शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महापूर येतो फुटाफुटाने, उतरतो मात्र केवळ इंचाइंचाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:32 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून शेवटच्या राजापूरवाडी बंधाºयानंतर कृष्णा नदी कर्नाटकात जाते. तेथून साडेतीन लाखांहून अधिक क्युसेक्स पाणी पुढे सरकत होते.

ठळक मुद्देअलमट्टीचा कोणताही संबंध नाही पूर (अ) नियंत्रण रेषा : कृष्णा खोऱ्यात दोन डझन नद्या; पाणी पुढे सरकण्यास जागाच नाही

वसंत भोसले ।कोल्हापूर : कृष्णा खोºयातील पावसाचे प्रमाण कमी झाले परिणामी धरणातील पाण्याचा विसर्गही कमी झाला. तरीही महापुराचे पाणी इंचाइंचानेच का उतरते आणि चढताना मात्र फुटाफुटाने का चढत होते, असा सवाल लोकांच्या मनात येऊ लागला आहे.

कृष्णा खोºयात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात उगम पावणाºया दोन डझन नद्या आहेत. या सर्व नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सलग नऊ दिवस अतिवृष्टी होत होती. परिणामी यापैकी चौदा नद्यांवर असलेल्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. ते पाणी तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी कृष्णेत येत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून शेवटच्या राजापूरवाडी बंधाºयानंतर कृष्णा नदी कर्नाटकात जाते. तेथून साडेतीन लाखांहून अधिक क्युसेक्स पाणी पुढे सरकत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठीच अलमट्टी धरणाच्या पाण्याचा या महापुराशी काही संबंध नाही हे सांगलीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते, ते खरे आहे. कृष्णा नदीला महाराष्ट्रात मिळणाºया नद्यांशिवाय भुदरगड, राधानगरी, आजरा आणि चंदगड या तालुक्यातून उगम पावणाºया नद्यांचे पाणीही अलमट्टी धरणातच जाते.परिणामी अलमट्टीतून चार ते पाच लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात येऊ लागले. तरी महाराष्ट्रातील महापूर ओसरेना, अशीच भावना जनतेची झाली.

दरम्यान, इंचाइंचाने पाणी उतरण्याचे मुख्य कारणच पूर नियंत्रण रेषेत आलेल्या माणसांची गर्दी आणि झालेल्या बांधकाम हे आहे. शिवाय सर्वच नद्यांच्या मार्गावर रस्ते, आणि पुलांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले आहे. पाणी वाढले होते, ते याच कारणांनी आणि आता उतरतही नाही याच कारणांमुळे, हे स्पष्ट झाले आहे. जेव्हा महापूर होता तेव्हा पुलाखालून पाणी पूर्णपणे जातच नव्हते, त्यामुळे रस्त्यावर पाणी घालून घेतले होते. पाण्याचा निचरा अधिक होत होता. महापूर कमी होताच रस्यावरून जाणारे पाणी थांबले आणि फक्त पुलाखालुन असलेल्या वाटेनेच जाऊ लागले. ती अरूंद वाटच पाणी इंचाइंचाने उतरवित आहे. त्यामुळे या महापुराचा धोका आता कायमचा झाला आहे. किंबहुना आपण तो तयार करून घेतला आहे.

धरणे भरली, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि मुक्त पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सलग आठ दिवस झाली की महापुराचा फटका दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सीमावर्ती कर्नाटक राज्याला बसणार. हे आता गणित घातल्यानंतर सुटणाºया कोड्याचे अचूक उत्तर असणार आहे. धरणे पूर्ण क्षमतेने भरणे, पाण्याचा विसर्ग सुरू होणे आणि अतिवृष्टी याचा योग जुळून आला की, महापुराचे आगमन आणि त्यानंतरच विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होणार हे आता आपण अपेक्षित धरुन तयार रहायला पाहिजे.शेतीला सर्वाधिक फटकाया सर्व पूर नियंत्रण रेषेवरील शहरी आक्रमणाचा सर्वात मोठा फटका शेतकरी वर्गाला बसतो. शहरातील माणूस पाणी चढताच आठ दहा दिवस घर सोडून जातो. मात्र या तिन्ही जिल्ह्यातील पाचशेहून अधिक गावांतील सुमारे दोन लाख हेक्टरमधील पीकच उद्ध्वस्त होते, शेतकरी उद्ध्वस्त होतो. पूर रेषेत काही करण्यापूर्वी त्याचा परिणाम नदीच्या प्रवाही पाण्याची अडवणूक होणार नाही, याचा विचार केला पाहिजे. अन्यथा दक्षिण महाराष्ट्र हा तिन्ही ऋतूत श्रेष्ठ असणाºया पैकी पावसाळा कायम आपणास धोक्याच्या पातळीवर घेऊन जाणारा ठरणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणriverनदी