शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

Rain Update: कोल्हापुरात पावसाची उसंत, तरी पूरस्थिती जैसे थे; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ

By राजाराम लोंढे | Updated: August 13, 2022 12:54 IST

राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे बंद. सध्या दोन स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरुच

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली असली तरी पूरस्थिती जैसे थे आहे. पंचगंगेच्या पाणी पातळी घट न होता ती ४१.७ फुटांवरच स्थिर आहे. यात आज, शनिवारी पुन्हा १ इंचाने वाढ होवून ती ४१.८ फूट इतकी झाली आहे. अद्याप सात राज्य मार्ग व १९ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले असल्याने ४४५६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. आतापर्यंत सात दरवाज्यापैकी पाच दरवाजे उघडले होते मात्र सद्या तीन दरवाजे बंद झाले आहेत.मागील गेली दोन दिवस पाऊस कमी आहे. दिवसभर कडकडीत ऊन तर अधून-मधून पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र, पुराचे पाणी कमी होताना दिसत नाही. राधानगरी, कुंभी, कासारी, तुळशी प्रकल्पातून विसर्ग सुरू असल्याने पाण्याची आवक कायम राहिली. अलमट्टी धरणातून प्रति सेकंद २ लाख २५ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज, शनिवारी दुपारी १२ वाजता पंचगंगेची पातळी ४१.८ फूट असून ती कालपासून स्थिरच आहे.

धामणी, तुळशी खोरे मोकळे होण्यास सुरुवात

पावसाने उघडीप दिली असली तरी धामणी, कासारी खोऱ्यातील पाणी पहिल्यांदा कमी होते. त्यानंतर कुंभी, भोगावती मग पंचगंगेची पातळी कमी होत जाते. शुक्रवारी दुपारनंतर धामणी व तुळशी खोरे हळूहळू मोकळे झाले.

पडझडीत १६.६९ लाखांचे नुकसान

शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात एक सार्वजनिक, तर ६२ खासगी मालमत्तांची पडझड होऊन १६ लाख ६९ हजारांचे नुकसान झाले आहे.

एसटीचे हे मार्ग बंद -कोल्हापूर ते गगनबावडाकोल्हापूर ते रत्नागिरी (केर्ली येथे पाणी)संभाजीनगर ते मानबेटगडहिंग्लज ते चंदगडचंदगड ते माणगावगगनबावडा ते भुईबावडाआजरा ते गारगोटी

धरणातून विसर्ग, प्रति सेकंद घनफूटमध्ये -राधानगरी - ४४५६तुळशी - १७५४वारणा- ९३७१दुधगंगा - ५८१६

पाऊस जरी थांबला असला तरी ५० किलोमीटर नदीपात्रात पाणी आहे. ते पुढे सरकेल तसे त्या परिसरातील पुराचे पाणी कमी होत जाते. उघडझाप अशीच राहिली तर आज, शनिवारपासून झपाट्याने पाणी कमी होऊ शकते. - रोहित बांदिवडेकर (कार्यकारी अभियंता, पाटबंधारे)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसKolhapur Floodकोल्हापूर पूर