शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Rain Update: कोल्हापुरात पावसाची उसंत, तरी पूरस्थिती जैसे थे; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ

By राजाराम लोंढे | Updated: August 13, 2022 12:54 IST

राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे बंद. सध्या दोन स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरुच

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली असली तरी पूरस्थिती जैसे थे आहे. पंचगंगेच्या पाणी पातळी घट न होता ती ४१.७ फुटांवरच स्थिर आहे. यात आज, शनिवारी पुन्हा १ इंचाने वाढ होवून ती ४१.८ फूट इतकी झाली आहे. अद्याप सात राज्य मार्ग व १९ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले असल्याने ४४५६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. आतापर्यंत सात दरवाज्यापैकी पाच दरवाजे उघडले होते मात्र सद्या तीन दरवाजे बंद झाले आहेत.मागील गेली दोन दिवस पाऊस कमी आहे. दिवसभर कडकडीत ऊन तर अधून-मधून पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र, पुराचे पाणी कमी होताना दिसत नाही. राधानगरी, कुंभी, कासारी, तुळशी प्रकल्पातून विसर्ग सुरू असल्याने पाण्याची आवक कायम राहिली. अलमट्टी धरणातून प्रति सेकंद २ लाख २५ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज, शनिवारी दुपारी १२ वाजता पंचगंगेची पातळी ४१.८ फूट असून ती कालपासून स्थिरच आहे.

धामणी, तुळशी खोरे मोकळे होण्यास सुरुवात

पावसाने उघडीप दिली असली तरी धामणी, कासारी खोऱ्यातील पाणी पहिल्यांदा कमी होते. त्यानंतर कुंभी, भोगावती मग पंचगंगेची पातळी कमी होत जाते. शुक्रवारी दुपारनंतर धामणी व तुळशी खोरे हळूहळू मोकळे झाले.

पडझडीत १६.६९ लाखांचे नुकसान

शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात एक सार्वजनिक, तर ६२ खासगी मालमत्तांची पडझड होऊन १६ लाख ६९ हजारांचे नुकसान झाले आहे.

एसटीचे हे मार्ग बंद -कोल्हापूर ते गगनबावडाकोल्हापूर ते रत्नागिरी (केर्ली येथे पाणी)संभाजीनगर ते मानबेटगडहिंग्लज ते चंदगडचंदगड ते माणगावगगनबावडा ते भुईबावडाआजरा ते गारगोटी

धरणातून विसर्ग, प्रति सेकंद घनफूटमध्ये -राधानगरी - ४४५६तुळशी - १७५४वारणा- ९३७१दुधगंगा - ५८१६

पाऊस जरी थांबला असला तरी ५० किलोमीटर नदीपात्रात पाणी आहे. ते पुढे सरकेल तसे त्या परिसरातील पुराचे पाणी कमी होत जाते. उघडझाप अशीच राहिली तर आज, शनिवारपासून झपाट्याने पाणी कमी होऊ शकते. - रोहित बांदिवडेकर (कार्यकारी अभियंता, पाटबंधारे)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसKolhapur Floodकोल्हापूर पूर