शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

राजाराम तलावातील मासे हवामानातील बदलामुळे मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 20:09 IST

pollution River Kolhapur : हवामानातील अचानक बदल आणि गढूळ पाणी मोठ्या प्रमाणात मिसळल्याने येथील राजाराम तलावातील पाण्यामधील ऑक्सिजनची पातळी खालावल्याने मासे मृत झाल्याचा निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाने शुक्रवारी काढला. राज्यभरातील अनेक तलावातील मासेही याच कारणाने मृत झाल्याचा अंदाज प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देराजाराम तलावातील मासे हवामानातील बदलामुळे मृतप्रदूषण नियंत्रणचा निष्कर्ष : राज्यातील धरणांतही असाच प्रकार

कोल्हापूर : हवामानातील अचानक बदल आणि गढूळ पाणी मोठ्या प्रमाणात मिसळल्याने येथील राजाराम तलावातील पाण्यामधील ऑक्सिजनची पातळी खालावल्याने मासे मृत झाल्याचा निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाने शुक्रवारी काढला. राज्यभरातील अनेक तलावातील मासेही याच कारणाने मृत झाल्याचा अंदाज प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्यक्त केला आहे.तौत्के चक्रीवादळामुळे १५ मे नंतर सलग चार दिवस हवामानात बदल झाला. कडक उन्हाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, १५ मे ला येथील राजाराम तलावातील मासे मृत झाले. मृत माशांचा खच पडला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने तलावातील पाण्याचे नमुने घेतले.

तलाव कार्यक्षेत्रातून दूषित पाणी कोठून मिसळत आहे, का याची पाहणी केली. पण पथकाला दूषित पाणी मिसळले नसल्याचे दिसून आले. यामुळे हवामानातील बदल, पावसाचे गढूळ पाणी मिसळल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने तलावातील मासे मृत झाल्याचे मत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाचे आहे. प्राथमिक टप्यातच हा निष्कर्ष निघाल्याने त्यांनी पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी फारसे प्रयत्न केले नसल्याचे समोर आले आहे. 

टॅग्स :pollutionप्रदूषणriverनदीkolhapurकोल्हापूर