शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

महापूर येतो फुटाफुटाने, उतरतो मात्र केवळ इंचाइंचाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:32 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून शेवटच्या राजापूरवाडी बंधाºयानंतर कृष्णा नदी कर्नाटकात जाते. तेथून साडेतीन लाखांहून अधिक क्युसेक्स पाणी पुढे सरकत होते.

ठळक मुद्देअलमट्टीचा कोणताही संबंध नाही पूर (अ) नियंत्रण रेषा : कृष्णा खोऱ्यात दोन डझन नद्या; पाणी पुढे सरकण्यास जागाच नाही

वसंत भोसले ।कोल्हापूर : कृष्णा खोºयातील पावसाचे प्रमाण कमी झाले परिणामी धरणातील पाण्याचा विसर्गही कमी झाला. तरीही महापुराचे पाणी इंचाइंचानेच का उतरते आणि चढताना मात्र फुटाफुटाने का चढत होते, असा सवाल लोकांच्या मनात येऊ लागला आहे.

कृष्णा खोºयात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात उगम पावणाºया दोन डझन नद्या आहेत. या सर्व नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सलग नऊ दिवस अतिवृष्टी होत होती. परिणामी यापैकी चौदा नद्यांवर असलेल्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. ते पाणी तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी कृष्णेत येत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून शेवटच्या राजापूरवाडी बंधाºयानंतर कृष्णा नदी कर्नाटकात जाते. तेथून साडेतीन लाखांहून अधिक क्युसेक्स पाणी पुढे सरकत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठीच अलमट्टी धरणाच्या पाण्याचा या महापुराशी काही संबंध नाही हे सांगलीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते, ते खरे आहे. कृष्णा नदीला महाराष्ट्रात मिळणाºया नद्यांशिवाय भुदरगड, राधानगरी, आजरा आणि चंदगड या तालुक्यातून उगम पावणाºया नद्यांचे पाणीही अलमट्टी धरणातच जाते.परिणामी अलमट्टीतून चार ते पाच लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात येऊ लागले. तरी महाराष्ट्रातील महापूर ओसरेना, अशीच भावना जनतेची झाली.

दरम्यान, इंचाइंचाने पाणी उतरण्याचे मुख्य कारणच पूर नियंत्रण रेषेत आलेल्या माणसांची गर्दी आणि झालेल्या बांधकाम हे आहे. शिवाय सर्वच नद्यांच्या मार्गावर रस्ते, आणि पुलांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले आहे. पाणी वाढले होते, ते याच कारणांनी आणि आता उतरतही नाही याच कारणांमुळे, हे स्पष्ट झाले आहे. जेव्हा महापूर होता तेव्हा पुलाखालून पाणी पूर्णपणे जातच नव्हते, त्यामुळे रस्त्यावर पाणी घालून घेतले होते. पाण्याचा निचरा अधिक होत होता. महापूर कमी होताच रस्यावरून जाणारे पाणी थांबले आणि फक्त पुलाखालुन असलेल्या वाटेनेच जाऊ लागले. ती अरूंद वाटच पाणी इंचाइंचाने उतरवित आहे. त्यामुळे या महापुराचा धोका आता कायमचा झाला आहे. किंबहुना आपण तो तयार करून घेतला आहे.

धरणे भरली, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि मुक्त पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सलग आठ दिवस झाली की महापुराचा फटका दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सीमावर्ती कर्नाटक राज्याला बसणार. हे आता गणित घातल्यानंतर सुटणाºया कोड्याचे अचूक उत्तर असणार आहे. धरणे पूर्ण क्षमतेने भरणे, पाण्याचा विसर्ग सुरू होणे आणि अतिवृष्टी याचा योग जुळून आला की, महापुराचे आगमन आणि त्यानंतरच विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होणार हे आता आपण अपेक्षित धरुन तयार रहायला पाहिजे.शेतीला सर्वाधिक फटकाया सर्व पूर नियंत्रण रेषेवरील शहरी आक्रमणाचा सर्वात मोठा फटका शेतकरी वर्गाला बसतो. शहरातील माणूस पाणी चढताच आठ दहा दिवस घर सोडून जातो. मात्र या तिन्ही जिल्ह्यातील पाचशेहून अधिक गावांतील सुमारे दोन लाख हेक्टरमधील पीकच उद्ध्वस्त होते, शेतकरी उद्ध्वस्त होतो. पूर रेषेत काही करण्यापूर्वी त्याचा परिणाम नदीच्या प्रवाही पाण्याची अडवणूक होणार नाही, याचा विचार केला पाहिजे. अन्यथा दक्षिण महाराष्ट्र हा तिन्ही ऋतूत श्रेष्ठ असणाºया पैकी पावसाळा कायम आपणास धोक्याच्या पातळीवर घेऊन जाणारा ठरणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणriverनदी