शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप; पुराचे पाणी कमी होऊ लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 11:58 IST

जिल्ह्यातील ४४० कुटूंबे अद्याप स्थलांतरितच

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली असून धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे ‘राधानगरी’, ‘दूधगंगा’, ‘वारणा’ धरणातून विसर्ग कमी झाल्याने पुराचे पाणी हळूहळू कमी होऊ लागले आहे. पंचगंगा नदीची पातळी ४०.०१ फुटांपर्यंत खाली आली असून अद्याप ४३ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत आहे.कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावरील केर्ली (ता. करवीर) येथील पाणी ओसरल्याने दुपारनंतर मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ४४० कुटुंबांतील १४९१ व्यक्ती व ३७० जनावरांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले.गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. शुक्रवारी सकाळपासून चांगली उघडीप देत सूर्यनारायणाने बराच काळ दर्शन दिल्याने कोल्हापूरकरांच्या मनातील महापुराची भीती काहीसी कमी झाली. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात दिवसभरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्या तरी तुलनेत पाऊस कमी राहिला.कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल, गडहिंग्लज तालुक्यात उघडीप राहिली. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात सर्वाधिक ३० मिली मीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. धरणक्षेत्रात पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे.

राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंदशुक्रवारी (दि-२२) रात्री राधानगरी धरणाची सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाली आहेत. धरणातून बीओटी पॉवर हाऊस मधून १५०० क्युसेक इतका विसर्ग नदी पात्रात सुरु आहे.

तर वारणातून १६३० व दूधगंगा धरणातून ६१०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पातळी हळूहळू कमी होत आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील ९९ खासगी मालमत्तांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. सोमवार (दि. २५) पर्यंत जिल्ह्यात उघडीप राहील, त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.जिल्ह्यातील ७६ मार्ग अद्यापही पाण्याखालीजिल्ह्यातील ८ राज्य मार्ग, २५ प्रमुख जिल्हा मार्ग, १२ इतर जिल्हा मार्ग तर ३१ ग्रामीण मार्ग असे ७६ मार्ग अद्याप पाण्याखाली आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी शुक्रवारीही कायम राहिली.

अलमट्टीचा विसर्ग २.५० लाख कायमअलमट्टी धरणातून प्रतिसेकंद २.५० लाख तर हिपरग्गी धरणातून २.२५ लाख घनफूट पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आल्याने पाण्याचा निचरा होत आहे.तालुकानिहाय स्थलांतरित कुटुंबेतालुका - कुटुंबे - व्यक्ती - जनावरे 

  • राधानगरी - ३९ - १७४ - १२६ 
  • कागल - १५ - ६१ - १२ 
  • कोल्हापूर शहर - २५ - ९७ - ० 
  • करवीर - ६७ - ८४ - १६ 
  • कागल (दुसरा) - ९ - ३७ - १२ 
  • हातकणंगले - २९ - ४९ - ११६ 
  • शिरोळ - २०९ - ८३५ - ३४ 
  • इचलकरंजी - ३० - ९६ - ६४