शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
5
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
7
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
8
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
9
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
10
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
11
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
12
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
13
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
14
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
15
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
16
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
17
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
19
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
20
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

महापूर येतो फुटाफुटाने, उतरतो मात्र केवळ इंचाइंचाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:32 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून शेवटच्या राजापूरवाडी बंधाºयानंतर कृष्णा नदी कर्नाटकात जाते. तेथून साडेतीन लाखांहून अधिक क्युसेक्स पाणी पुढे सरकत होते.

ठळक मुद्देअलमट्टीचा कोणताही संबंध नाही पूर (अ) नियंत्रण रेषा : कृष्णा खोऱ्यात दोन डझन नद्या; पाणी पुढे सरकण्यास जागाच नाही

वसंत भोसले ।कोल्हापूर : कृष्णा खोºयातील पावसाचे प्रमाण कमी झाले परिणामी धरणातील पाण्याचा विसर्गही कमी झाला. तरीही महापुराचे पाणी इंचाइंचानेच का उतरते आणि चढताना मात्र फुटाफुटाने का चढत होते, असा सवाल लोकांच्या मनात येऊ लागला आहे.

कृष्णा खोºयात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात उगम पावणाºया दोन डझन नद्या आहेत. या सर्व नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सलग नऊ दिवस अतिवृष्टी होत होती. परिणामी यापैकी चौदा नद्यांवर असलेल्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. ते पाणी तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी कृष्णेत येत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून शेवटच्या राजापूरवाडी बंधाºयानंतर कृष्णा नदी कर्नाटकात जाते. तेथून साडेतीन लाखांहून अधिक क्युसेक्स पाणी पुढे सरकत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठीच अलमट्टी धरणाच्या पाण्याचा या महापुराशी काही संबंध नाही हे सांगलीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते, ते खरे आहे. कृष्णा नदीला महाराष्ट्रात मिळणाºया नद्यांशिवाय भुदरगड, राधानगरी, आजरा आणि चंदगड या तालुक्यातून उगम पावणाºया नद्यांचे पाणीही अलमट्टी धरणातच जाते.परिणामी अलमट्टीतून चार ते पाच लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात येऊ लागले. तरी महाराष्ट्रातील महापूर ओसरेना, अशीच भावना जनतेची झाली.

दरम्यान, इंचाइंचाने पाणी उतरण्याचे मुख्य कारणच पूर नियंत्रण रेषेत आलेल्या माणसांची गर्दी आणि झालेल्या बांधकाम हे आहे. शिवाय सर्वच नद्यांच्या मार्गावर रस्ते, आणि पुलांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले आहे. पाणी वाढले होते, ते याच कारणांनी आणि आता उतरतही नाही याच कारणांमुळे, हे स्पष्ट झाले आहे. जेव्हा महापूर होता तेव्हा पुलाखालून पाणी पूर्णपणे जातच नव्हते, त्यामुळे रस्त्यावर पाणी घालून घेतले होते. पाण्याचा निचरा अधिक होत होता. महापूर कमी होताच रस्यावरून जाणारे पाणी थांबले आणि फक्त पुलाखालुन असलेल्या वाटेनेच जाऊ लागले. ती अरूंद वाटच पाणी इंचाइंचाने उतरवित आहे. त्यामुळे या महापुराचा धोका आता कायमचा झाला आहे. किंबहुना आपण तो तयार करून घेतला आहे.

धरणे भरली, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि मुक्त पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सलग आठ दिवस झाली की महापुराचा फटका दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सीमावर्ती कर्नाटक राज्याला बसणार. हे आता गणित घातल्यानंतर सुटणाºया कोड्याचे अचूक उत्तर असणार आहे. धरणे पूर्ण क्षमतेने भरणे, पाण्याचा विसर्ग सुरू होणे आणि अतिवृष्टी याचा योग जुळून आला की, महापुराचे आगमन आणि त्यानंतरच विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होणार हे आता आपण अपेक्षित धरुन तयार रहायला पाहिजे.शेतीला सर्वाधिक फटकाया सर्व पूर नियंत्रण रेषेवरील शहरी आक्रमणाचा सर्वात मोठा फटका शेतकरी वर्गाला बसतो. शहरातील माणूस पाणी चढताच आठ दहा दिवस घर सोडून जातो. मात्र या तिन्ही जिल्ह्यातील पाचशेहून अधिक गावांतील सुमारे दोन लाख हेक्टरमधील पीकच उद्ध्वस्त होते, शेतकरी उद्ध्वस्त होतो. पूर रेषेत काही करण्यापूर्वी त्याचा परिणाम नदीच्या प्रवाही पाण्याची अडवणूक होणार नाही, याचा विचार केला पाहिजे. अन्यथा दक्षिण महाराष्ट्र हा तिन्ही ऋतूत श्रेष्ठ असणाºया पैकी पावसाळा कायम आपणास धोक्याच्या पातळीवर घेऊन जाणारा ठरणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणriverनदी