शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

महापूर येतो फुटाफुटाने, उतरतो मात्र केवळ इंचाइंचाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:32 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून शेवटच्या राजापूरवाडी बंधाºयानंतर कृष्णा नदी कर्नाटकात जाते. तेथून साडेतीन लाखांहून अधिक क्युसेक्स पाणी पुढे सरकत होते.

ठळक मुद्देअलमट्टीचा कोणताही संबंध नाही पूर (अ) नियंत्रण रेषा : कृष्णा खोऱ्यात दोन डझन नद्या; पाणी पुढे सरकण्यास जागाच नाही

वसंत भोसले ।कोल्हापूर : कृष्णा खोºयातील पावसाचे प्रमाण कमी झाले परिणामी धरणातील पाण्याचा विसर्गही कमी झाला. तरीही महापुराचे पाणी इंचाइंचानेच का उतरते आणि चढताना मात्र फुटाफुटाने का चढत होते, असा सवाल लोकांच्या मनात येऊ लागला आहे.

कृष्णा खोºयात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात उगम पावणाºया दोन डझन नद्या आहेत. या सर्व नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सलग नऊ दिवस अतिवृष्टी होत होती. परिणामी यापैकी चौदा नद्यांवर असलेल्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. ते पाणी तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी कृष्णेत येत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून शेवटच्या राजापूरवाडी बंधाºयानंतर कृष्णा नदी कर्नाटकात जाते. तेथून साडेतीन लाखांहून अधिक क्युसेक्स पाणी पुढे सरकत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठीच अलमट्टी धरणाच्या पाण्याचा या महापुराशी काही संबंध नाही हे सांगलीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते, ते खरे आहे. कृष्णा नदीला महाराष्ट्रात मिळणाºया नद्यांशिवाय भुदरगड, राधानगरी, आजरा आणि चंदगड या तालुक्यातून उगम पावणाºया नद्यांचे पाणीही अलमट्टी धरणातच जाते.परिणामी अलमट्टीतून चार ते पाच लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात येऊ लागले. तरी महाराष्ट्रातील महापूर ओसरेना, अशीच भावना जनतेची झाली.

दरम्यान, इंचाइंचाने पाणी उतरण्याचे मुख्य कारणच पूर नियंत्रण रेषेत आलेल्या माणसांची गर्दी आणि झालेल्या बांधकाम हे आहे. शिवाय सर्वच नद्यांच्या मार्गावर रस्ते, आणि पुलांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले आहे. पाणी वाढले होते, ते याच कारणांनी आणि आता उतरतही नाही याच कारणांमुळे, हे स्पष्ट झाले आहे. जेव्हा महापूर होता तेव्हा पुलाखालून पाणी पूर्णपणे जातच नव्हते, त्यामुळे रस्त्यावर पाणी घालून घेतले होते. पाण्याचा निचरा अधिक होत होता. महापूर कमी होताच रस्यावरून जाणारे पाणी थांबले आणि फक्त पुलाखालुन असलेल्या वाटेनेच जाऊ लागले. ती अरूंद वाटच पाणी इंचाइंचाने उतरवित आहे. त्यामुळे या महापुराचा धोका आता कायमचा झाला आहे. किंबहुना आपण तो तयार करून घेतला आहे.

धरणे भरली, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि मुक्त पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सलग आठ दिवस झाली की महापुराचा फटका दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सीमावर्ती कर्नाटक राज्याला बसणार. हे आता गणित घातल्यानंतर सुटणाºया कोड्याचे अचूक उत्तर असणार आहे. धरणे पूर्ण क्षमतेने भरणे, पाण्याचा विसर्ग सुरू होणे आणि अतिवृष्टी याचा योग जुळून आला की, महापुराचे आगमन आणि त्यानंतरच विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होणार हे आता आपण अपेक्षित धरुन तयार रहायला पाहिजे.शेतीला सर्वाधिक फटकाया सर्व पूर नियंत्रण रेषेवरील शहरी आक्रमणाचा सर्वात मोठा फटका शेतकरी वर्गाला बसतो. शहरातील माणूस पाणी चढताच आठ दहा दिवस घर सोडून जातो. मात्र या तिन्ही जिल्ह्यातील पाचशेहून अधिक गावांतील सुमारे दोन लाख हेक्टरमधील पीकच उद्ध्वस्त होते, शेतकरी उद्ध्वस्त होतो. पूर रेषेत काही करण्यापूर्वी त्याचा परिणाम नदीच्या प्रवाही पाण्याची अडवणूक होणार नाही, याचा विचार केला पाहिजे. अन्यथा दक्षिण महाराष्ट्र हा तिन्ही ऋतूत श्रेष्ठ असणाºया पैकी पावसाळा कायम आपणास धोक्याच्या पातळीवर घेऊन जाणारा ठरणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणriverनदी