शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

पाच हजार बालकांना मिळाली शिक्षणाची ‘उमेद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:53 IST

आई-वडील हयात नाहीत अशा गरजू मुला-मुलींची शाळांमधून माहिती घेऊन त्यांना दप्तरासह शैक्षणिक साहित्य या फौंडेशनच्यावतीने दिले जाते. ऊसतोड कामगारांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी त्यांना त्यांच्या पालांमध्ये जाऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया साखर कारखाना येथे केला आहे.

ठळक मुद्देसांगरुळमधील उमेद फौंडेशन : शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न; विविध सामाजिक उपक्रम

संतोष मिठारी ।कोल्हापूर : आर्थिक दुर्बलता, भौगोलिक दुर्गमता, आदी विविध कारणांमुळे अनेक बालकांचे जगणे कठीण बनते. असे कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये या हेतूने सांगरुळ (ता. करवीर) येथील उमेद फौंडेशन गेल्या पाच वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहेत. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत समाजातील वंचित, उपेक्षित सुमारे पाच हजार बालकांना शिक्षणाबरोबरच जगण्याची ‘उमेद’ मिळाली आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली आणि जालनामधील या वंचित बालकांच्या आयुष्यात आनंद फुलविण्याचे काम या फौंडेशनने केले आहे.

आई-वडील हयात नाहीत अशा गरजू मुला-मुलींची शाळांमधून माहिती घेऊन त्यांना दप्तरासह शैक्षणिक साहित्य या फौंडेशनच्यावतीने दिले जाते. ऊसतोड कामगारांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी त्यांना त्यांच्या पालांमध्ये जाऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया साखर कारखाना येथे केला आहे. कोपार्डे (ता. करवीर) येथील माळावर ‘शिक्षण आले अंगणी’ या संकल्पनेतून ‘ज्ञानांगण’ ही बिनभिंतीची शाळा भरविली जाते. त्याद्वारे चार वर्षांमध्ये ५० बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. जी बालक आणि ज्यांचे पालक कचरा अथवा भंगार वेचक म्हणून काम करतात अशा मुलांसाठी शाहूवाडी येथे उमेद शिक्षण केंद्रामार्फत सायंकाळी वर्ग चालवले जातात. या केंद्रात ४५ मुले-मुली आहे. विविध शाळांमध्ये बाल हक्क मंच स्थापन केले असून त्यामध्ये ८०० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी आहेत.

दुर्गम भागातील आंबर्डे, आयरेवाडी, बर्की (ता. शाहूवाडी), जाधववाडी (ता. पन्हाळा) तसेच जालना जिल्ह्यामध्ये सायंअभ्यासिकेचा रोज तीनशे विद्यार्थी मोफत लाभ घेतात. ‘ज्ञानसेतू’ या उपक्रमांमार्फत विद्यार्थ्यांची क्षेत्रभेटी, विविध कौशल्य शिकवली जातात. गरजू मुलांच्या शिक्षणाची व संगोपन जबाबदारी घेत ‘उमेद मायेचं घर’ या खासगी वसतिगृहाची स्थापना केली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या गरजू मुलांना प्रवास, परीक्षा शुल्क, जेवण आदींकरिता आर्थिक मदत पुरविली जाते.२५० हून अधिक स्वयंसेवक कार्यरतआपल्या बालपणी जे दु:ख, यातना आल्या, त्या इतर मुलांच्या आयुष्यात येऊ नयेत, या हेतूने उमेद फौंडेशनची स्थापना केली आहे. प्रत्येक बालकांच्या आयुष्यात शिक्षणाची ‘उमेद’ निर्माण करण्यासाठी काम करण्याचे ध्येय घेऊन आम्ही २५० कार्यकर्ते, स्वयंसेवक कार्यरत आहोत. सामाजिक सुहृदयी देणगीदारांच्या मदतीने हे सामाजिक कार्य करण्यात येत आहे, असे या फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे यांनी सांगितले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchildren's dayबालदिन