तयार होण्याचे प्रमाण ९५ द.ल. लिटरवरून ८५ द.ल. लिटर करण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे आयुक्तांनी सांगितले.पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व हॉटेलमालकांनी पंचगंगा नदी प्रदूषण रोखणेकामी आवश्यक माहिती संकलित करण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन केले. अनिल चौगले यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.यावेळी आरोग्यधिकारी दिलीप पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, हॉटेल मालक संघाचे उपाध्यक्ष सचिन शानभाग, सेक्रेटरी सिद्धार्थ लाटकर, जॉइंट सेक्रेटरी आशिष रायबागे, बाळ पाटणकर, शंतनू पै, शेखर काळे, श्रीकांत पुरेकर, राजू माळकर, नकुल पाटणकर, उमेश राऊत, अरुण भोसले (चोपदार), दिलीप पवार, अमरजा निंबाळकर यांच्यासह अनेक हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते. 

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईkolhapurकोल्हापूर