शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार बालकांना मिळाली शिक्षणाची ‘उमेद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:53 IST

आई-वडील हयात नाहीत अशा गरजू मुला-मुलींची शाळांमधून माहिती घेऊन त्यांना दप्तरासह शैक्षणिक साहित्य या फौंडेशनच्यावतीने दिले जाते. ऊसतोड कामगारांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी त्यांना त्यांच्या पालांमध्ये जाऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया साखर कारखाना येथे केला आहे.

ठळक मुद्देसांगरुळमधील उमेद फौंडेशन : शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न; विविध सामाजिक उपक्रम

संतोष मिठारी ।कोल्हापूर : आर्थिक दुर्बलता, भौगोलिक दुर्गमता, आदी विविध कारणांमुळे अनेक बालकांचे जगणे कठीण बनते. असे कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये या हेतूने सांगरुळ (ता. करवीर) येथील उमेद फौंडेशन गेल्या पाच वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहेत. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत समाजातील वंचित, उपेक्षित सुमारे पाच हजार बालकांना शिक्षणाबरोबरच जगण्याची ‘उमेद’ मिळाली आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली आणि जालनामधील या वंचित बालकांच्या आयुष्यात आनंद फुलविण्याचे काम या फौंडेशनने केले आहे.

आई-वडील हयात नाहीत अशा गरजू मुला-मुलींची शाळांमधून माहिती घेऊन त्यांना दप्तरासह शैक्षणिक साहित्य या फौंडेशनच्यावतीने दिले जाते. ऊसतोड कामगारांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी त्यांना त्यांच्या पालांमध्ये जाऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया साखर कारखाना येथे केला आहे. कोपार्डे (ता. करवीर) येथील माळावर ‘शिक्षण आले अंगणी’ या संकल्पनेतून ‘ज्ञानांगण’ ही बिनभिंतीची शाळा भरविली जाते. त्याद्वारे चार वर्षांमध्ये ५० बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. जी बालक आणि ज्यांचे पालक कचरा अथवा भंगार वेचक म्हणून काम करतात अशा मुलांसाठी शाहूवाडी येथे उमेद शिक्षण केंद्रामार्फत सायंकाळी वर्ग चालवले जातात. या केंद्रात ४५ मुले-मुली आहे. विविध शाळांमध्ये बाल हक्क मंच स्थापन केले असून त्यामध्ये ८०० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी आहेत.

दुर्गम भागातील आंबर्डे, आयरेवाडी, बर्की (ता. शाहूवाडी), जाधववाडी (ता. पन्हाळा) तसेच जालना जिल्ह्यामध्ये सायंअभ्यासिकेचा रोज तीनशे विद्यार्थी मोफत लाभ घेतात. ‘ज्ञानसेतू’ या उपक्रमांमार्फत विद्यार्थ्यांची क्षेत्रभेटी, विविध कौशल्य शिकवली जातात. गरजू मुलांच्या शिक्षणाची व संगोपन जबाबदारी घेत ‘उमेद मायेचं घर’ या खासगी वसतिगृहाची स्थापना केली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या गरजू मुलांना प्रवास, परीक्षा शुल्क, जेवण आदींकरिता आर्थिक मदत पुरविली जाते.२५० हून अधिक स्वयंसेवक कार्यरतआपल्या बालपणी जे दु:ख, यातना आल्या, त्या इतर मुलांच्या आयुष्यात येऊ नयेत, या हेतूने उमेद फौंडेशनची स्थापना केली आहे. प्रत्येक बालकांच्या आयुष्यात शिक्षणाची ‘उमेद’ निर्माण करण्यासाठी काम करण्याचे ध्येय घेऊन आम्ही २५० कार्यकर्ते, स्वयंसेवक कार्यरत आहोत. सामाजिक सुहृदयी देणगीदारांच्या मदतीने हे सामाजिक कार्य करण्यात येत आहे, असे या फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे यांनी सांगितले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchildren's dayबालदिन